शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

श्री तिरुपती बालाजीचा ब्रम्होत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 01:47 IST

चुनाळा येथील देवस्थानात श्री तिरुपती बालाजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होऊन १२ वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्त देवस्थान कमिटीच्या वतीने बारावा ब्रह्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देचुनाळा : समाजोपयोगी विविध कार्यक्रमांनी महोत्सवाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : चुनाळा येथील देवस्थानात श्री तिरुपती बालाजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होऊन १२ वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्त देवस्थान कमिटीच्या वतीने बारावा ब्रह्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. तीन दिवस धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती.ब्रह्मोत्सवाअंतर्गत २८९ मोतीबिंदू रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. सलग चार दिवस चाललेल्या सोहळ्याची सांगता महाप्रसादाने झाली. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. सोहळ्याची सुरुवात गुरुवारी ग्रामसफाईने झाली. ग्रामस्थ, श्री संप्रदाय सेवा समितीचे सदस्य, शिवाजी विद्यालय, जि. प. मराठी, तेलगू शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि महिला बचत गटातील सदस्य सहभागी झाले होते. गावतील प्रमुख रस्ते आणि देवस्थान परिसराची स्वच्छता करून जनजागृती करण्यात आली. त्यानंतर रक्तदान शिबिरात घेण्यात आले. २४ रक्तदात्यांनी रक्तदान करुन राष्टÑीय कार्यात सहभाग नोंदविला. ब्रह्मोत्सव सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रेक्षकांचे मनोरंजन व प्रबोधन केले.ब्रम्होत्सव सोहळ्यातील प्रमुख धार्मिक कार्यक्रम विजयवाडा येथील श्री यज्ञकेसरी शास्त्रपूर्ण पराशराम पठ्ठभिरामायाचार्यालू महाराज यांच्या हस्ते झाले. तेलगू भाषिकांसह इतर बालाजी भक्त बहुसंख्येने उपस्थित होते. कीर्तनकार जयश्री गावतुरे यांनी धार्मिक व सामाजिक विषयांवर मार्मिक मार्गदर्शन केले. परिसरातील गरजू आणि दिव्यांग रुग्णांना उपचाराद्वारे दृष्टी लाभावी, याकरिता दरवर्षी देवस्थान, लॉयन्स क्लब चंद्रपूर आणि सेवाग्राम येथील कस्तुरबा मेडिकल कॉलेजच्या वतीने विनामुल्य मोतीबिंदू तपासणी तसेच कृत्रिम मोतीबिंदू भिंगारोपण शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले होते. या शिबिराचा परिसरातील शेकडो रुग्णांनी लाभ घेतला. देवस्थानास सहकार्य करणाºया देणगीदाºयांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर भगवान बालाजी, लक्ष्मीदेवी व भूदेविच्या उत्सवमूर्तीची १०८ कलशासह शोभायात्रा काढण्यात आली. दरवर्षी समाजोपयोगी कार्यक्रमांवर भर देण्याचा संकल्प मंदिरांच्या पदाधिकाºयांनी यावेळी जाहीर केला. आयोजनासाठी ग्रामस्थांनी सहकार्य केले. सर्वधर्मसमभावाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मंदिराद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. शिवाय, गरजूंना विविध प्रकारची मदत देण्यात येईल, अशी माहिती माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी दिली.शेकडो रुग्णांवर उपचारब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सुमारे ४६० रुग्णांनी नोंदणी करुन आरोग्य उपचाराचा लाभ घेतला. डॉक्टरांनी तपासणी केलेल्या २८९ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. सर्व रुग्णांना देवस्थानकडून मदत करण्यात येणार आहे. याशिवाय, चुनाळा येथून विवाहानंतर सासरी गेलेल्या मुलींचा जावयांसह भेटवस्तु देऊन उपस्थित मान्यवरांनी सत्कार केला.