शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे ग्रहण सुटेना !

By admin | Updated: May 4, 2017 00:36 IST

घनकचऱ्याचे योग्य पध्दतीने व्यवस्थापन झाले की शहराचे सौंदर्य फुलते. मात्र हे व्यवस्थापन बिघडले की शहरवासीयांचे आरोग्य बिघडते.

रवी जवळे चंद्रपूरघनकचऱ्याचे योग्य पध्दतीने व्यवस्थापन झाले की शहराचे सौंदर्य फुलते. मात्र हे व्यवस्थापन बिघडले की शहरवासीयांचे आरोग्य बिघडते. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनासाठी शासन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च करते. घनकचऱ्यापासून प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव चंद्रपूर मनपाने अनेक वर्षांपूर्वी म्हणजे चंद्रपुरात नगरपालिका अस्तित्वात होती, तेव्हाच तयार केला. मात्र अद्यापही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा राहू शकला नाही. मागील वर्षीपासून घराघरातून कचरा तर संकलित होत आहे. मात्र कुठलाही प्रकल्प सुरू नसल्याने अनेक वर्षांपासूनचा लाखो टन कचरा डम्पींग यार्डमध्ये अस्ताव्यस्त पडला आहे. या डम्पींग यार्डला अनेक वेळा आगी लागून आधीच प्रदूषित असलेल्या चंद्रपुरातील प्रदूषण आणखी वाढत आहे.शहराचे सौंदर्य कायम रहावे व शहरवासीयांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी प्रत्येक शहरात घनकचऱ्याचे व्यवस्थापन महत्वाचे मानले जाते. मात्र चंद्रपूरसारख्या महानगरात कचऱ्याचे व्यवस्थापन कोलमडले आहे. २००६ पूर्वीच घनकचऱ्याच्या अव्यवस्थापनामुळे निर्माण होणाऱ्या समस्याची पालिकेला जाणीव झाली. मात्र आज ११ वर्षानंतरही यावर रामबाण उपाय मिळाला नाही. जिल्ह्यातील इतर नगरपालिका क्षेत्रातही याहून वेगळी स्थिती नाही. त्यामुळे आधीच प्रदूषणामुळे कोमेजलेल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या माथ्यावर पुन्हा धनकचऱ्याची ‘घाण’ टाकून स्थानिक स्वराज्य संस्था साथीचे आजार पसरविण्यात हातभारच लावत आहेत. चंद्रपूर शहरात २०१२ मध्ये महानगरपालिका अस्तित्वात आली. त्यानंतर शहर विकासात आणि शहराच्या एकूणच चेहऱ्यात आमुलाग्र बदल होतील, अशी चंद्रपूरकरांना अपेक्षा होती. मागील पाच वर्षात काही विकास कामे मार्गी लागले आहेत. शहराचा चेहरामोहराही बदलत चालला आहे. मात्र घनकचऱ्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट होऊ शकली नाही. चंद्रपूर शहरात दररोज ७० ते ८० टन कचरा निघतो. बायपास मार्गावर असलेल्या डंम्पींग यार्डमध्ये हा कचरा जमा केला जातो. घराघरातून कचरा संकलित करण्याची योजना मागील वर्षीपासून अमलात आणली आहे. सुखा आणि ओला कचरा संकलित केला जात आहे. त्यामुळे पूर्वी शहरातील रस्त्यारस्त्यावर पडून असलेला कचरा व घाण आता फारच कमी दृष्टीस पडते. यामुळे निश्चितच शहराचे सौंदर्य वाढत आहे. मात्र हा संकलित केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट होत नाही. शहराला लागूनच असलेल्या बायपास मार्गावरील डम्पींग यार्डमध्ये हा लाखो टन कचरा टाकला जातो. २००६ पूर्वी बायपास मार्गावरील डंम्पींग यार्डमध्ये घनकचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला. शिवाय सरदार पटेल महाविद्यालयाजवळ बायोगॅस प्रकल्पही उभारला. मात्र या प्रकल्पातून कधीच वीज निर्मिती होऊ शकली नाही. त्यानंतर डम्पींग यार्डमधील कचऱ्याच्या माध्यमातून एखादा प्रकल्प उभा राहवा, असा इच्छा बाळगत मनपाने निविदा काढल्या. घनकचरा व्यवस्थापनाची ही प्रक्रिया महागडी असून यातून उत्पन्न निघणार नाही, या विचित्र हेतूने याकडे कुणी गांभीर्याने बघितले नाही. मध्यंतरी नागपूर येथील एका कंपनीला घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट देण्यात आले. ही कंपनी डम्पींग यार्ड परिसरातच प्रकल्प उभारणार होती. मात्र माशी कुठे शिंकली, कळलं नाही. मात्र या कंत्राटदारांनी प्रकल्प न उभारताच पळ काढला. तेव्हापासून या प्रकल्पाचे भिजत घोंगडे सुरू आहे. सध्या या डम्पींग यार्डमध्ये सुमारे अडीच-तीन लाख टन कचरा सैरावैरा पडून आहे. चंद्रपूरच्या बायपास मार्गावरील डम्पींग यार्डजवळून ये-जा करणाऱ्यांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागतो. चक्क परिवहन महामंडळाच्या बसमधील प्रवाशांनाही या ठिकाणाहून बस गेली की नाकावर रुमाल ठेवावा लागतो. विशेष म्हणजे, चंद्रपूरचे प्रदूषण राज्यात कुप्रसिध्द आहे. आता पुन्हा या डम्पींग यार्डमुळे चंद्रपूरच्या प्रदूषणात भर पडत आहे. नव्या पदाधिकाऱ्यांपुढे आव्हानचंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळून अंजली घोटेकर महापौर तर अनिल फुलझेले उपमहापौर झाले आहेत. ते ६ मे रोजी आपला पदभार स्वीकारणार आहेत. चंद्रपुरात इतर समस्या आहेतच; पण घनकचरा व्यवस्थापनाची समस्या बिकट आहे. ही समस्या आजवर सुटू शकली नाही. त्यामुळे ही समस्या सोडविणे नव्या पदाधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे. यार्डमध्ये नेहमी धगधगतेयं आगयेथील बायपास मार्गावर असलेल्या डम्पींग यार्डमध्ये लाखो टन कचरा पडून आहे. या डम्पींग यार्डला अनेकवेळा आग लागत असते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे सर्वत्र धूळ पसरून प्रदूषणात आणखी वाढ होत आहे. केवळ भद्रावतीत प्रकल्पजिल्ह्यात केवळ भद्रावती नगरपालिका क्षेत्रात घनकचऱ्यातून प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून खत निर्मिती केली जाते. वरोरा, ब्रह्मपुरी, राजुरा, बल्लारपूर, मूल, गडचांदूर, चिमूर या नगरपालिका क्षेत्रात डम्पींग यार्ड असले तरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. त्यामुळे या ठिकाणीही कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे हे डम्पींग यार्ड आता डासांचे उत्पत्ती केंद्र झाले आहे.