शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
5
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
6
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
7
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
8
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
9
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
10
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
11
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
12
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
13
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
14
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
15
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
16
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
17
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
18
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
19
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
20
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!

नवरगाव-गडबोरी कालव्यात वाढली झुडपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST

पूर्वी घोडाझरी तलावाचे पाणी सोडण्यापूर्वी नवरगाव-गडबोरीकडे येणाऱ्या कालव्यातील गाळ, कचरा काढला जात होता. काही ठिकाणी कालवा फुटण्याची स्थिती असेल. त्या ठिकाणी पूर्वीच दुरुस्ती केली जात होती. परंतु अलीकडे घोडाझरी सिंचाई विभाग याकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ज्या परिस्थितीत कालवा आहे त्यातून पाणी सोडले जात आहे.

ठळक मुद्देघोडाझरी सिंचन विभागाचे दुर्लक्ष : मायनरचे पाणी शेवटपर्यंत पोहचतच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : घोडाझरीच्या तलावावर नवरगाव-गडबोरी परिसरातील बरीच धान शेती अवलंबून आहे. तलावही सोडलेला आहे. परंतु ज्या कालव्याच्या सहायाने पाणी येते. त्यामध्ये झुडपे वाढली असून कचऱ्याचेही साम्राज्य आहे. यामुळे पाण्याच्या गतीला अडथळा निर्माण होत असून अनेक ठिकाणी कालवा फुटतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.पूर्वी घोडाझरी तलावाचे पाणी सोडण्यापूर्वी नवरगाव-गडबोरीकडे येणाऱ्या कालव्यातील गाळ, कचरा काढला जात होता. काही ठिकाणी कालवा फुटण्याची स्थिती असेल. त्या ठिकाणी पूर्वीच दुरुस्ती केली जात होती. परंतु अलीकडे घोडाझरी सिंचाई विभाग याकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ज्या परिस्थितीत कालवा आहे त्यातून पाणी सोडले जात आहे. यावर्षीसुद्धा नवरगावकडे येणाऱ्या कालव्यातील गाळ काढलेला नाही. केवळ कालव्यातील काही भागातील कचरा कापण्याचे काम करण्यात आले आहे. तर काही भागात अजूनही कचरा तसाच आहे. त्यामुळे पाणी वाहण्याची गती मंदावणार असून कालवा फुटण्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या. परंतु संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. काही शेतकरी विभागाच्या कारभाराला कंटाळले असून स्वत:च पाण्याचे स्त्रोत निर्माण करीत आहेत.गाळ काढण्याची मागणीपाण्याचे नियोजन करण्यासाठी कालव्याला सिमेंट पायºया बसवून उपवितरिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु बऱ्याच ठिकाणच्या पायऱ्या फुटल्या आहेत. या ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत असल्याने घोडाझरी सिंचाई शाखेने पाण्याचे योग्य नियोजन करून कालव्यातील कचरा व गाळ काढून गडबोरी वानेरी, वाकड या शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी कसे मिळेल, याचे नियोजन करण्याची मागणी केली जात आहे.शेतकऱ्यांकडून स्वच्छतानवरगाव-गडबोरी या कालव्याची अशी स्थिती आहे. तर उपकालव्याची काय असेल,मध्येही कचºयाचे साम्राज्य आहे. ज्या शेतकºयांना गरज आहे असे शेतकरी उपकालव्यातील कचरा काढतात आणि पाणी मिळविण्याचा प्रयत्न करतात.

टॅग्स :Ghodazari Damघोडाझरी धरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प