शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दाक्षिणात्य संस्थांचा विळखा

By admin | Updated: July 14, 2014 23:52 IST

गेल्या पाच वर्षांपासून पश्चिम विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ या तीन जिल्ह्यातील औद्योगिकदृष्ट्या विकसित पट्ट्यातील पालकांना विविध फसवी शैक्षणिक आमिषे दाखवून आंध्र प्रदेशातील अनेक

कुचना : गेल्या पाच वर्षांपासून पश्चिम विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ या तीन जिल्ह्यातील औद्योगिकदृष्ट्या विकसित पट्ट्यातील पालकांना विविध फसवी शैक्षणिक आमिषे दाखवून आंध्र प्रदेशातील अनेक शिक्षण संस्थांच्या दलालांकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. दक्षिण भारतातील प्रामुख्याने हैदराबाद, सिकंदराबाद आणि विजयवाडा ही शहरे त्यांच्या भाषिक आधारावर त्यांच्यापुरती ‘एज्युकेशनल हब’ बनली. दर्जेदार सीबीएसई, एनआयआयटी, इंजिनिअरिंग, मेडिकल पदव्यांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाचे आमिष दाखवून मध्यम तथा श्रीमंत पालक, नोकरी करणाऱ्या कुटुंबातील मुलांची सर्व नियम धाब्यावर बसवून दलालांमार्फत अक्षरश: पळवा- पळवी सुरू केली आहे. दरवर्षी हा प्रकार दरवर्षीच्या जानेवारी- फेब्रुवारीपासून सुरू होतो.या शहरातून अनेक दलाल आपापले लक्ष्य शोधण्यासाठी विदर्भात येत असून दर्जेदार शिक्षण, शाळा- महाविद्यालयाच्या आकर्षक इमारतींचे फोटो, निकालांची टक्केवारी, राष्ट्रीय खेळात चमकलेले विद्यार्थी, यासर्व बाबींसह शालेय इमारत, वसतिगृहाची हायटेक व्यवस्था, महाराष्ट्रीयन जेवणाची सुरेख व्यवस्था या सर्व बाबीत आपण कसे पुढे आहोत, हे सांगून बव्हंंशी मराठी माध्यमांच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कसलीही प्रवेशपूर्व परीक्षा न देता सरळ सीबीएसईच्या वर्गात प्रवेश दिला जातो. त्यासाठी सत्तर हजारांपासून तर सव्वा दोन लाख प्रतिवर्ष फी आकारली जाते. या हायटेक शिक्षण सम्राटांकडून प्रवेश अर्जासह मिळणारे माहितीपत्रक दीड ते दोन हजारांच्या दरात असून एकदा विद्यार्थी आपल्या शाळा- महाविद्यालयात आला की, मग शिक्षकांसह वसतिगृहातील कर्मचारी भाषिक लॉबी तयार करून विद्यार्थ्यांचा शारिरीक व मानसिक छळ करतात, असा अनुभव अनेक पालकांना आला आहे. याशिवाय मेडिकल अ‍ॅडव्हास, शैक्षणिक सहल, स्कूल खर्च, वार्षिक, सहामाही, तिमाही, पालकसभा खर्च आदी विविध कारणे दाखवून पालकांची आर्थिक लुट केली जाते. उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या नादात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे तेथील वातावरणात मन रमले नाही तर तो शिक्षण अर्धवट सोडून परत येतो. तोपर्यंत महाराष्ट्रीतील प्रवेश प्रक्रिया बंद होऊन शैक्षणिक अभ्यासक्रमसुद्धा पुढे गेलेला असतो. प्रवेश फी परत मिळणार नाही, ही चिंंता सोडून शैक्षणिक सत्र वाया जाणार नाही ना, याची चिंता संबंधित पालकाला पडते. जबरदस्तीने एखादा विद्यार्थी तेथे शिकला तरी भाषा, संस्कृती, खानपान कौटुंबिक जिव्हाळा प्रेम या सर्व बाबीपासून तो दुरावला जातो.जिल्ह्याचा शिक्षण विभाग कायद्याने या विषयात काहीही करता येत नसल्याचे सांगून जिल्हा व राज्य बदलण्यासाठी पालकांना बिनदिक्कतपणे परवानगी देत आहे. किमान अशा फसव्या शैक्षणिक दलालांना आवर घालण्यासाठी राज्य शासनाने शैक्षणिक स्थलांतर कायदा बनविण्याची गरज, फसगत झालेल्या अनेक पालकांनी व्यक्त केली आहे. एकूणच नागपूर-पुण्याला शिकविण्याची हौस सध्यातरी संपुष्टात येत असून आता पालकांचा मोठा वर्ग दक्षिणात्यांच्या शैक्षणिक विळख्यात फसत चालला आहे. (वार्ताहर)