शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

झोपडीत दरवळला यशाचा सुवास !

By admin | Updated: June 18, 2014 00:08 IST

यशाचा सुगंध लपत नसतो, हे पुन्हा चंद्रपुरातील वृषभच्या यशाने सिद्ध झाले आहे. बाबूपेठमधील झोपडपट्टीत केवळ एका खोलीच्या घरात राहणाऱ्या; घरी दारिद्रय असलेल्या वृषभ कालिदास तेलसे या प्रतिभावंताच्या यशाला

गोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूरयशाचा सुगंध लपत नसतो, हे पुन्हा चंद्रपुरातील वृषभच्या यशाने सिद्ध झाले आहे. बाबूपेठमधील झोपडपट्टीत केवळ एका खोलीच्या घरात राहणाऱ्या; घरी दारिद्रय असलेल्या वृषभ कालिदास तेलसे या प्रतिभावंताच्या यशाला परिस्थिती रोखू शकली नाही, हेच यंदाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे.चंद्रपुरातील बाबूपेठ परिसरातील समता चौकालगतच्या एका गल्लीत तो राहतो. त्याचे वडील लोकांच्या कपड्यांना इस्त्री करून कुटुंब चालवितात. आई हाताला मिळेल ते काम करून कुटुंबाचा गाडा ओढते. वडील बीए तर, आई बारावीपर्यंत शिक्षण घेतलेली. वडिलाचे सातत्याने मार्गदर्शन असायचे. या वातावरणावरही वृषभने मात केली. त्याच्या यशाचे ‘लोकमत’पर्यंत पोहचले तेव्हा, त्याचे छायाचित्र घेण्यासाठी ही चमू घरी पोहचली. मात्र मुलाच्या यशाचे कौतूक करावे म्हणून पेढा भरविण्याएवढेही पैसेही या मातेजवळ नव्हते. घराचे छप्पर एवढे फाटलेले, की अवचित आलेल्या पावसाने घरभर पाणी पसरलेले ! परिस्थितीने या कुटुंबाच्या आनंदावर मात केली असली तरील, वृषभने मात्र अपार यश गाठून आपल्या यशाने या सर्व परिस्थितीवरच मात केली आहे. या यशाबद्दल त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला, तीन वर्षापूर्वी आपण मोबाईलवर व्हिडीओ क्लिप बघितली. ‘आपले स्वप्न मनात ठेवा, त्यावर सातत्याने विचार करा आणि मोठे व्हा’, असे त्या क्लिपमध्ये दाखविण्यात आले होते. तेव्हापासूनच आपण प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उरात बाळगले. दहावीमध्ये किमान ९८ टक्के गुण मिळविण्याचा ध्यास घेतला. आपल्या घरच्या आरश्याजवळ मोठ्या अक्षरात ‘आपल्याला दहाव्या वर्गात १०० टक्के गुण घ्यायचे आहे’, अशी पट्टी चिपकवून ठेवली. अभ्यासातील सातत्य आणि शिक्षकांच्या परिश्रमामुळे आपल्याला ९७ टक्के गुण मिळाल्याचे त्याने सांगितले.दरवर्षी दहावी-बारावीचे निकाल लागल्यानंतर अनेकांचे फोटो पेपरमध्ये येतात. आपलाही यावा असे मनात वाटत होते. रोज चार ते सहा तास अभ्यास आणि शिक्षकांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे आपण यश मिळवू शकल्याचे तो म्हणाला. आपण आयआयटी इंजिनिअरिंग करणार असून त्यानंतर युपीएससीची तयारी करून प्रशासकीय सेवेत जाऊन सामान्य नागरिकांची सेवा करणार असल्याचा त्याचा निर्धार आहे.