शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

शेगावच्या शेतकऱ्यांनी उभारला डाळ मिल उद्योग

By admin | Updated: September 28, 2016 00:52 IST

शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर पिकणाऱ्या मालावर घरीच प्रक्रिया करणे काळाजी गरज आहे.

संताजी शेतकरी गटाचा उपक्रम : पहिल्याच वर्षी भरघोस नफाचंद्रपूर : शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर पिकणाऱ्या मालावर घरीच प्रक्रिया करणे काळाजी गरज आहे. ही गरज लक्षात घेता वरोरा तालुक्यातील शेगाव (बु.) येथील शेतकऱ्यांनी डाळ मिलचा अनोखा उपक्रम सुरू करून इतर शेतकऱ्यांना कृषी आधारीत उद्योगांकडे वळण्याचा संदेश दिला आहे. पंधरा शेतकऱ्यांनी एकत्र येत केलेली ही सुरूवात पहिल्याच वर्षी भरघोस नफा देणारी ठरली आहे.शेगाव (बु.) हे साधारणपणे ५ हजार ८०० लोकसंख्येचे गाव. गावातील शेतकरी परंपरेने कापूस, सोयाबिन, धान, तूर ही पारंपारिक पिके घेतात. हल्ली या पिकांना खर्च अधिक आणि त्या तुलनेने उत्पन्न कमी असल्याने यातून शेतकऱ्यांना फार नफा मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषि आधारित प्रक्रीया उद्योगांकडे वळणे फार आवश्यक आहे. त्यासाठीच कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)च्यावतीने शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोगासाठी प्रवृत्त केले जात आहे.शेगाव येथील शेतकऱ्यांना आत्माच्या योजनांची माहिती झाल्यानंतर विनोद राऊत या गावातील होतकरू शेतकऱ्यांने आत्माच्या सहकार्याने सन २०१२ मध्ये संताजी शेतकरी समुह गट स्थापन केला होता. गटाच्यावतीने शेतमालावर प्रक्रीया करून मुल्यवर्धन केल्यास त्यास चांगला भाव मिळू शकतो, ही भूमिका समोर ठेवत दालमिल सुरू करण्याचा निर्णय गटाने घेतला होता. आत्माच्यावतीने गटास या उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच साठी काढणी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थानांतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदान योजनेची माहिती दिली. आत्मा प्रकल्पाने गटास प्रकल्प खर्चाच्या ६० टक्के रक्कम अनुदान म्हणून उपलब्ध करून दिले.गटास स्वहिस्सा ४० टक्के भरावयाचा होता. गटातील सदस्यांनी मासिक बचतीतून ही रक्कम जमा केली. गटातील सदस्य विलास निखाते यांनी दालमिलसाठी जागा उपलब्ध करून दिल्याने प्रत्यक्षात मिलला सुरूवात झाली. गटातील प्रत्येक सदस्यास डाळ काढण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सदस्यांनी आपल्या गावासह आजूबाजूच्या गावांमध्ये डाळ प्रक्रीयेबाबत जनजागृती केली. त्यामुळे इतर ठिकाणाहूनही येणाऱ्या अन्य शेतकऱ्यांच्या तुरीवर डाळ प्रक्रीयेची कामे करून दिली जात आहे. यातून मोठा नफा गटास मिळतो. (स्थानिक प्रतिनिधी)भरघोस नफासर्व खर्च वजा जाता गटास दररोज सरासरी एक हजार रुपये नफा प्रथम वर्षी मिळत होता. त्यानंतर तो नफा सारखा वाढत गेला. गटाने आता शेतमालावर मोठ्या प्रमाणावर प्रक्रीया करून त्याचे पॅकेज, बँडीग व मार्केटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर शेतकऱ्यांनीही या गटासारखा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी आत्मा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.