शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

चंद्रपुरातील टंचाईग्रस्त भागासाठी सहा टँकर सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:19 IST

शहरातील विविध वॉर्डांत संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मनपाच्या वतीने ६ टँकरची व्यवस्था करण्याचा निर्णय आढावा सभेत घेण्यात आला.

ठळक मुद्देमनपा आढावा बैठक : विविध विकास कामांवर चर्चा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शहरातील विविध वॉर्डांत संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मनपाच्या वतीने ६ टँकरची व्यवस्था करण्याचा निर्णय आढावा सभेत घेण्यात आला.स्थायी सभापती राहुल पावडे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी उपमहापौर अनिल फुलझेले, शहर अभियंता महेश बारई, शाखा अभियंता विजय बोरीकर, शाखा अभियंता अनिल घुमडे, अभियंता संजय जोगी उपस्थित होते. शहरात विशेष निधीअंतर्गत विविध कामे सुरू आहेत. त्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष निधी दिला. संबंधित कंत्राटदारांच्या कामाची गती वाढवावी आणि सुरू असलेली कामे शीघ्रगतीने विहित मूदतीत पूर्ण करावी. यासाठी अधिकाºयांनी दिवसागणिक कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देशही या बैठकीतून देण्यात आले.शासनाची स्वयंचलित पाणी पुरवठा योजना अमृत अंतर्गत शहरात पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. पुढील ५० वर्षांची आवश्यकता लक्षात घेवून पाईपलाईन टाकताना आवश्यक तेवढेच खोदकाम करावे. पाईपलाईन उपलब्ध नाही, अशी परिस्थिती निर्माण होवू नये.खोदकामातून निर्माण होणारा मातीचा ढिगारा, धुळीचा त्रास सामान्य नागरिकांना होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याची सूचना कंत्राटदारांना देण्यात आली. त्रासदायक ठिकाणी कंत्राटदारांनी कामगार लावून साफसफाई करावी, खोदकाम परिसराची रोज एका ठराविक वेळेत पाहणी करून विकासकामे पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली.मनपा अधिकाºयांनी पाणी टंचाईबाबत सुरू केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती या आढावा बैठकीत सादर केली. शहरातील टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने विहिरींची साफसफाई, खोलीकरण व दुरुस्ती केली जात आहे. हातपंप व कूपनलिका दुरुस्त करण्यासोबतच पाईप लाईन गळती बंद करण्याचे काम वेगाने सुरू आहे.टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा करण्यासाठी शहरात ६ टँकर सज्ज ठेवण्यात आले आहेत. इरई धरण परिसरात विहिरी सभोवताल मातीचा बंधारा बांधण्यात येणार आहे. तसेच १० अतिरिक्त पंप लावून पाणी उचल करण्याची कार्यवाही लवकरच सुरू होईल, अशी माहिती उपमहापौर फुलझेले व सभापती पावडे यांनी दिली. दाताळा येथील इरई नदीवर बंधारा बांधून शहरातील ४ विहिरींवर पंप लावण्याची प्रक्रिया केली जात आहे. हे काम झाल्यास उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर पूर्णत: मात करता येईल. शहरात विविध भागात कुपनलिका, हातपंप, विहिरीवर पंप बसविणे तसेच म्हाडा परिसरातून पाणी आणण्याकरिता शासनाकडून जादा मिळणार आहे, असा दावाही बैठकीत करण्यात आला.