शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
3
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
4
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
7
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
8
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
9
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
10
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
11
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
12
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
13
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
14
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
15
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
16
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
17
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
18
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
19
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
20
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?

भद्रावतीत उभारला जाऊ शकतो सोलर पॉवर पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:25 IST

सौर उर्जा निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा भद्रावतीच्या परिसरात उपलब्ध असून भारतातील सर्वात मोठा ‘सोलर पॉवर पार्क’ येथील निप्पान डेन्रोच्या जागेवर उभारला जावू शकतो, असे झाल्यास राज्याच्याच नव्हे तर देशाच्या विकासाचा मार्ग भद्रावतीच्या परिसरातून जावू शकेल.

ठळक मुद्देसर्व पायाभूत सुविधा उपलब्ध । निप्पान डेन्रोची जागा प्रकल्पासाठी सर्वोत्तम

सचिन सरपटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : सौर उर्जा निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा भद्रावतीच्या परिसरात उपलब्ध असून भारतातील सर्वात मोठा ‘सोलर पॉवर पार्क’ येथील निप्पान डेन्रोच्या जागेवर उभारला जावू शकतो, असे झाल्यास राज्याच्याच नव्हे तर देशाच्या विकासाचा मार्ग भद्रावतीच्या परिसरातून जावू शकेल.शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनामध्ये ही योजना सामावून घेणे गरजेचे आहे. शाश्वत उर्जा निर्मितीचा प्रदूषणमुक्त पर्याय म्हणून सौर उर्जा हा एक प्रभावी पर्याय म्हणून समोर आला आहे. निप्पॉन डेन्रो वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेली व अद्यापपावेतो कोणताही प्रकल्प न झाल्याने पडित असलेली ११९३.२३ हेक्टर जमीन, आवश्यक असलेला सुर्यप्रकाश, वीज साठविण्यासाठी जवळच असलेले पॉवर ग्रिड, जवळूनच गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या, काही अंतरावरच असलेली वर्धा नदी या सगळ्या बाबी सौर उर्जा निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीसाठी जमेच्या गोष्टी आहे. भद्रावती तालुक्यातील पिपरी, ढोरवासा, तेलवासा, कुनाडा टोला, चारगाव, विंजासन, लोणार (रिठ), रूयाळ (रिठ) व चिरादेवी या गावातील ६६८ शेतकऱ्यांची ११८३.२३ हेक्टर शेतजमीन सन १९९४-९५ मध्ये निप्पॉन डेन्रो वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली. गेल्या २४ वर्षापासून या जागेवर कोणताही प्रकल्प आलेला नाही. सौर उर्जा प्रकल्पाला लागणाºया तापमानाचा विचार केल्यास भद्रावतीचे तापमानही सातत्याने वाढत आहे. भद्रावती परिसरातील निप्पॉन डेन्रोच्या जागेएवढी जागा व इतर मुलभूत गोष्टी शासनाला शोधूनही सापडणार नाही. या ठिकाणी ‘सोलर पॉवर पार्क’ झाल्यास हा पार्क राज्यालाच नव्हे तर देशाला उजळण्याचे काम करेल.सौर उर्जेबाबत शासनही गंभीरस्वत:च्या घरावर एक केव्हीचा घरगुती सौर उर्जा प्रकल्प तयार करण्यासाठी शासन प्रोत्साहित करीत आहे. स्वत:ची वीज स्वत:च तयार करण्याकडे सध्या कल आहे. ज्या कोळशाच्या भरवश्यावर आज वीज निर्मिती होत आहे. त्या कोळसाच्या खाणी बंद पडल्याचे वास्तव आहे. नासाच्या वतीने अंतरिक्षात सौर उर्जा केंद्र स्थापन करून सुक्ष्म लहरीद्वारे सौर उर्जा पृथ्वीवर आणून तिचा वापर करण्यासाठी सध्या संशोधन सुरू आहे, हे विशेष.सौर ऊर्जा ही नैसर्गिक व स्वच्छ ऊर्जा आहे. आज या ऊर्जेची गरज आहे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी या ठिकाणी मुलभूत गोष्टी व पुरेशी जागा उपलब्ध असल्याने शासनाने सोलर पॉवर पॉर्कसाठी विचार करावा. कोळसा आधारित ऊर्जा केंद्रापेक्षा सौर उर्जा ही पर्यावरण पुरक असल्याने अशा प्रकारचे केंद्र या ठिकाणी उभारण्यात यावे.-सुरेश चोपणेअध्यक्ष ग्रिन प्लॅननेट सोसायटी, चंद्रपूर.सध्या चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान राज्यात सर्वाधिक नोंदविले जात आहे. वाढत्या विजेला व संपणाºया कोळशाला गांभीर्याने घेणे आवश्यक असून सौर उर्जा हाच एकमेव पर्याय आहे. यासाठी येथील प्रशासनाने पठापुरावा करणे व शासनाने त्याची दखल घेणे गरजेचे आहे. असे झाल्यास पर्यायाने भद्रावतीचाही सर्वच बाबतीत मोठ्या प्रमाणात विकास होईल. या क्षेत्रात निरनिराळे प्रकल्प येणार असे सांगण्यात आले. वास्तव काय आहे ते काळच सांगेल.

टॅग्स :electricityवीज