शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

१९ लाखांवर नागरिकांची सिकलसेल तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:01 IST

सिकलसेल कार्यक्रमांतर्गत ते २० वर्ष वयोगटातील मुलामुलींची, गर्भवती मातांची तपासणी करण्यात येते. तपासणीमध्ये सकारात्मक चाचणी आल्यास त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात येते. या आजाराच्या नियंत्रणाकरिता प्रत्येकांना सिकलसेल आजाराची माहिती व सिकलसेल रुग्णांना या आजाराची जाणीव होणे हिच खरी सिकलसेल रुग्णांसाठी औषध आहे.

ठळक मुद्दे२ हजार ७०१ रुग्ण : जनजागृतीसाठी जिल्हा रुग्णालयात पोस्टर प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: आरोग्य प्रशासनाने यावर्षी जिल्ह्यात १९ लाख ८५ हजार २०४ जणांची सिकलसेल तपासणी केली आहे. यामध्ये २ हजार ७०२ जण सिकलसेल रुग्ण, तर ३१ हजार ७३१ व्यक्ती सिकलसेलचे वाहन आढळून आले आहेत.सिकलसेल कार्यक्रमांतर्गत ते २० वर्ष वयोगटातील मुलामुलींची, गर्भवती मातांची तपासणी करण्यात येते. तपासणीमध्ये सकारात्मक चाचणी आल्यास त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात येते. या आजाराच्या नियंत्रणाकरिता प्रत्येकांना सिकलसेल आजाराची माहिती व सिकलसेल रुग्णांना या आजाराची जाणीव होणे हिच खरी सिकलसेल रुग्णांसाठी औषध आहे. सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गावागावात जनजागृती करून शासकीय आरोग्य संस्थेत मोफत सिकलसेल चाचणी केली जाते. राष्ट्रीय आरोग्य अभियान सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिनानिमित्त सिकलसेल रुग्णांच्या व्यथा व अपेक्षा या विषयावर पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले होते. उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे, अधिपरिचारीका माया आत्राम, प्राचार्य कळसंगे, उपअभियंता नीलेश खाडे, धीरज कासर्लेवार, संतोष चात्रेशवार, भारती तितरे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड म्हणाले, सिकलसेल आजार हा अनुवंशिक आहे. या आजारातून कोणताही सिकलसेल रुग्ण व वाहक व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. हा आजार मुलांमध्ये येण्यामागे आई-वडील जबाबदार असतात. परंतु या आजाराच्या नियंत्रणांकरिता प्रत्येक व्यक्तीने लग्नापूर्वी तसेच गर्भवती महिलांनी एकदा तरी सिकलसेल तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. यामुळे पुढील पिढीत हा आजार टाळता येतो.अशी घ्या काळजीवाहक व्यक्ती तसेच वाहक- ग्रस्त व्यक्तीमध्ये लग्न करु नये. सिकलसेल रुग्णांमध्ये वेळोवेळी हातपाय दुखणे, चक्कर येणे, नेहमी आजारी पडणे, जंतुसंसर्ग होणे, अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या आजाराच्या रुग्णाने भरपूर पाणी पिणे, भरपूर आहार घेणे व नियमित फोलिक अ‍ॅसिड गोळ्यांचे सेवन करणे महत्वाचे आहे. या आजाराच्या रुग्णांनी योग्य काळजी न घेतल्यास आजारी पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णांनी वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित औषधोपचार, आरोग्य तपासणी करणे व काळजी घेणे गरजेचे असते.

टॅग्स :Healthआरोग्य