शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

चंद्रपुरातील टंचाईग्रस्त भागासाठी सहा टँकर सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:19 IST

शहरातील विविध वॉर्डांत संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मनपाच्या वतीने ६ टँकरची व्यवस्था करण्याचा निर्णय आढावा सभेत घेण्यात आला.

ठळक मुद्देमनपा आढावा बैठक : विविध विकास कामांवर चर्चा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शहरातील विविध वॉर्डांत संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मनपाच्या वतीने ६ टँकरची व्यवस्था करण्याचा निर्णय आढावा सभेत घेण्यात आला.स्थायी सभापती राहुल पावडे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी उपमहापौर अनिल फुलझेले, शहर अभियंता महेश बारई, शाखा अभियंता विजय बोरीकर, शाखा अभियंता अनिल घुमडे, अभियंता संजय जोगी उपस्थित होते. शहरात विशेष निधीअंतर्गत विविध कामे सुरू आहेत. त्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष निधी दिला. संबंधित कंत्राटदारांच्या कामाची गती वाढवावी आणि सुरू असलेली कामे शीघ्रगतीने विहित मूदतीत पूर्ण करावी. यासाठी अधिकाºयांनी दिवसागणिक कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देशही या बैठकीतून देण्यात आले.शासनाची स्वयंचलित पाणी पुरवठा योजना अमृत अंतर्गत शहरात पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. पुढील ५० वर्षांची आवश्यकता लक्षात घेवून पाईपलाईन टाकताना आवश्यक तेवढेच खोदकाम करावे. पाईपलाईन उपलब्ध नाही, अशी परिस्थिती निर्माण होवू नये.खोदकामातून निर्माण होणारा मातीचा ढिगारा, धुळीचा त्रास सामान्य नागरिकांना होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याची सूचना कंत्राटदारांना देण्यात आली. त्रासदायक ठिकाणी कंत्राटदारांनी कामगार लावून साफसफाई करावी, खोदकाम परिसराची रोज एका ठराविक वेळेत पाहणी करून विकासकामे पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली.मनपा अधिकाºयांनी पाणी टंचाईबाबत सुरू केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती या आढावा बैठकीत सादर केली. शहरातील टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने विहिरींची साफसफाई, खोलीकरण व दुरुस्ती केली जात आहे. हातपंप व कूपनलिका दुरुस्त करण्यासोबतच पाईप लाईन गळती बंद करण्याचे काम वेगाने सुरू आहे.टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा करण्यासाठी शहरात ६ टँकर सज्ज ठेवण्यात आले आहेत. इरई धरण परिसरात विहिरी सभोवताल मातीचा बंधारा बांधण्यात येणार आहे. तसेच १० अतिरिक्त पंप लावून पाणी उचल करण्याची कार्यवाही लवकरच सुरू होईल, अशी माहिती उपमहापौर फुलझेले व सभापती पावडे यांनी दिली. दाताळा येथील इरई नदीवर बंधारा बांधून शहरातील ४ विहिरींवर पंप लावण्याची प्रक्रिया केली जात आहे. हे काम झाल्यास उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर पूर्णत: मात करता येईल. शहरात विविध भागात कुपनलिका, हातपंप, विहिरीवर पंप बसविणे तसेच म्हाडा परिसरातून पाणी आणण्याकरिता शासनाकडून जादा मिळणार आहे, असा दावाही बैठकीत करण्यात आला.