माणिकगड पहाडातील डोंगर-दऱ्यातून गडचांदूरकडून जिवतीकडे जाणाऱ्या मार्गावर हा किल्ला आहे. हा किल्ला उंचावर असल्याने अतिशय प्रेक्षणीय व रमणीय आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी भेटी देण्यासाठी येतात. येथील पूर्वापार इतिहासाची माहिती लोकापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून याठिकाणी त्यावर आधारित शिल्पे तयार करून सौंदयीकरण करावे, अशी मागणी आहे. जिल्ह्यात चंद्रपूर, भद्रावती आदी स्थानी विविध प्रकारचे चौकाचौकात शिल्पे तयार करून सौंदर्यीकरण करावे. या चौकांचे रूपडे पालटले गेले आहे. ही शिल्पे माहिती दर्शक असल्याने त्याचा फायदा अभ्यासकांना होतो आहे. पाच वर्षापूर्वी किल्ला परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले. यामुळे या दूरवरून येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला. या माध्यमातून वनविभागाला ही उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले. या ठिकाणी अशा प्रकारची शिल्पे उभारले गेल्यास परिसरातील सौंदर्य अधिकच खुलून दिसेल, असेही पर्यटक व नागरिकांचे म्हणणे आहे.
माणिकगड किल्ल्याचा इतिहास सांगणारी शिल्पे रेखाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:55 IST