शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
2
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
3
पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी PSI चा दबाव; विरोध केल्याने महिला डॉक्टरचा सुरु होता छळ, शेवटी...
4
आशियात नव्या युद्धाची चाहूल; किम जोंगच्या सैनिकांवर दक्षिण कोरियाचा गोळीबार, कारण काय..?
5
ग्लोव्ह्ज कापून काढले, सलाईन लावताना सुई मोडली! तिलक वर्मानं केलाय 'या' जीवघेण्या आजाराचा सामना
6
Carbide Gun : दिवाळीच्या आनंदावर विरजण! ३०० जणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत; 'कार्बाइड गन' आहे तरी काय?
7
'बिग बॉस'मध्ये प्रणित मोरेचा पुन्हा कॉमेडी शो, सदस्यांना खळखळून हसवलं; नेटकरी म्हणतात...
8
आयडियाची कल्पना! सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी लढवली शक्कल; डोकं केलं पिंजऱ्यात बंद
9
Phaltan Crime: महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? आयुष्य संपविण्यापूर्वी ती तिथे कशी पोहोचली? 
10
१ नोव्हेंबरपासून बदलणार नियम! आता बँक खात्यांसाठी तुम्हाला ठेवता येणार एकापेक्षा अधिक 'वारस'दार, जाणून घ्या
11
रोहित शर्माला मिडिया फोटोसाठी हाक मारताच गौतम गंभीर म्हणाला, "फोटो काढून घे, सगळ्यांना..."
12
पाकिस्तानने 'या' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी, १६ नागरिकांच्या मृत्यूनंतर 'उशिराने शहाणपण'
13
दिल्लीत बॉम्बस्फोटाचा कट उधळला; दोन ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
VIRAL VIDEO : वय केवळ आकडाच! ८२ वर्षांच्या आजीने केली भारतातील सगळ्यात उंच बंजी जम्पिंग; पाहून अंगावर येतील शहारे
15
'या' आयपीओचं बंपर लिस्टिंग! पहिल्याच दिवशी ९ टक्क्यांचा नफा, गुंतवणूकदार मालामाल
16
Budh Gochar 2025: २४ ऑक्टोबर बुध गोचर; १० नोव्हेंबरपर्यंत 'वृश्चिक' राशीच्या लोकांनी घ्या 'ही' काळजी!
17
हसतं खेळतं घर उद्ध्वस्त! बसच्या भीषण आगीत कुटुंब संपलं; आई-वडिलांसह २ मुलांचा मृत्यू
18
Ladki Bahin eKYC: लाडकी बहीणच्या e-KYC साठी दिवाळीची वेळ होती सर्वोत्तम...; पठ्ठ्याने धडाधड घरातल्या, पाहुण्या रावळ्यांच्याही करून टाकल्या...
19
VIRAL VIDEO : 'मराठीत बोला नाहीतर मुंबई सोडा'; एअर इंडिया फ्लाईटमध्ये यूट्यूबरला महिला प्रवाशाची धमकी
20
अ‍ॅपलने उचललं मोठं पाऊल; स्टोअरमधून काढून टाकले 'हे' व्हायरल डेटिंग अ‍ॅप! काय आहे कारण?

शेतकऱ्यांसाठी स्मार्ट योजना येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 06:00 IST

जिल्ह्यातील पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे. त्यांना अपेक्षित रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे ही प्राथमिक जबाबदारी असेल. सोबतच शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी सिंचन सुविधा येत्या ३ वर्षांच्या काळात उपलब्ध करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार असल्याचेही ना. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : जिल्ह्याचा समतोल विकास साधणार, बेरोजगारांचे प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने चंद्रपूर जिल्ह्याचा समतोल विकास साधण्यावर आपला भर राहणार आहे. माझा मतदार संघ ब्रह्मपुरी असला तरी जिल्ह्यातील सर्वच मतदार संघामध्ये विकास घडवून आणायचा आहे. यामध्ये शेतकरी आणि बेरोजगारांच्या प्रश्नांना प्राधान्यक्रम राहिल. याच अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात एक स्मार्ट योजना लवकरच येणार असल्याची माहितीही सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमीनी विकास, मदत व पुनर्वसन मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.महाविकास आघाडीमध्ये कॅबिनेट मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर विजय वडेट्टीवार पहिल्यांदाच चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहे. दरम्यान, येथील गांधी चौकात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.जिल्ह्यातील पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे. त्यांना अपेक्षित रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे ही प्राथमिक जबाबदारी असेल. सोबतच शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी सिंचन सुविधा येत्या ३ वर्षांच्या काळात उपलब्ध करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार असल्याचेही ना. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.अलीकडेच राज्याच्या कॅबिनेटमध्ये एका स्मार्ट योजनेवर प्रात्याक्षिक झाले. जागतिक बँकेच्या सहकार्याने ही योजना आखली जात आहे. ही योजना विशेष करून शेतकरी व बेरोजगारांना केंद्रस्थानी ठेवून आखण्यात येत आहे. शेतकरी आणि व्यापारी यामध्ये शेतकऱ्यांना होणाऱ्या तोट्याचे फायद्यात रुपांतर करणे हा योजनेचा मुख्य हेतू असणार आहे. ज्या भागात जी पिके घेतली जातात. त्या भागात त्याच पिकावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारले जाण्यावर सरकारचा भर असावा, याकडे आपण स्वत: कॅबिनेटचे लक्ष वेधले. याचा फायदा चंद्रपूर जिल्ह्याला होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी हा प्रकल्प उभा राहणार असल्याची माहितीही ना. वडेट्टीवार या योजनेबाबत सांगताना दिली. याप्रसंगी खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर, काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रकाश देवतळे, शहर अध्यक्ष नंदू नागरकर, रामू तिवारी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यात नामवंत उद्योग आणण्याचा प्रयत्नचंद्रपूर जिल्ह्यातील एमआयडीसीतील सुमारे १५० उद्योग गेल्या पाचसात वर्षांत बंद पडले आहेत. दरम्यान नवा एकही उद्योग आला नाही. एमआयडीसीमध्ये नामवंत उद्योग यावे, अशी आपली भावना आहे. मुख्यमंत्र्यांचाही यादृष्टीने प्रयत्न आहे, असेही ना. वडेट्टीवार यांनी सांगितले.प्रदूषणावर आळा घालण्यासाठी समिती नेमणारचंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहे. या प्रदूषणावर आळा घालायचा असेल तर याची कारणेही शोधणे गरजेचे आहे. यासाठी तज्ज्ञांची एक समिती आगामी काळात गठित केली जाईल. ही समिती प्रदूषणाची कारणांसह त्यावर उपाययोजनांचाही अभ्यास करतील, अशी माहितीही ना. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार