शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
2
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
5
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
6
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
7
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
8
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
9
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
10
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
11
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
12
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
13
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
14
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
15
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
16
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
17
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
18
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
19
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
20
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
Daily Top 2Weekly Top 5

नवरगाव-गडबोरी कालव्यात वाढली झुडपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST

पूर्वी घोडाझरी तलावाचे पाणी सोडण्यापूर्वी नवरगाव-गडबोरीकडे येणाऱ्या कालव्यातील गाळ, कचरा काढला जात होता. काही ठिकाणी कालवा फुटण्याची स्थिती असेल. त्या ठिकाणी पूर्वीच दुरुस्ती केली जात होती. परंतु अलीकडे घोडाझरी सिंचाई विभाग याकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ज्या परिस्थितीत कालवा आहे त्यातून पाणी सोडले जात आहे.

ठळक मुद्देघोडाझरी सिंचन विभागाचे दुर्लक्ष : मायनरचे पाणी शेवटपर्यंत पोहचतच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : घोडाझरीच्या तलावावर नवरगाव-गडबोरी परिसरातील बरीच धान शेती अवलंबून आहे. तलावही सोडलेला आहे. परंतु ज्या कालव्याच्या सहायाने पाणी येते. त्यामध्ये झुडपे वाढली असून कचऱ्याचेही साम्राज्य आहे. यामुळे पाण्याच्या गतीला अडथळा निर्माण होत असून अनेक ठिकाणी कालवा फुटतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.पूर्वी घोडाझरी तलावाचे पाणी सोडण्यापूर्वी नवरगाव-गडबोरीकडे येणाऱ्या कालव्यातील गाळ, कचरा काढला जात होता. काही ठिकाणी कालवा फुटण्याची स्थिती असेल. त्या ठिकाणी पूर्वीच दुरुस्ती केली जात होती. परंतु अलीकडे घोडाझरी सिंचाई विभाग याकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ज्या परिस्थितीत कालवा आहे त्यातून पाणी सोडले जात आहे. यावर्षीसुद्धा नवरगावकडे येणाऱ्या कालव्यातील गाळ काढलेला नाही. केवळ कालव्यातील काही भागातील कचरा कापण्याचे काम करण्यात आले आहे. तर काही भागात अजूनही कचरा तसाच आहे. त्यामुळे पाणी वाहण्याची गती मंदावणार असून कालवा फुटण्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या. परंतु संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. काही शेतकरी विभागाच्या कारभाराला कंटाळले असून स्वत:च पाण्याचे स्त्रोत निर्माण करीत आहेत.गाळ काढण्याची मागणीपाण्याचे नियोजन करण्यासाठी कालव्याला सिमेंट पायºया बसवून उपवितरिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु बऱ्याच ठिकाणच्या पायऱ्या फुटल्या आहेत. या ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत असल्याने घोडाझरी सिंचाई शाखेने पाण्याचे योग्य नियोजन करून कालव्यातील कचरा व गाळ काढून गडबोरी वानेरी, वाकड या शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी कसे मिळेल, याचे नियोजन करण्याची मागणी केली जात आहे.शेतकऱ्यांकडून स्वच्छतानवरगाव-गडबोरी या कालव्याची अशी स्थिती आहे. तर उपकालव्याची काय असेल,मध्येही कचºयाचे साम्राज्य आहे. ज्या शेतकºयांना गरज आहे असे शेतकरी उपकालव्यातील कचरा काढतात आणि पाणी मिळविण्याचा प्रयत्न करतात.

टॅग्स :Ghodazari Damघोडाझरी धरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प