शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

मोकळ्या जागांवर झुडपांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 21:56 IST

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसामुळे शहरातील मोकळ्या जागांमध्ये, घराभोवतालच्या जागेवर, घरासमोरील पटांगणात अनावश्यक झुडुपे व गवत वाढले आहे. या अनावश्यक झाडेझुडुपांमध्ये साप, विंचू यासारखे सरपटणारे प्राणी असण्याची शक्यता असून एखादी दुर्घटनाही घडू शकते.

ठळक मुद्देमनपाचे दुर्लक्ष : सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे धोका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसामुळे शहरातील मोकळ्या जागांमध्ये, घराभोवतालच्या जागेवर, घरासमोरील पटांगणात अनावश्यक झुडुपे व गवत वाढले आहे. या अनावश्यक झाडेझुडुपांमध्ये साप, विंचू यासारखे सरपटणारे प्राणी असण्याची शक्यता असून एखादी दुर्घटनाही घडू शकते. मात्र या अनावश्यक गवत व झाडेझुडुपा महानगरपालिका प्रशासन गोंजारत बसल्याचे दिसून येते. नागरिकांनी तक्रारी करूनही सफाई कर्मचारी नकार देत असल्याने हा कचरा आणखी वाढत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.आॅगस्ट महिन्याचा पहिला पंधरवाडा सुरू आहे. या महिन्यात चंद्रपूर शहरात बºयापैकी पाऊस झाला. जुलै महिन्यातही पाऊस आला होता. या पावसामुळे चंद्रपुरातील अनेक मोकळ्या जागांवर अनावश्यक झुडुपे, गवत वाढले आहे. घराच्या शेजारी, पटांगणातही हा हिरवा कचरा वाढला आहे. चंद्रपुरातील अनेक वसाहतीमधील घरांकडे जाण्यासाठी पायवाट आहे. ही पायवाटही या कचºयाने गिळंकृत झाली आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास अशा वाटेने जाताना साप, विंचूवर पाय तर पडणार नाही ना, अशी भीती नागरिकांना असते. महानगरपालिकेचे सफाई कामगार महिन्यातून, काही ठिकाणी दोन महिन्यातून एकदा नाल्यांचा उपसा करायला येतात. नाल्यांचा उपसा केल्यानंतर हे सफाई कामगार केवळ नाल्यांच्या काठावरील गवत व अनावश्यक झाडे तोडतात. मात्र घराच्या सभोवताल असलेले गवत, पटांगणातील हिरवा कचरा साफ करीत नाही. घरातील लोकांनी आर्जव केली तरी हे सफाई कामगार ‘आमचे हे काम नाही’, असे सांगत याकडे दुर्लक्ष करतात. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने मोकळ्या जागांवरील, पटांगणावरील व घराच्या भोवताली असलेल्या या झुडुपांमध्ये साप, विंचू यासारख्या विषारी सरपटणाºया प्राण्यांचा वावर असू शकतो.मनपाकडून अपेक्षामहानगरपालिका प्रशासनाने आपल्या सफाई कामगारांच्या माध्यमातून शहरातील विविध घराशेजारी व पटांगणात असलेले अनावश्यक झाडे, गवतांवर फावडा चालवून ते साफ करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मनपाने आजवर ही मोहीम राबविली नाही. मात्र यावेळी मनपाने ही मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.डासांचा प्रचंड प्रादुर्भावशहरातील मोकळ्या जागा, रिकामे प्लॉट्स यामध्ये झाडेझुडुपे तर आहेच. शिवाय खोलगट भागात पावसाचे पाणीही साचून आहे. त्यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. या डासांचा त्या परिसरातील लोकांना मोठा त्रास होत आहे. डासांमुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारालाही आमंत्रण मिळत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका