शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

१२७० हेक्टरवर होणार सोयाबिनचे ग्राम बिजोत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:17 IST

मागील खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये कपाशीचा पेरा वाढला होता. मात्र बोंड अळीच्या प्रार्दूभावामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी कमी करून सोयाबिन पेरा वाढवावा, यासाठी यंदा तब्बल एक हजार २७० हेक्टरवर सोयाबिनचे ‘ग्राम बिजोत्पादन’ करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला. योजनेतील सहभागी शेतकऱ्यांना शासनाकडून प्रती क्विंटलमागे १७०० रुपये अनुदान दिले जाईल.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना मिळणार अनुदान : बियाण्यांची टंचाई होणार दूर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये कपाशीचा पेरा वाढला होता. मात्र बोंड अळीच्या प्रार्दूभावामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी कमी करून सोयाबिन पेरा वाढवावा, यासाठी यंदा तब्बल एक हजार २७० हेक्टरवर सोयाबिनचे ‘ग्राम बिजोत्पादन’ करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला. योजनेतील सहभागी शेतकऱ्यांना शासनाकडून प्रती क्विंटलमागे १७०० रुपये अनुदान दिले जाईल. शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिल्यास पुढील खरीप हंगामात सोयाबिन बियाण्यांची टंचाई भासणार नाही.केंद्र शासनाच्या कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान (एमएमएईटी) तसेच बियाणे, लागवड साहित्य उपअभियानांअतर्गत (एसएमएसपी) ग्राम बिजोत्पादन करण्याची मोहीम जिल्ह्यात मागील वर्षी राबविण्यात आली होती. परंतु, लागवडीचे उद्दिष्ट कमी मिळाल्याने शेतकऱ्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे बियाणे मिळावे, यासाठी खासगी कंपन्यांकडे धाव घेण्याची गरज उरणार नाही हा अभियानाचा मुख्य हेतू आहे. सर्वच तालुकयात अभियानाची सुरुवात झाली होती. मागील वर्षी राज्यातील २२ जिल्ह्यामध्ये दोन लाख १४ हजार हेक्टर क्षेत्रावर ग्राम बिजोत्पादन झाले. जिल्ह्यासाठी उद्दिष्ट कमी मिळाल्याने अनेक शेतकरी सहभागी होऊ शकले नाही. त्यामुळे ग्राम बिजोत्पादन मोहिमेअंतर्ग उत्तम दर्जाचे बियाणे मिळणे कठीण झाले होते. दरम्यान कृषी विभागाने मोहिमेची व्याप्ती वाढवून यंदाच्या खरीप हंगामात १२७० हेक्टर क्षेत्रावर वाढविण्याचा निर्णय घेतला. संबंधित अधिकारी व महाबीजचे पथक योजनेची माहिती शेतकºयांना देण्याचे नियोजन केले. काही तालुक्यांतील शेतीच्या बांधावर जावून योजनेत सहभागी होण्याचे सांगितले जात आहे. शेतकºयांचा मोहिमेत सहभाग वाढला तर सोयाबिनचे दर्जेदार बियाणे विकत घेण्यासाठी कंपन्यांवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. दरम्यान जिल्ह्यात मृगाचा पाऊस बरसला. शेतकरी पेरणीपूर्वीची कामे करीत आहेत. बियाणे व खताची जुळवाजुळव करण्यासाठी लगबग सुरू असल्याचे दिसून येते. ग्राम बिजोत्पादन मोहिमेत प्रती हेक्टर १७०० रुपये अनुदान मिळत असल्याने यंदा लागवड क्षेत्र वाढण्याची आशा निर्माण झाली आहे.महाबीज देणार बियाणे, प्रशिक्षणग्राम बिजोत्पादन मोहिमेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना महाबीजकडून सोयाबिन बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रती लाभार्थी एक एकर क्षेत्रामध्ये बियाण्यांची लागवड करता करता येईल. यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून परवानगी घेवून मोहिमेत सहभागी होता येईल. बियाण्यांची लागवड केल्यानंतर पीक फुलोऱ्यावर आले असता महाबीजच्या वतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल.बोगस बियाण्यांना प्रतिबंधयोजनेतील सहभागी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १७०० रुपये अनुदान देण्यात येईल. सोयाबिन बियाणे पुढील हंगामात वापरण्यासाठी ग्राम बिजोत्पादन या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला मार्गदर्शन केले जाणार आहे. बियाण्यांची टंचाई निर्माण होऊ नये. शिवाय खासगी कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारू नये याकरिता मोहिमेत सहभागी होण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी प्रयत्नशिल आहेत.