शहरं
Join us  
Trending Stories
1
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
2
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
3
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
4
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
5
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
8
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
9
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
10
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
11
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
12
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
13
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
14
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
15
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
16
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
17
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
18
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
19
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी स्मार्ट योजना येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 06:00 IST

जिल्ह्यातील पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे. त्यांना अपेक्षित रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे ही प्राथमिक जबाबदारी असेल. सोबतच शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी सिंचन सुविधा येत्या ३ वर्षांच्या काळात उपलब्ध करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार असल्याचेही ना. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : जिल्ह्याचा समतोल विकास साधणार, बेरोजगारांचे प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने चंद्रपूर जिल्ह्याचा समतोल विकास साधण्यावर आपला भर राहणार आहे. माझा मतदार संघ ब्रह्मपुरी असला तरी जिल्ह्यातील सर्वच मतदार संघामध्ये विकास घडवून आणायचा आहे. यामध्ये शेतकरी आणि बेरोजगारांच्या प्रश्नांना प्राधान्यक्रम राहिल. याच अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात एक स्मार्ट योजना लवकरच येणार असल्याची माहितीही सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमीनी विकास, मदत व पुनर्वसन मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.महाविकास आघाडीमध्ये कॅबिनेट मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर विजय वडेट्टीवार पहिल्यांदाच चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहे. दरम्यान, येथील गांधी चौकात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.जिल्ह्यातील पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे. त्यांना अपेक्षित रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे ही प्राथमिक जबाबदारी असेल. सोबतच शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी सिंचन सुविधा येत्या ३ वर्षांच्या काळात उपलब्ध करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार असल्याचेही ना. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.अलीकडेच राज्याच्या कॅबिनेटमध्ये एका स्मार्ट योजनेवर प्रात्याक्षिक झाले. जागतिक बँकेच्या सहकार्याने ही योजना आखली जात आहे. ही योजना विशेष करून शेतकरी व बेरोजगारांना केंद्रस्थानी ठेवून आखण्यात येत आहे. शेतकरी आणि व्यापारी यामध्ये शेतकऱ्यांना होणाऱ्या तोट्याचे फायद्यात रुपांतर करणे हा योजनेचा मुख्य हेतू असणार आहे. ज्या भागात जी पिके घेतली जातात. त्या भागात त्याच पिकावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारले जाण्यावर सरकारचा भर असावा, याकडे आपण स्वत: कॅबिनेटचे लक्ष वेधले. याचा फायदा चंद्रपूर जिल्ह्याला होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी हा प्रकल्प उभा राहणार असल्याची माहितीही ना. वडेट्टीवार या योजनेबाबत सांगताना दिली. याप्रसंगी खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर, काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रकाश देवतळे, शहर अध्यक्ष नंदू नागरकर, रामू तिवारी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यात नामवंत उद्योग आणण्याचा प्रयत्नचंद्रपूर जिल्ह्यातील एमआयडीसीतील सुमारे १५० उद्योग गेल्या पाचसात वर्षांत बंद पडले आहेत. दरम्यान नवा एकही उद्योग आला नाही. एमआयडीसीमध्ये नामवंत उद्योग यावे, अशी आपली भावना आहे. मुख्यमंत्र्यांचाही यादृष्टीने प्रयत्न आहे, असेही ना. वडेट्टीवार यांनी सांगितले.प्रदूषणावर आळा घालण्यासाठी समिती नेमणारचंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहे. या प्रदूषणावर आळा घालायचा असेल तर याची कारणेही शोधणे गरजेचे आहे. यासाठी तज्ज्ञांची एक समिती आगामी काळात गठित केली जाईल. ही समिती प्रदूषणाची कारणांसह त्यावर उपाययोजनांचाही अभ्यास करतील, अशी माहितीही ना. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार