शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील टंचाईग्रस्त भागासाठी सहा टँकर सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:19 IST

शहरातील विविध वॉर्डांत संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मनपाच्या वतीने ६ टँकरची व्यवस्था करण्याचा निर्णय आढावा सभेत घेण्यात आला.

ठळक मुद्देमनपा आढावा बैठक : विविध विकास कामांवर चर्चा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शहरातील विविध वॉर्डांत संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मनपाच्या वतीने ६ टँकरची व्यवस्था करण्याचा निर्णय आढावा सभेत घेण्यात आला.स्थायी सभापती राहुल पावडे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी उपमहापौर अनिल फुलझेले, शहर अभियंता महेश बारई, शाखा अभियंता विजय बोरीकर, शाखा अभियंता अनिल घुमडे, अभियंता संजय जोगी उपस्थित होते. शहरात विशेष निधीअंतर्गत विविध कामे सुरू आहेत. त्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष निधी दिला. संबंधित कंत्राटदारांच्या कामाची गती वाढवावी आणि सुरू असलेली कामे शीघ्रगतीने विहित मूदतीत पूर्ण करावी. यासाठी अधिकाºयांनी दिवसागणिक कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देशही या बैठकीतून देण्यात आले.शासनाची स्वयंचलित पाणी पुरवठा योजना अमृत अंतर्गत शहरात पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. पुढील ५० वर्षांची आवश्यकता लक्षात घेवून पाईपलाईन टाकताना आवश्यक तेवढेच खोदकाम करावे. पाईपलाईन उपलब्ध नाही, अशी परिस्थिती निर्माण होवू नये.खोदकामातून निर्माण होणारा मातीचा ढिगारा, धुळीचा त्रास सामान्य नागरिकांना होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याची सूचना कंत्राटदारांना देण्यात आली. त्रासदायक ठिकाणी कंत्राटदारांनी कामगार लावून साफसफाई करावी, खोदकाम परिसराची रोज एका ठराविक वेळेत पाहणी करून विकासकामे पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली.मनपा अधिकाºयांनी पाणी टंचाईबाबत सुरू केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती या आढावा बैठकीत सादर केली. शहरातील टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने विहिरींची साफसफाई, खोलीकरण व दुरुस्ती केली जात आहे. हातपंप व कूपनलिका दुरुस्त करण्यासोबतच पाईप लाईन गळती बंद करण्याचे काम वेगाने सुरू आहे.टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा करण्यासाठी शहरात ६ टँकर सज्ज ठेवण्यात आले आहेत. इरई धरण परिसरात विहिरी सभोवताल मातीचा बंधारा बांधण्यात येणार आहे. तसेच १० अतिरिक्त पंप लावून पाणी उचल करण्याची कार्यवाही लवकरच सुरू होईल, अशी माहिती उपमहापौर फुलझेले व सभापती पावडे यांनी दिली. दाताळा येथील इरई नदीवर बंधारा बांधून शहरातील ४ विहिरींवर पंप लावण्याची प्रक्रिया केली जात आहे. हे काम झाल्यास उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर पूर्णत: मात करता येईल. शहरात विविध भागात कुपनलिका, हातपंप, विहिरीवर पंप बसविणे तसेच म्हाडा परिसरातून पाणी आणण्याकरिता शासनाकडून जादा मिळणार आहे, असा दावाही बैठकीत करण्यात आला.