शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

सामजिक बांधिलकी; कोरोना संकटात व्हॉट्सअप समुहाने पुरविले ऑक्सिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 13:28 IST

corona, Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यातील श्रीकृष्ण व्हॉट्सअप समुहाने सुरू केलेल्या उपक्रमामुळे गंभीर व गरजु रूग्णांना ऑक्सिजन पुरविण्यात येणार आहे. समाज माध्यमांच्या योग्य वापर करणारे नागरिक पुढे आले तर यातून लोकोपयोगी चळवळ उभी राहू शकते.

ठळक मुद्दे कोणत्याही कारमध्ये ठेवतो सिलिंडर

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मोबाईल व्हॉटसअ‍ॅपमुळे जग जवळ आले. काही व्यक्ती याचा वापर चांगल्याच कामासाठी करतात असे ठामपणे म्हणता येत नाही. चॅटींग, चिटिंग करण्यात वेळ घालण्याची शक्यताही असते. मात्र, सामाजिक बांधिलकी जोपासून कोरोना महामारीच्या काळात मदत करणारे विरळेच असतात. कोरोनामुळे ऑक्सिजन पातळी कमी होते, हे डॉक्टरांकडून कळताच शहरातील श्रीकृष्ण व्हॉटसअ‍ॅप समुहाच्या सदस्यांनी अवघ्या तासातच ७५ हजार रूपयांचा निधी गोळा केला. त्यातून ऑक्सिजन सिलिंडर व साहित्य विकत घेवून गुरूवारी स्थानिक गांधी चौकात नागरिकांना समर्पित केले.कोरोनाचा संसर्ग सुरू असल्याने ऑक्सिजनचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला. गंभीर रूग्णाला ऑक्सिजन मिळेल याची खात्री नाही. त्यामुळे श्रीकृष्ण व्हॉट्सअप ग्रुपचे अभियंता किशोर कापगते व सहकाऱ्यांनी शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी ऑक्सिजन मशीन घेण्याची कल्पना मांडली. सर्वांनी हा उपक्रम उचलून धरला. सदस्यांनी श्रीकृष्ण समुहावर मदत करण्याचे संदेश व्हायरल केले. अवघ्या काही तासातच कुणी रोख तर कुणी गुगल पे वरून मदत केल्याने ७५ हजारांचा निधी जमा झाला. या रकमेतून ऑक्सिजन सिलिंडर घेण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही कारमध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी लावता येईल, अशा प्रकारचे ऑक्सिजन सिलिंडर विकत घेण्यात आले. श्रीकृष्ण समूहाच्या वर्धापन दिनी गुरूवारी ग्रुप सदस्य व सेवाभावी व्यावसायिक जीवन कोंतमवार, नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांच्या हस्ते महात्मा गांधी चौकात नागरिकांना समर्पित करण्यात आले.

रूग्णांना मिळणार जीवदानश्रीकृष्ण व्हॉट्सअप समुहाने सुरू केलेल्या उपक्रमामुळे गंभीर व गरजु रूग्णांना ऑक्सिजन पुरविण्यात येणार आहे. समाज माध्यमांच्या योग्य वापर करणारे नागरिक पुढे आले तर यातून लोकोपयोगी चळवळ उभी राहू शकते. कोरोनामुळे माणसे एकमेकांपासून दूर जावे नये, यासाठी अशा सेवाभावी व्यक्तींची गरज आहे. विनाकारण समाजात तेढ निर्माण करण्यापेक्षा जनकल्याण्याचे उपक्रम राबविले तर अनेकांचे जीव वाचवा येवू शकते, हे या ग्रुपने सिद्ध करून दाखवले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस