शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

कोरोनाचा कहर सुरू असतानाही सोशल डिस्टन्सिंग धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:01 IST

चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारपर्यंत ५५१ रूग्ण कोरोना बाधित झाल्याचे उघडकीस आल्याने प्रशासकीय वर्तुळातही आता चिंता व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत २४ हजार १४३ संशयीत व्यक्तींचे नमूने घेतले. यातील २२ हजार ८५५ व्यक्तींचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्यापासून बाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे.

ठळक मुद्देनिष्काळजीपणा महागात पडणार : सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणून जीवनावश्यक दुकानांसह बहुतांश दुकाने सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवागनी दिली. १ ते ३१ जुलैपर्यंत कलम १४४ लागू करून जमावबंदीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला. मात्र, प्रशासनाने सातत्याने सूचना देवूनही नागरिकांकडून जमावबंदी धाब्यावर ठेवल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. सहा फुटाचे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यातही नागरिक कुचराई करीत असल्याने कोरोनाच्या उद्रेकाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारपर्यंत ५५१ रूग्ण कोरोना बाधित झाल्याचे उघडकीस आल्याने प्रशासकीय वर्तुळातही आता चिंता व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत २४ हजार १४३ संशयीत व्यक्तींचे नमूने घेतले. यातील २२ हजार ८५५ व्यक्तींचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्यापासून बाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. जुलै महिन्यात दररोज सुमारे १५ ते १८ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची नोंद आहे. कोरोनाचा कहर असा सुरू राहिल्यास परिस्थिती हाताबाहेर जावू शकते, ही शक्यता लक्षात घेवून प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपयायोजना सुरू केल्या. वेगवगळ्या माध्यमांतून जागृती सुरू असूनही नागरिक सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी करीत आहेत.दुकानांसमोरील सॅनिटायझर हटविलेदुकाने सुरू करण्यास परवानगी दिल्याने आर्थिक व्यवहार हळूहळू रूळावर येत आहेत. कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतानाही जिल्ह्यात जीवनाश्यक वस्तुंची दुकाने सुरू ठेवण्यास एक तासांचा जादा कालावधी देण्यात आला. ग्राहक दुकानात आल्यास आधी हात धुण्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. लॉकडाऊन काळात बहुतांश दुकानदारांनी या सूचनांचे पालन केले होते. मात्र, आता बºयाच व्यावसायिकांनी स्वत:च्या दुकानासमोर सॅनिटायझर बॉटल हटविल्याचे दिसून येत आहे.फक्त मास्क न वापरणाऱ्यांविरूद्धच कारवाईसार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्यांविरूद्ध प्रशासनाकडून २०० रूपयांचा दंड आकारला जात आहे. संबंधित व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १८८, २६९, २७०, २७१ अन्वये कारवाई सुरू आहे. मात्र,चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील तालुकास्थळावरील मुख्य बाजारपेठ, वर्दळीच्या सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येत असतानाही प्रशासनाकडून बघ्याची भूमिका घेणे सुरू असल्याचा आरोप काही जागरूक नागरिकांनी केला आहे. रविवारी चंद्रपूर शहरातील बाजार सुरू होता. या बाजारातही प्रचंड गर्दी दिसून आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या