शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

नागपंचमीला सापाला पूजले जाते; मग इतर दिवशी का मारले जाते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:32 IST

चंद्रपूर जिल्ह्यात आढळणाऱ्या सुमारे ३२ सापांपैकी केवळ सहा प्रकारचे साप विषारी आहेत, अशी माहिती वन विभागाच्या अहवालात नमूद आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यात आढळणाऱ्या सुमारे ३२ सापांपैकी केवळ सहा प्रकारचे साप विषारी आहेत, अशी माहिती वन विभागाच्या अहवालात नमूद आहे. ग्रामीणच नव्हे तर शहरी भागातील नागरिकांतही सापांविषयी अज्ञान असल्याने बऱ्याच बिनविषारी सापांना विनाकारण मारून टाकण्याच्या घटना घडत आहेत. बिनविषारी, निमविषारी व विषारी अशा प्रकारे सापांचे वर्गीकरण केले जाते. बिनविषारी साप चावला तर कोणताही धोका संभवत नाही. निमविषारी साप हे विषारीच असतात; परंतु त्यांच्या दंशामुळे जीव जाईल इतका धोका नसतो. मात्र, विषारी साप प्राणघातक असतो. वन्यजीव संरक्षण संस्था, आरोग्य विभाग व वन विभागाच्या वतीने नागरिकांमध्ये जागृती कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, नागरिकांच्या मनातील गैरसमज अजूनही पूर्णत: दूर झालेले नाहीत. त्यासाठी प्रबोधनाचा रेटा वाढविणे हाच पर्याय असल्याचे सर्पमित्रांचे म्हणणे आहे.

बॉक्स

साप हा तर शेतकऱ्यांचा मित्र

साप हे उंदीर, घूस अशा धान्याचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांना खातात. त्यामुळे सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. सापाला न मारता सर्पमित्रांना बोलावून त्याला जीवदान द्यावे. निसर्गातील अन्नसाखळी कायम ठेवण्यासाठी सापांचे अस्तित्व टिकले पाहिजे, असे आवाहन चंद्रपूरच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयानेही केले आहे.

सर्पमित्र काय म्हणतात...

कोणताही साप जाणीवपूर्वक दंश करीत नाही. स्वत:चा जीव वाचविण्यासाठी साप प्रतिकार करतो. डूख धरणे यासारख्या कल्पना चुकीच्या व अशास्त्रीय आहेत. सापाबद्दल असलेल्या भीतीचा फटका बिनविषारी सापांना बसतो. नागपंचमीनिमित्त सापांची पूजा करण्यापेक्षा त्यांच्याबद्दल शास्त्रीय माहिती घेऊन त्यांना वाचविण्याचा संकल्प केल्यास हा सण अधिक आनंददायी होईल, असे मत चंद्रपूर येथील सर्पमित्र प्रवीण कडू यांनी व्यक्त केले.

विषारी : नाग, घोणस, मण्यार, फुरसे, पोवळा, चापडा.

बिनविषारी : अजगर, धामण, तस्कर, गवत्या, दिवड, नानेटी, धूळनागीण, पहाडी तस्कर, कवड्या, पट्टेरी कवड्या, कुकरी, व्हेरिगेटेड कुकरी, वाळा, चंचू वाळा, डुरक्या घोणस, मांडूळ, रुका, खापरखवल्या, ब्लॅक हेडेड (काळतोंड्या).

साप आढळला तर...

साप आढळला तर त्याला ठार न मारता सर्पमित्राला तत्काळ बोलवावे. मांत्रिक व अंधश्रद्धेला बळी पडू नये. सर्पमित्र सापाला पकडून त्याच्या मूळ अधिवासात सुरक्षित सोडतात. दंश केलाच तर मानसिकदृष्ट्या खचू नये. त्या व्यक्तीला धीर द्यावा, स्वच्छ आवळपट्टी दंश झालेल्या जागेपासून एक फूट अंतरावर बांधावी. रुग्णाला तत्काळ उपचारासाठी न्यावे. शासकीय रुग्णालयात यावर उपचार मोफत होतो. सर्पदंशावर परिणामकारक औषध फक्त प्रतिसर्पविषच (एएसव्ही) आहे, हे लक्षात ठेवावे, अशी माहिती सर्पमित्र प्रवीण कडू यांनी दिली.