शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

झोपडीत दरवळला यशाचा सुवास !

By admin | Updated: June 18, 2014 00:08 IST

यशाचा सुगंध लपत नसतो, हे पुन्हा चंद्रपुरातील वृषभच्या यशाने सिद्ध झाले आहे. बाबूपेठमधील झोपडपट्टीत केवळ एका खोलीच्या घरात राहणाऱ्या; घरी दारिद्रय असलेल्या वृषभ कालिदास तेलसे या प्रतिभावंताच्या यशाला

गोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूरयशाचा सुगंध लपत नसतो, हे पुन्हा चंद्रपुरातील वृषभच्या यशाने सिद्ध झाले आहे. बाबूपेठमधील झोपडपट्टीत केवळ एका खोलीच्या घरात राहणाऱ्या; घरी दारिद्रय असलेल्या वृषभ कालिदास तेलसे या प्रतिभावंताच्या यशाला परिस्थिती रोखू शकली नाही, हेच यंदाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे.चंद्रपुरातील बाबूपेठ परिसरातील समता चौकालगतच्या एका गल्लीत तो राहतो. त्याचे वडील लोकांच्या कपड्यांना इस्त्री करून कुटुंब चालवितात. आई हाताला मिळेल ते काम करून कुटुंबाचा गाडा ओढते. वडील बीए तर, आई बारावीपर्यंत शिक्षण घेतलेली. वडिलाचे सातत्याने मार्गदर्शन असायचे. या वातावरणावरही वृषभने मात केली. त्याच्या यशाचे ‘लोकमत’पर्यंत पोहचले तेव्हा, त्याचे छायाचित्र घेण्यासाठी ही चमू घरी पोहचली. मात्र मुलाच्या यशाचे कौतूक करावे म्हणून पेढा भरविण्याएवढेही पैसेही या मातेजवळ नव्हते. घराचे छप्पर एवढे फाटलेले, की अवचित आलेल्या पावसाने घरभर पाणी पसरलेले ! परिस्थितीने या कुटुंबाच्या आनंदावर मात केली असली तरील, वृषभने मात्र अपार यश गाठून आपल्या यशाने या सर्व परिस्थितीवरच मात केली आहे. या यशाबद्दल त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला, तीन वर्षापूर्वी आपण मोबाईलवर व्हिडीओ क्लिप बघितली. ‘आपले स्वप्न मनात ठेवा, त्यावर सातत्याने विचार करा आणि मोठे व्हा’, असे त्या क्लिपमध्ये दाखविण्यात आले होते. तेव्हापासूनच आपण प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उरात बाळगले. दहावीमध्ये किमान ९८ टक्के गुण मिळविण्याचा ध्यास घेतला. आपल्या घरच्या आरश्याजवळ मोठ्या अक्षरात ‘आपल्याला दहाव्या वर्गात १०० टक्के गुण घ्यायचे आहे’, अशी पट्टी चिपकवून ठेवली. अभ्यासातील सातत्य आणि शिक्षकांच्या परिश्रमामुळे आपल्याला ९७ टक्के गुण मिळाल्याचे त्याने सांगितले.दरवर्षी दहावी-बारावीचे निकाल लागल्यानंतर अनेकांचे फोटो पेपरमध्ये येतात. आपलाही यावा असे मनात वाटत होते. रोज चार ते सहा तास अभ्यास आणि शिक्षकांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे आपण यश मिळवू शकल्याचे तो म्हणाला. आपण आयआयटी इंजिनिअरिंग करणार असून त्यानंतर युपीएससीची तयारी करून प्रशासकीय सेवेत जाऊन सामान्य नागरिकांची सेवा करणार असल्याचा त्याचा निर्धार आहे.