शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

तपाळ योजनेचा ‘गचाळपणा’ उघडकीस

By admin | Updated: June 17, 2015 01:53 IST

कंत्राटदाराच्या कमावू आणि ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्ष्यामुळे तपाळ पाणी पुरवठा योजनेमध्ये दिवसेंदिवस गचाळपणा वाढत

घनश्याम नवघडे ल्ल नागभीडकंत्राटदाराच्या कमावू आणि ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्ष्यामुळे तपाळ पाणी पुरवठा योजनेमध्ये दिवसेंदिवस गचाळपणा वाढत आहे. हा गचाळपणा एक दिवस नागरिकांच्या आरोग्याशी खेळू शकतो, असे ढळढळीत सत्य ग्रामपंचायत सदस्यांच्या तपाळ भेटीत उघडकीस आले आहे.गेल्या पंधरवड्यात जवळपास आठ दिवस तपाळ पाणीपुरवठा योजनेचा पाणी नागभीडकरांना मिळत नव्हता. ही समस्या कशामुळे निर्माण झाली याची माहिती घेण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य रमेश ठाकरे, विजय अमृतकर, विक्की भडकाम, गिरीधर अमृतकर यांनी तपाळला भेट दिली आणि संपूर्ण योजनेची पाहणी केली असता भयानक सत्य समोर आले.या पाहणीत पाणी फिल्टर करणारी यंत्रसामुग्री जंगाने मळलेली आढळून आली. शुद्धीकरण करणाऱ्या यंत्राची रेती गेल्या कित्येक वर्षापासून बदलविण्यात आली नाही, असे या चमूच्या लक्षात आले. आता या रेतीची माती बनली असे या सदस्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या ठिकाणी पाण्याचा उपसा करणाऱ्या दोन मशीन (इंजिन) आहेत. पण एक इंजिन गेल्या तीन महिन्यापासून बंद असल्याचे या चमूला दिसले. समजा सुरू असलेल्या इंजीनमध्ये वेळेवर काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला तर पाणी पुरवठ्याचा व्यवहारच बंद असतो. या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला ६ मे १९९५ ला प्रशासकीय मान्यता मिळाली आणि आॅगस्ट १९९९ ला कार्यान्वित करण्यात आली. नागभीडसह नवथळा चिखलपरसोडी, चिकमारा, देवटेक, बाळापूर, ढोरपा, मौशी, तारेगाव (बुज), तोरगाव (खुर्द) आणि तपाळ आदी ११ गावे या योजनेत समाविष्ट असून योजनेचे संचालन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे आहे. पाणी पुरवठा व देखभालीसाठी जिल्हा परिषदेच्या या विभागाने एका कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. पण या कंत्राटदारावर जिल्हा परिषदेच्या एकाही अधिकाऱ्याचे नियंत्रण नाही.