शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

१९ लाखांवर नागरिकांची सिकलसेल तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:01 IST

सिकलसेल कार्यक्रमांतर्गत ते २० वर्ष वयोगटातील मुलामुलींची, गर्भवती मातांची तपासणी करण्यात येते. तपासणीमध्ये सकारात्मक चाचणी आल्यास त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात येते. या आजाराच्या नियंत्रणाकरिता प्रत्येकांना सिकलसेल आजाराची माहिती व सिकलसेल रुग्णांना या आजाराची जाणीव होणे हिच खरी सिकलसेल रुग्णांसाठी औषध आहे.

ठळक मुद्दे२ हजार ७०१ रुग्ण : जनजागृतीसाठी जिल्हा रुग्णालयात पोस्टर प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: आरोग्य प्रशासनाने यावर्षी जिल्ह्यात १९ लाख ८५ हजार २०४ जणांची सिकलसेल तपासणी केली आहे. यामध्ये २ हजार ७०२ जण सिकलसेल रुग्ण, तर ३१ हजार ७३१ व्यक्ती सिकलसेलचे वाहन आढळून आले आहेत.सिकलसेल कार्यक्रमांतर्गत ते २० वर्ष वयोगटातील मुलामुलींची, गर्भवती मातांची तपासणी करण्यात येते. तपासणीमध्ये सकारात्मक चाचणी आल्यास त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात येते. या आजाराच्या नियंत्रणाकरिता प्रत्येकांना सिकलसेल आजाराची माहिती व सिकलसेल रुग्णांना या आजाराची जाणीव होणे हिच खरी सिकलसेल रुग्णांसाठी औषध आहे. सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गावागावात जनजागृती करून शासकीय आरोग्य संस्थेत मोफत सिकलसेल चाचणी केली जाते. राष्ट्रीय आरोग्य अभियान सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिनानिमित्त सिकलसेल रुग्णांच्या व्यथा व अपेक्षा या विषयावर पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले होते. उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे, अधिपरिचारीका माया आत्राम, प्राचार्य कळसंगे, उपअभियंता नीलेश खाडे, धीरज कासर्लेवार, संतोष चात्रेशवार, भारती तितरे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड म्हणाले, सिकलसेल आजार हा अनुवंशिक आहे. या आजारातून कोणताही सिकलसेल रुग्ण व वाहक व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. हा आजार मुलांमध्ये येण्यामागे आई-वडील जबाबदार असतात. परंतु या आजाराच्या नियंत्रणांकरिता प्रत्येक व्यक्तीने लग्नापूर्वी तसेच गर्भवती महिलांनी एकदा तरी सिकलसेल तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. यामुळे पुढील पिढीत हा आजार टाळता येतो.अशी घ्या काळजीवाहक व्यक्ती तसेच वाहक- ग्रस्त व्यक्तीमध्ये लग्न करु नये. सिकलसेल रुग्णांमध्ये वेळोवेळी हातपाय दुखणे, चक्कर येणे, नेहमी आजारी पडणे, जंतुसंसर्ग होणे, अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या आजाराच्या रुग्णाने भरपूर पाणी पिणे, भरपूर आहार घेणे व नियमित फोलिक अ‍ॅसिड गोळ्यांचे सेवन करणे महत्वाचे आहे. या आजाराच्या रुग्णांनी योग्य काळजी न घेतल्यास आजारी पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णांनी वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित औषधोपचार, आरोग्य तपासणी करणे व काळजी घेणे गरजेचे असते.

टॅग्स :Healthआरोग्य