शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

अंबुजा प्रकल्पग्रस्तांची सोनापूर ते चंद्रपूर पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:53 IST

अंबुजा कंपनीकडून होत असलेल्या अन्याय आणि फसवणुकीच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पु देशमुख यांच्या नेतृत्वात सोनापूर ते चंद्रपूर अशा पदयात्रेला मंगळवारी सुरूवात केली. या पदयात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देप्रहार संघटनेचे नेतृत्व : आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

आॅनलाईन लोकमतगडचांदूर : अंबुजा कंपनीकडून होत असलेल्या अन्याय आणि फसवणुकीच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पु देशमुख यांच्या नेतृत्वात सोनापूर ते चंद्रपूर अशा पदयात्रेला मंगळवारी सुरूवात केली. या पदयात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. मंगळवारी राजुरा एसडीओ कार्यालयासमोर धरणे देवून ही पदयात्रा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.सोनापूरवरुन जयघोषात निघालेल्या पदयात्रेचे दुपारी गडचांदुरात माजी जि. प. सभापती अरुण निमजे यांनी स्वागत केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनोज भोजेकर उपस्थित होते. त्यानंतर राजुरा येथे पदयात्रा पोहचताच भवानी मंदिर संस्थान, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, आॅटो चालक-मालक संघटना, बार असोसिएशन, गुरुदेव सेवा मंडळ, संघर्ष गृप व टैक्सी चालक-मालक संघटना यांच्याकडूनही स्वागत करण्यात आले. या पदयात्रेचा बोंडे मंगल कार्यालयात आज मुक्काम असून बुधवारी राजुरा येथून ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.अंबुजा प्रकल्पग्रस्तांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात २० जानेवारीपासून चंद्रपुरात बेमुदत उपोषण सुरु केले आहे. परंतु, उपोषणाची अजुनही दखल घेण्यात आली नाही. उलट दबावतंत्राचा प्रयोग होत असल्याने प्रहारने पदयात्रा काढली आहे. अंबुजा प्रकल्पाकरिता १९९९ मध्ये ५२० प्रकल्पग्रस्त शेतकºयांची १२२६ हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आली. परंतु, कित्येक प्रकल्पग्रस्तांना अजुनही स्थायी नोकरी आणि योग्य मोबदला दिला नाही. याच अन्यायाविरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे.