शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

भद्रावतीत उभारला जाऊ शकतो सोलर पॉवर पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:25 IST

सौर उर्जा निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा भद्रावतीच्या परिसरात उपलब्ध असून भारतातील सर्वात मोठा ‘सोलर पॉवर पार्क’ येथील निप्पान डेन्रोच्या जागेवर उभारला जावू शकतो, असे झाल्यास राज्याच्याच नव्हे तर देशाच्या विकासाचा मार्ग भद्रावतीच्या परिसरातून जावू शकेल.

ठळक मुद्देसर्व पायाभूत सुविधा उपलब्ध । निप्पान डेन्रोची जागा प्रकल्पासाठी सर्वोत्तम

सचिन सरपटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : सौर उर्जा निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा भद्रावतीच्या परिसरात उपलब्ध असून भारतातील सर्वात मोठा ‘सोलर पॉवर पार्क’ येथील निप्पान डेन्रोच्या जागेवर उभारला जावू शकतो, असे झाल्यास राज्याच्याच नव्हे तर देशाच्या विकासाचा मार्ग भद्रावतीच्या परिसरातून जावू शकेल.शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनामध्ये ही योजना सामावून घेणे गरजेचे आहे. शाश्वत उर्जा निर्मितीचा प्रदूषणमुक्त पर्याय म्हणून सौर उर्जा हा एक प्रभावी पर्याय म्हणून समोर आला आहे. निप्पॉन डेन्रो वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेली व अद्यापपावेतो कोणताही प्रकल्प न झाल्याने पडित असलेली ११९३.२३ हेक्टर जमीन, आवश्यक असलेला सुर्यप्रकाश, वीज साठविण्यासाठी जवळच असलेले पॉवर ग्रिड, जवळूनच गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या, काही अंतरावरच असलेली वर्धा नदी या सगळ्या बाबी सौर उर्जा निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीसाठी जमेच्या गोष्टी आहे. भद्रावती तालुक्यातील पिपरी, ढोरवासा, तेलवासा, कुनाडा टोला, चारगाव, विंजासन, लोणार (रिठ), रूयाळ (रिठ) व चिरादेवी या गावातील ६६८ शेतकऱ्यांची ११८३.२३ हेक्टर शेतजमीन सन १९९४-९५ मध्ये निप्पॉन डेन्रो वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली. गेल्या २४ वर्षापासून या जागेवर कोणताही प्रकल्प आलेला नाही. सौर उर्जा प्रकल्पाला लागणाºया तापमानाचा विचार केल्यास भद्रावतीचे तापमानही सातत्याने वाढत आहे. भद्रावती परिसरातील निप्पॉन डेन्रोच्या जागेएवढी जागा व इतर मुलभूत गोष्टी शासनाला शोधूनही सापडणार नाही. या ठिकाणी ‘सोलर पॉवर पार्क’ झाल्यास हा पार्क राज्यालाच नव्हे तर देशाला उजळण्याचे काम करेल.सौर उर्जेबाबत शासनही गंभीरस्वत:च्या घरावर एक केव्हीचा घरगुती सौर उर्जा प्रकल्प तयार करण्यासाठी शासन प्रोत्साहित करीत आहे. स्वत:ची वीज स्वत:च तयार करण्याकडे सध्या कल आहे. ज्या कोळशाच्या भरवश्यावर आज वीज निर्मिती होत आहे. त्या कोळसाच्या खाणी बंद पडल्याचे वास्तव आहे. नासाच्या वतीने अंतरिक्षात सौर उर्जा केंद्र स्थापन करून सुक्ष्म लहरीद्वारे सौर उर्जा पृथ्वीवर आणून तिचा वापर करण्यासाठी सध्या संशोधन सुरू आहे, हे विशेष.सौर ऊर्जा ही नैसर्गिक व स्वच्छ ऊर्जा आहे. आज या ऊर्जेची गरज आहे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी या ठिकाणी मुलभूत गोष्टी व पुरेशी जागा उपलब्ध असल्याने शासनाने सोलर पॉवर पॉर्कसाठी विचार करावा. कोळसा आधारित ऊर्जा केंद्रापेक्षा सौर उर्जा ही पर्यावरण पुरक असल्याने अशा प्रकारचे केंद्र या ठिकाणी उभारण्यात यावे.-सुरेश चोपणेअध्यक्ष ग्रिन प्लॅननेट सोसायटी, चंद्रपूर.सध्या चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान राज्यात सर्वाधिक नोंदविले जात आहे. वाढत्या विजेला व संपणाºया कोळशाला गांभीर्याने घेणे आवश्यक असून सौर उर्जा हाच एकमेव पर्याय आहे. यासाठी येथील प्रशासनाने पठापुरावा करणे व शासनाने त्याची दखल घेणे गरजेचे आहे. असे झाल्यास पर्यायाने भद्रावतीचाही सर्वच बाबतीत मोठ्या प्रमाणात विकास होईल. या क्षेत्रात निरनिराळे प्रकल्प येणार असे सांगण्यात आले. वास्तव काय आहे ते काळच सांगेल.

टॅग्स :electricityवीज