शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, उसनवार पैसे घेऊन बांधले हो घरकूल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 05:00 IST

राज्य शासनाच्या निधीच्या भरवशावर मंजूर  ८७ लाभार्थ्यांपैकी ३४ लाभार्थ्यांनी घर बांधकामाला सुरुवात केली. आजच्या स्थितीत १४ कामे पूर्णत्वास आली आहेत तर १८ लाभार्थ्यांनी घराची स्लॅब पूर्ण केली. दोन लाभार्थ्यांनी जोता लेव्हलपर्यत काम केले आहे. काम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना आतापर्यंत फक्त ८० हजार रुपये राज्य शासनाच्या निधीतून देण्यात आले आहे. अनेक लाभार्थ्यांनी उसनवार रुपये मागून घरासाठी खर्च केले आहे. बराच कालावधी लोटल्याने समोरील व्यक्ती उसनवारीची व्याजासहित रक्कम मागत आहे. 

राजू गेडामलोकमत न्यूज नेटवर्कमूल : पंतप्रधान आवास योजनेचा निधी मागील तीन वर्षांपासून नगर परिषदेला अप्राप्त आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी घराचे बांधकाम उसनवार घेऊन पूर्ण केले. निधी आल्यावर उसनवारीचे रुपये देण्याचे आश्वासन लाभार्थ्यांनी दिले होते. आता ते लाभार्थ्यांकडे पैशाचा तगादा लावत असल्याने लाभार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आज ना उद्या निधी येईल, या आशेवर असलेल्या लाभार्थ्यांचा भ्रमनिरास होत आहे. परिणामी लाभार्थी चातकासारखी निधीची वाट बघत आहेत. नगर परिषद मूल अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेसाठी केंद्र सरकारने १३०.५ लाख रुपये तर राज्य सरकारने ८७ लाख रुपये २५ फेब्रुवारी २०१९ ला मंजूर केले. यात राज्य शासनाने ३४.८० लाख रुपये नगर परिषदेच्या खात्यात जमा केले. मात्र केंद्र सरकारने एकही निधी आतापर्यंत दिला नाही. राज्य शासनाच्या निधीच्या भरवशावर मंजूर  ८७ लाभार्थ्यांपैकी ३४ लाभार्थ्यांनी घर बांधकामाला सुरुवात केली. आजच्या स्थितीत १४ कामे पूर्णत्वास आली आहेत तर १८ लाभार्थ्यांनी घराची स्लॅब पूर्ण केली. दोन लाभार्थ्यांनी जोता लेव्हलपर्यत काम केले आहे. काम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना आतापर्यंत फक्त ८० हजार रुपये राज्य शासनाच्या निधीतून देण्यात आले आहे. अनेक लाभार्थ्यांनी उसनवार रुपये मागून घरासाठी खर्च केले आहे. बराच कालावधी लोटल्याने समोरील व्यक्ती उसनवारीची व्याजासहित रक्कम मागत आहे. 

लोकप्रतिधिनींकडून केवळ आश्वासनधनादेशाबाबत नगर परिषदेत विचारणा करण्यासाठी गेल्यानंतर कर्मचारी अपमानास्पद भाषेचा वापर करून हाकलून लावत असल्याचे लाभार्थी सांगतात. बल्लारपूर विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना अनेकदा निवेदन देण्यात देऊन केंद्राचा निधी मिळवून देण्याची मागणी केली. मात्र आश्वासनापलिकडे काहीच मिळाले नसल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. एकीकडे अर्धवट घर तर दुसरीकडे उसनवारीचे पैसे या विवंचनेत पंतप्रधान आवास योजनेचा लाभार्थी अडकला आहे. 

केंद्राचा व राज्य शासनाचा निधी मिळावा यासाठी संपूर्ण माहिती पाठविण्यात आली आहे. ही शासनाची बाब असल्याने निधी उपलब्ध झाल्याबरोबर त्वरित लाभार्थ्यांना देण्यात येईल.-सुजित जोगे, शाखा अभियंता न. प . मूल

पंतप्रधान आवास योजनेचा निधी लवकर मिळेल या आशेवर उसनवार करून घराचे बांधकाम केले. मात्र केंद्राचा व राज्याचा काही निधी न आल्याने पैसे अडून पडले आहेत. उसनवारी पैशावर व्याज देताना त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी शासनाने त्वरित निधी द्यावा. -वसंता कवडू गुरनुले, लाभार्थी मूल 

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना