शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवरचे विरूर रेल्वे स्टेशन आहे तांदूळ तस्करांचा मोठा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2022 19:28 IST

Chandrapur News महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर (स्टे.) हे गाव तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहे. तेलंगणात स्वस्त धान्य दुकानात मिळणारा एक रुपया किलोचा तांदूळ पॅकिंग बदलून दुसऱ्या पिशवीमध्ये भरून स्टेशनवर उतरविला जात आहे.

ठळक मुद्देब्रह्मपुरी व गोंदियात जादा भावाने विक्रीकाही राईस मिलमध्ये पाॅलिश करून लावले जाते नवे लेबल

चंद्रपूर : महाराष्ट्रालगतच्या तेलंगणा राज्यातील स्वस्त धान्य दुकानात एक रुपया किलोने मिळणारा तांदूळ पॅकिंग बदलून थेट महाराष्ट्राच्या राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे रेल्वेने पोहोचत आहे. हा तांदूळ रेल्वे गाडीची वाट पाहणारे तस्कर थेट ब्रह्मपुरी, गोंदियासह अन्य भागांत नेऊन त्यावर पुन्हा प्रक्रिया करून जादा दराने विक्री करीत असल्याची धक्कादायक माहिती लोकमतने केलेल्या रिॲलिटी चेकमधून पुढे आली आहे. विरूर पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर असताना कोणीही याबाबत शंका घेत नाही. पुरवठा विभागही डोळे मिटून असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर (स्टे.) हे गाव तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहे. या ठिकाणी रेल्वेतून तेलंगणात स्वस्त धान्य दुकानात मिळणारा एक रुपया किलोचा तांदूळ पॅकिंग बदलून दुसऱ्या पिशवीमध्ये भरून विरुर (स्टे.) येथील रेल्वे स्टेशनवर उतरविला जात आहे. त्या ठिकाणी स्थानिक परिसरातील आठ ते दहा तांदूळ तस्कर आपल्या चारचाकी वाहनाने रेल्वे स्टेशनवर उतरलेला तांदूळ वाहनात भरून गोडाऊनमध्ये नेतात. नंतर हाच तांदूळ ब्रह्मपुरी, गोंदिया येथे जास्त दराने विकला जातो. तिथे या तांदळाला मिलमध्ये पिसून दुसऱ्या पिशवीत भरून लेबल लावून बाजारात जादा दाराने विक्रीला आणला जात आहे. यामध्ये मोठे रॅकेट आहे. हा सर्व प्रकार, रेल्वे प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या डोळ्यांसमोर होत असताना काहीच कारवाई होत नाही. यामागील कारण समजण्यासारखे आहे.

गडचिरोली जिल्ह्यातही होते तस्करी

मंचेरियाल, जयशंकर भोपणपल्ली येथून थेट गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे हा तांदूळ येत आहे. देसाईगंजमार्गे राज्यात हा सरकारी तांदूळ विकला जात आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील पुरवठा अधिकारी हे सतर्क नसल्याने हा कोट्यवधींचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे. दोन्ही जिल्ह्यातील राईस मिल हे मुख्य केंद्र आहे. या राईस मिलमध्ये प्रक्रिया करून भेसळ करून एक रुपया किलोचा तांदूळ पॉलिश करून नवे लेबल लावून भरमसाट दरात विकला जात आहे. अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी