शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

दुकानदारांकडून मापात ‘पाप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:10 IST

आधीच महागाई गगनाला भिडत आहे. सर्वसामान्य नागरिक या महागाईमुळे भरडले जात आहे. असे असतानाच आता दुकानदारांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. वजनात घोळ केली जात असून अनेक ठिकाणी वजनाच्या नावाखाली दगड, लोखंडांचा वापर केला जात असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले.

ठळक मुद्देप्रशासन सुस्त : आधीच महागाई, त्यात पुन्हा लूट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आधीच महागाई गगनाला भिडत आहे. सर्वसामान्य नागरिक या महागाईमुळे भरडले जात आहे. असे असतानाच आता दुकानदारांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. वजनात घोळ केली जात असून अनेक ठिकाणी वजनाच्या नावाखाली दगड, लोखंडांचा वापर केला जात असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले. एका किलोचे पैसे दिल्यानंतर पाऊण किलोच वस्तू ग्राहकांच्या माथी मारले जात आहे. तरबेज दुकानदार हा तराजूचा खेळ अत्यंत सराईतपणे करीत असल्याने अनेक ग्राहकांच्या हा प्रकार लक्षात येत नाही. मात्र सुज्ञ ग्राहकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर दुकानदारांसोबत बाचाबाची होताना दिसत आहे. ग्राहकांची ही सर्रास लूट होत असतानाही याकडे संबंधित प्रशासनाचे लक्ष नाही, हे आणखी ग्राहकांचे दुर्दैव.सध्या महागाई प्रचंड वाढली आहे. मागील दोन वर्षांचा अभ्यास केला तर अनेक वस्तूंच्या किमती दुप्पट झाल्याचे दिसून येते. पोटाची खडगी भरण्यासाठी अनेक बेरोजगार खासगी कंपनीत नोकऱ्या करीत आहे. शासकीय नोकरदारांना सातवा वेतन आयोग मिळत असला तरी खासगी कंपन्यात नोकºया करणाऱ्यांना तुटपुंज्या वेतनावर कुटुंबाचा डोलारा सांभाळावा लागत आहे. वर्ष उलटतात, मात्र या नोकरदारांचे वेतन वाढत नाही. अशातच दरवर्षी महागाई वाढत असल्यामुळे अनेकांचे कौटुंबिक बजेट कोलमडले आहे. संसार चालविताना दमछाक होत आहे. अशातच आता बहुतांश दुकानदारांकडूनही लुबाडले जात आहे. वजनात घोळ करून ग्राहकांची लूट केली जात आहे.तांदूळ, साखर, गहू व इतर किराणा वस्तू मोजून देताना काही दुकानात इलेक्ट्रानिक तराजूचा वापर होतो. तर काही ठिकाणी वजनमापे ठेवलेल्या साध्या तराजूचा वापर होत असल्याचे दिसून येते. या ठिकाणी बहुतांश दुकानदार तराजूचा खेळ करीत ग्राहकांना कमी वस्तू देत त्यांची लूट केली जाते. विशेष म्हणजे, अनेक दुकानातील वजनांचे पासींगच केले नसल्याची माहिती आहे. अनेक दुकानात वर्षानुवर्षापासून तेच ते एक किलो, दोन किलो, पाच किलो, दहा किलोचे वजन वापरले जात आहे. बदाम, काजू, खसखस यासारख्या महागड्या वस्तू ग्रॅमनेच खरेदी केल्या जातात. मात्र ग्रॅमच्या वजनाऐवजी नाणी वापरली जात आहे.वजनांचे पासिंग नाहीदरवर्षी दुकानदारांकडे असलेल्या वजनांची पासींग होणे अपेक्षित आहे. मात्र संबंधित विभागाकडून दुकानदारांकडील वजनाची पासींगच केली जात नाही. वर्षानुवर्ष एकच वजन दुकानदार वापरत असल्याचे दिसते. त्यामुळे ग्राहक भरडला जात आहे.भाजी विक्रेत्यांकडूनही लूटप्रस्तुत प्रतिनिधीने भाजीमार्केटमध्ये फेरफटका मारला असता या ठिकाणी तर अंदाजानेच भाजीपाला विकला जात असल्याचे दिसून आले. काही भाजीविक्रेते भाजीपाला मोजून देतात. मात्र अनेकांकडे अधिकृत वजनाऐवजी दगड, लोखंड यांचा वापर केला जात असल्याचे दिसून आले.एका ठिकाणी ३० रुपये किलो याप्रमाणे टमाटर असेल तर तेच टमाटर काही फुटांवर असलेल्या दुसºया भाजीविक्रेत्यांकडे २० रुपये प्रमाणे विकले जाते. काही भाजीविक्रेत्याला याबाबत विचारले असता वजनात घोळ करून ते विक्रेते कमी किमतीत वस्तू विकतात, असे सांगितले.