शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा प्रकल्प जागेच्या वादात अडकला

By admin | Updated: July 5, 2014 01:19 IST

घनकचरा व्यवस्थापन व प्रकल्प निर्मितीचे ग्रहण मागील अनेक वर्षांपासून सुटता सुटत..

चंद्रपूर: घनकचरा व्यवस्थापन व प्रकल्प निर्मितीचे ग्रहण मागील अनेक वर्षांपासून सुटता सुटत नसल्याचे दिसते. नागपूर येथील मे. कन्यका नॉन कन्व्हेशनल एनर्जी प्रा. लि. या कंपनीला या प्रकल्प निर्मितीचे कंत्राट दिले आहे. कंत्राट देताना प्रारंभी सात एकर जागा रिकामी व साफ करून देण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र सदर जागाच उपलब्ध करून दिली नसल्याचे कारण पुढे करून या कंपनीने काम सुरू केले नाही तर महापालिका जागा साफ करून दिल्याचेच सांगत आहे. जागेच्या या वादात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मात्र अडला आहे. विशेष म्हणजे, प्रकल्पच सुरू होऊ न शकल्यामुळे सुमारे पाच लाख टन कचरा डम्पींग यार्डवर पडून आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. केव्हाही पाऊस येण्याची शक्यता आहे. या कचऱ्यामुळे पावसाळ्यात जलप्रदूषणाचाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. चंद्रपुरातून दररोज १३० ते १४० टन कचरा निघतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात घनकचरा बाहेर पडत असतानाही चंद्रपुरात आजवर घनकचरा प्रकल्प उभा होऊ शकला नाही. याशिवाय घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबतही चंद्रपूर दुर्देवीच ठरले. चंद्रपूरमध्ये नगरपालिका अस्तित्वात असताना घनकचरा व्यवस्थापनाचे धिंडवडेच उडाले होते. त्यानंतर आता मागील वर्षी नागपूर येथील मे. कन्यका नॉन कन्व्हेशनल एनर्जी प्रा. लि. या कंपनीला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्मितीचे कंत्राट देण्यात आले. ३१ मे २०१३ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत ठराव क्रमांक ४२ नुसार २३० रुपये प्रति टन या हिशेबाने घनकचरा प्रकल्पाचे कंत्राट मे. कन्यका नॉन कन्व्हेशनल एनर्जी प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले.४ जून २०१३ रोजी वर्क आर्डरही देण्यात आला. यावेळी कारखाना उभारणीसाठी किमान सात एकर जागा कंत्राटी कंपनीला उपलब्ध करून देण्याचा करार झाला होता. ही जागा साफ करून त्याचे सपाटीकरणही करण्यात येणार होते. यातील तीन एकर जागा साफ करून दिल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात मनपाने ही जागाच उपलब्ध करून दिली नसल्याचे मे. कन्यका नॉन कन्व्हेशनल एनर्जी प्रा. लि.चे संचालक विजय भांडारवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. याबाबत त्यांनी अनेकदा महापालिकेकडे पत्र पाठवून लक्ष वेधले. मात्र मनपाने त्यांच्या पत्रव्यवहाराकडे लक्षच दिले नसल्याचेही त्यांनी सांगितले. कारखान्यासाठी अनेक मशनरीज कन्यका कंपनीने दिल्लीतून तयार करवून घेतल्या आहेत. यात सदर कंपनीने कोट्यवधी रुपये लावले आहे. या सर्व मशनरीज चंद्रपूरला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी केव्हाही तयार आहेत, असेही भांडारवार यांनी सांगितले.विशेष म्हणजे, जागेच्या या वादात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मात्र अडून पडला आहे. आतापर्यंत कारखान्याचे काम सुरू होणे अपेक्षित असताना एक वर्षानंतर कामाचा शुभारंभही झालेला नाही. (शहर प्रतिनिधी)