शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

वीज ग्राहकांच्या हक्कांना शॉक देण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 14:08 IST

मूळ ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच व विद्युत लोकपाल विनियम हे २००६ पासून अंमलात आहे. यात दुरुस्त्या अथवा बदल हे वेळोवेळी होत असतात. मात्र आयोगाने याबाबतचा नवीन मसुदा १७ मे रोजी जाहीर केला आहे.

ठळक मुद्देविद्युत नियामक आयोगाचा निर्णयनिवारण मंचचा ढाचा बदलणार

रवी जवळेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच व विद्युत लोकपालचा मूळ ढाचा बदलण्याचा घाट घातला आहे. यात ग्राहकांसाठी जाचक अनेक नवीन व महावितरणच्या बाजूचे नियम प्रस्तावित केले आहेत. यामुळे ग्राहकांच्या हक्कांवर गदा येऊन न्याय मिळणे मुश्कील होणार आहे.मूळ ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच व विद्युत लोकपाल विनियम हे २००६ पासून अंमलात आहे. यात दुरुस्त्या अथवा बदल हे वेळोवेळी होत असतात. आवश्यक त्या त्रुटी दूर करून यंत्रणा अधिक कार्यक्षम करणे गरजेचे आहे. पण ग्राहकांचे अधिकार पूर्णपणे संपविणे हे योग्य नाही. मात्र आयोगाने याबाबतचा नवीन मसुदा १७ मे रोजी जाहीर केला आहे. १७ जून २०२० पर्यंत सूचना व हरकती मागविल्या आहेत.नवीन प्रस्तावाचा तपशिलात अभ्यास केल्यानंतर सुधारणांचे खरे स्वरुप समोर येते. ग्राहक गाºहाणे निवारण मंचमध्ये तीन सदस्यांचा समावेश असतो. त्यापैकी एक महावितरणचा व एक ग्राहक प्रतिनिधी असतो. तर अध्यक्ष हा सेवानिवृत्त ज्येष्ठ न्यायिक अधिकारी, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी व तत्सम अधिकारी वा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा सेवानिवृत्त प्राचार्य असतो. ही यंत्रणा अत्यंत समतोल, स्वतंत्र व स्वायत्त आहे. तथापि, नवीन प्रस्तावात याला छेद देऊन अध्यक्षपदी महावितरणचा सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता नेमण्याची तरतूद केली आहे. ही अत्यंत घातक आहे. कारण अधिकारी सेवानिवृत्त झाला तरी तो महावितरणचाच असतो वा पूर्णपणे कंपनीधार्जिणाच असतो. तीन सदस्यांच्या मंचातील दोन सदस्य महावितरणचे असल्यास सर्व नियम धाब्यावर बसवून ‘महावितरणच्या बाजूनेच निकाल’ या एकमेव ध्येयाने हा मंच काम करण्याची शक्यता अधिक आहे. याबरोबरच विद्युत लोकपाल हे एकाच व्यक्तीचे न्यायपीठ आहे. सध्याच्या नियमात या ठिकाणी सेवानिवृत्त न्यायाधीश अथवा सेवानिवृत्त राज्य शासनाचा सचिव वा वीजक्षेत्रातील सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी असावा ही तरतूद आहे. परंतु नवीन प्रस्तावामध्ये मात्र महावितरणचा सेवानिवृत्त कार्यकारी संचालक अथवा संचालक या पदास पात्र राहील, असा बदल केला आहे. अशी व्यक्ती लोकपालपदी आली तर ती पूर्वीच्या नोकरीशी इमान ठेवून ग्राहकांवर अन्याय करू शकते.तसेच या नवीन नियमांमध्ये महावितरणला मंच व लोकपालसमोर फेरआढावा याचिका दाखल करण्यास परवानगी दिली आहे. ती पूर्वीच्या नियमात नव्हती व करणे आवश्यकही नाही. कारण मंच वा लोकपाल हे ग्राहकांच्या याचिकासाठी आहेत, महावितरणसाठी नाहीत. त्यामुळे अशी तरतूद केल्यास तिचा अनावश्यक वापर होईल, यात शंका नाही. त्याचबरोबर मंच अथवा लोकपाल यांना सुनावणीशिवाय निकाल देता येईल, अशी नवी तरतूद सूचविण्यात आली आहे. ही तरतूद मूलभूत हक्कांना बाधा आणणारी आहे.

टॅग्स :electricityवीज