शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही तालुक्यात एक महिन्यापासून शालेय पोषण आहार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 15:43 IST

शासनाकडून शालेय पोषण आहार साहित्याचा पुरवठा होत नसल्याने तालुक्यातील खासगी व जि.प. च्या जवळपास १५० शाळेच्या हजारो विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे.

ठळक मुद्दे१५० शाळेचे हजारो विद्यार्थी वंचितपुरवठा कंत्राटदारच मिळत नसल्याची बोंब

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शासनाकडून शालेय पोषण आहार साहित्याचा पुरवठा होत नसल्याने तालुक्यातील खासगी व जि.प. च्या जवळपास १५० शाळेच्या हजारो विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे.विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने मध्यान्ह भोजन सुरु करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांना मुंगदाळ, मसुरदाळ, वटाणा, मटकी या कडधान्याचा पोषण आहार तयार करुन दिला जात होता. इयत्ता १ ते ८ विद्यार्थ्यांना दररोज शालेय पोषण आहार दिले जात होते. बचत गटाच्या महिलांद्वारे तयार करण्यात येणाऱ्या  आहारासाठी १५० रुपये व २.१६ पैसे दराने इंधन व भाजीपाला खर्च प्रती विद्यार्थी दिले जात होते. त्यामुळे अनेक बचतगटांच्या महिलांना रोजगार मिळाला होता.परंतु, धान्य व साहित्य पुरवठा करण्यासाठी कंत्राटदार न मिळाल्याचे कारण पुढे करीत धान्याचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. धान्य पुरवठा सुरळीत सुरू होईपर्यंत मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती यांना शासनाने पत्र देवून पंधरा दिवस विद्यार्थ्यांना पोषण आहार लागणारे साहित्य स्वत:च्या खर्चाने आणावे, असे कळविले आहे.मात्र अनेक शाळा व्यवस्थापन समित्यांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने अनेक शाळांनी पोषण आहार तयार करणे बंद केले आहे. त्यामुळे विद्यार्थी शालेय पोषण आहारपासून वंचित आहेत. मुख्याध्यापकांनी स्वत: जर साहित्य खरेदी करुन विद्यार्थ्यांना आहार दिले तरी त्याचे बिल कधी मिळणार, हे प्रशासन व शासनाकडे उत्तर नसल्याने शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांनी शासनाच्या पत्राकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी शालेय पोषण आहार वाटप बंद आहे.

टॅग्स :Schoolशाळा