शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

नागपंचमीला सापाला पूजले जाते; मग इतर दिवशी का मारले जाते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:32 IST

चंद्रपूर जिल्ह्यात आढळणाऱ्या सुमारे ३२ सापांपैकी केवळ सहा प्रकारचे साप विषारी आहेत, अशी माहिती वन विभागाच्या अहवालात नमूद आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यात आढळणाऱ्या सुमारे ३२ सापांपैकी केवळ सहा प्रकारचे साप विषारी आहेत, अशी माहिती वन विभागाच्या अहवालात नमूद आहे. ग्रामीणच नव्हे तर शहरी भागातील नागरिकांतही सापांविषयी अज्ञान असल्याने बऱ्याच बिनविषारी सापांना विनाकारण मारून टाकण्याच्या घटना घडत आहेत. बिनविषारी, निमविषारी व विषारी अशा प्रकारे सापांचे वर्गीकरण केले जाते. बिनविषारी साप चावला तर कोणताही धोका संभवत नाही. निमविषारी साप हे विषारीच असतात; परंतु त्यांच्या दंशामुळे जीव जाईल इतका धोका नसतो. मात्र, विषारी साप प्राणघातक असतो. वन्यजीव संरक्षण संस्था, आरोग्य विभाग व वन विभागाच्या वतीने नागरिकांमध्ये जागृती कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, नागरिकांच्या मनातील गैरसमज अजूनही पूर्णत: दूर झालेले नाहीत. त्यासाठी प्रबोधनाचा रेटा वाढविणे हाच पर्याय असल्याचे सर्पमित्रांचे म्हणणे आहे.

बॉक्स

साप हा तर शेतकऱ्यांचा मित्र

साप हे उंदीर, घूस अशा धान्याचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांना खातात. त्यामुळे सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. सापाला न मारता सर्पमित्रांना बोलावून त्याला जीवदान द्यावे. निसर्गातील अन्नसाखळी कायम ठेवण्यासाठी सापांचे अस्तित्व टिकले पाहिजे, असे आवाहन चंद्रपूरच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयानेही केले आहे.

सर्पमित्र काय म्हणतात...

कोणताही साप जाणीवपूर्वक दंश करीत नाही. स्वत:चा जीव वाचविण्यासाठी साप प्रतिकार करतो. डूख धरणे यासारख्या कल्पना चुकीच्या व अशास्त्रीय आहेत. सापाबद्दल असलेल्या भीतीचा फटका बिनविषारी सापांना बसतो. नागपंचमीनिमित्त सापांची पूजा करण्यापेक्षा त्यांच्याबद्दल शास्त्रीय माहिती घेऊन त्यांना वाचविण्याचा संकल्प केल्यास हा सण अधिक आनंददायी होईल, असे मत चंद्रपूर येथील सर्पमित्र प्रवीण कडू यांनी व्यक्त केले.

विषारी : नाग, घोणस, मण्यार, फुरसे, पोवळा, चापडा.

बिनविषारी : अजगर, धामण, तस्कर, गवत्या, दिवड, नानेटी, धूळनागीण, पहाडी तस्कर, कवड्या, पट्टेरी कवड्या, कुकरी, व्हेरिगेटेड कुकरी, वाळा, चंचू वाळा, डुरक्या घोणस, मांडूळ, रुका, खापरखवल्या, ब्लॅक हेडेड (काळतोंड्या).

साप आढळला तर...

साप आढळला तर त्याला ठार न मारता सर्पमित्राला तत्काळ बोलवावे. मांत्रिक व अंधश्रद्धेला बळी पडू नये. सर्पमित्र सापाला पकडून त्याच्या मूळ अधिवासात सुरक्षित सोडतात. दंश केलाच तर मानसिकदृष्ट्या खचू नये. त्या व्यक्तीला धीर द्यावा, स्वच्छ आवळपट्टी दंश झालेल्या जागेपासून एक फूट अंतरावर बांधावी. रुग्णाला तत्काळ उपचारासाठी न्यावे. शासकीय रुग्णालयात यावर उपचार मोफत होतो. सर्पदंशावर परिणामकारक औषध फक्त प्रतिसर्पविषच (एएसव्ही) आहे, हे लक्षात ठेवावे, अशी माहिती सर्पमित्र प्रवीण कडू यांनी दिली.