शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सौर कुंपणातून होणार शेतपिकाचे रक्षण

By admin | Updated: July 16, 2015 01:21 IST

देशाचा पोशींदा असलेल्या शेतकऱ्याला कधी निसर्ग तर कधी व्यापारी नाडवतात.

ब्रह्मपुरी वनविभागाचा उपक्रम : संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या गावात देणार सौर कुंपणखडसंगी : देशाचा पोशींदा असलेल्या शेतकऱ्याला कधी निसर्ग तर कधी व्यापारी नाडवतात. त्यामुळे शेतकरी सदा आर्थिक संकटात असतो तर शेतात लावलेली पिके हातात येण्याच्या आधीच जंगली जनावराद्वारे नष्ट करतात. त्यामुळे हवालदील शेतकऱ्याला शेतपिकाच्या रक्षणासाठी सौरकुंपन ७५ टक्के सुटीवर देण्यात येणार आहे. वन विभागाच्या माध्यमातून ही योजना चिमूर वनपरिक्षेत्रातील संयुक्त वन व्यवस्थापन समित्या असलेल्या गावात राबविण्यात असून सौर कुंपणामुळे जंगलालगत असलेल्या शेतीचे वन्य प्राण्यापासून रक्षण होणार आहे.ब्रह्मपुरी वनविभागातील चिमूर वनपरिक्षेत्रालगत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे घनदाट जंगल आहे. त्यामुळे या परिसरात नेहमी जंगली प्राण्यांचा वावर असतो. या जंगलालगतच्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीसुद्धा जंगला लगतच आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांचा शेतीचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मात्र वनविभागाकडून अल्प प्रमाणात मदत देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली जाते. या मदतीकरिता शेतकऱ्यांना अनेकदा वनविभागाचा पायऱ्या झिजवाव्या लागतात. यामध्ये अनेक शेतकरी त्रस्त होवून मदतीवर पाणी फेरतात. जंगलालगत असलेल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या रक्षणासाठी जांगल करावी लागते. या दरम्यान अनेक शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होऊन जीव गमवावे लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तरी मात्र शेतकरी जीव मुठीत घेऊन आपली वर्षभराची पूंजीच्या रक्षणासाठी शेतावर जागलीला जातात. वनविभागाकडून देण्यात येणारे सौर कुंपन केल्यास अशा शेतकऱ्यांची जागल करण्यापासून सुटका होणार असून शेतकरी सुखाने बिनधास्त घरी झोपू शकतील. चिमूर वनपरिक्षेत्रातील संयुक्त वन व्यवस्थापन समिती असलेल्या गावात सौर कुंपन देण्यात येणार आहे. या सौर कुंपनाची मुळ किंमत बारा हजार ५०० रुपये असून यामध्ये शेतकऱ्यांना ७५ टक्के सुटीवर हे सौर कुंपण देण्यात येणार आहे. याकरिता ज्या गावात संयुक्त वन व्यवस्थापन समिती कार्यरत आहेत अशा गावाचा प्रथम समावेश करण्यात आला आहे. चिमूर क्षेत्रात सोनेगाव (वन) शिवापूर (बदर), शेडेगाव उरकुडपार, लावारी (भिसी) नवेगाव (रमण) शंकरपूर ईरव्हा, डोंगरगाव आणि झरी या गावापैकी उरकुडपार येथील ३५ शेतकऱ्यांनी या सौर कुंप्ण योजनेची रक्कम वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सचिवाकडे जमा झालेली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उरकुडपार येथे शेतकऱ्यांच्या शेतात सौर कुंपन लावण्यात येणार आहे.सौर कुंपण उपक्रमाकरिता ब्रह्मपुरी वनविभागाने मुकेश सोलर सिसीम या कंपनी सोबत करार केला असून या सोलर युनिटमध्ये १२ व्हॅटची इलेक्ट्रीक बॅटरी तर २५ वॅटची सोलर पॅनल राहणार आहे. हे युनिट १८ ते २४ तास काम करणार असून या सौर कुंपणापासून कुठलीही हानी होणार नसून फक्त प्राण्यांना (झीन- झीन्या) मोदरा येणार आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा प्राणी शेतात येणार नसल्याचे मुकेश सोलर सिस्टीमच्या संचालकांनी ‘लोकमत’शी बोलतना सांगितले. (वार्ताहर)