शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

दुकानदारांकडून मापात ‘पाप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:10 IST

आधीच महागाई गगनाला भिडत आहे. सर्वसामान्य नागरिक या महागाईमुळे भरडले जात आहे. असे असतानाच आता दुकानदारांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. वजनात घोळ केली जात असून अनेक ठिकाणी वजनाच्या नावाखाली दगड, लोखंडांचा वापर केला जात असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले.

ठळक मुद्देप्रशासन सुस्त : आधीच महागाई, त्यात पुन्हा लूट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आधीच महागाई गगनाला भिडत आहे. सर्वसामान्य नागरिक या महागाईमुळे भरडले जात आहे. असे असतानाच आता दुकानदारांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. वजनात घोळ केली जात असून अनेक ठिकाणी वजनाच्या नावाखाली दगड, लोखंडांचा वापर केला जात असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले. एका किलोचे पैसे दिल्यानंतर पाऊण किलोच वस्तू ग्राहकांच्या माथी मारले जात आहे. तरबेज दुकानदार हा तराजूचा खेळ अत्यंत सराईतपणे करीत असल्याने अनेक ग्राहकांच्या हा प्रकार लक्षात येत नाही. मात्र सुज्ञ ग्राहकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर दुकानदारांसोबत बाचाबाची होताना दिसत आहे. ग्राहकांची ही सर्रास लूट होत असतानाही याकडे संबंधित प्रशासनाचे लक्ष नाही, हे आणखी ग्राहकांचे दुर्दैव.सध्या महागाई प्रचंड वाढली आहे. मागील दोन वर्षांचा अभ्यास केला तर अनेक वस्तूंच्या किमती दुप्पट झाल्याचे दिसून येते. पोटाची खडगी भरण्यासाठी अनेक बेरोजगार खासगी कंपनीत नोकऱ्या करीत आहे. शासकीय नोकरदारांना सातवा वेतन आयोग मिळत असला तरी खासगी कंपन्यात नोकºया करणाऱ्यांना तुटपुंज्या वेतनावर कुटुंबाचा डोलारा सांभाळावा लागत आहे. वर्ष उलटतात, मात्र या नोकरदारांचे वेतन वाढत नाही. अशातच दरवर्षी महागाई वाढत असल्यामुळे अनेकांचे कौटुंबिक बजेट कोलमडले आहे. संसार चालविताना दमछाक होत आहे. अशातच आता बहुतांश दुकानदारांकडूनही लुबाडले जात आहे. वजनात घोळ करून ग्राहकांची लूट केली जात आहे.तांदूळ, साखर, गहू व इतर किराणा वस्तू मोजून देताना काही दुकानात इलेक्ट्रानिक तराजूचा वापर होतो. तर काही ठिकाणी वजनमापे ठेवलेल्या साध्या तराजूचा वापर होत असल्याचे दिसून येते. या ठिकाणी बहुतांश दुकानदार तराजूचा खेळ करीत ग्राहकांना कमी वस्तू देत त्यांची लूट केली जाते. विशेष म्हणजे, अनेक दुकानातील वजनांचे पासींगच केले नसल्याची माहिती आहे. अनेक दुकानात वर्षानुवर्षापासून तेच ते एक किलो, दोन किलो, पाच किलो, दहा किलोचे वजन वापरले जात आहे. बदाम, काजू, खसखस यासारख्या महागड्या वस्तू ग्रॅमनेच खरेदी केल्या जातात. मात्र ग्रॅमच्या वजनाऐवजी नाणी वापरली जात आहे.वजनांचे पासिंग नाहीदरवर्षी दुकानदारांकडे असलेल्या वजनांची पासींग होणे अपेक्षित आहे. मात्र संबंधित विभागाकडून दुकानदारांकडील वजनाची पासींगच केली जात नाही. वर्षानुवर्ष एकच वजन दुकानदार वापरत असल्याचे दिसते. त्यामुळे ग्राहक भरडला जात आहे.भाजी विक्रेत्यांकडूनही लूटप्रस्तुत प्रतिनिधीने भाजीमार्केटमध्ये फेरफटका मारला असता या ठिकाणी तर अंदाजानेच भाजीपाला विकला जात असल्याचे दिसून आले. काही भाजीविक्रेते भाजीपाला मोजून देतात. मात्र अनेकांकडे अधिकृत वजनाऐवजी दगड, लोखंड यांचा वापर केला जात असल्याचे दिसून आले.एका ठिकाणी ३० रुपये किलो याप्रमाणे टमाटर असेल तर तेच टमाटर काही फुटांवर असलेल्या दुसºया भाजीविक्रेत्यांकडे २० रुपये प्रमाणे विकले जाते. काही भाजीविक्रेत्याला याबाबत विचारले असता वजनात घोळ करून ते विक्रेते कमी किमतीत वस्तू विकतात, असे सांगितले.