शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

शेगावच्या शेतकऱ्यांनी उभारला डाळ मिल उद्योग

By admin | Updated: September 28, 2016 00:52 IST

शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर पिकणाऱ्या मालावर घरीच प्रक्रिया करणे काळाजी गरज आहे.

संताजी शेतकरी गटाचा उपक्रम : पहिल्याच वर्षी भरघोस नफाचंद्रपूर : शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर पिकणाऱ्या मालावर घरीच प्रक्रिया करणे काळाजी गरज आहे. ही गरज लक्षात घेता वरोरा तालुक्यातील शेगाव (बु.) येथील शेतकऱ्यांनी डाळ मिलचा अनोखा उपक्रम सुरू करून इतर शेतकऱ्यांना कृषी आधारीत उद्योगांकडे वळण्याचा संदेश दिला आहे. पंधरा शेतकऱ्यांनी एकत्र येत केलेली ही सुरूवात पहिल्याच वर्षी भरघोस नफा देणारी ठरली आहे.शेगाव (बु.) हे साधारणपणे ५ हजार ८०० लोकसंख्येचे गाव. गावातील शेतकरी परंपरेने कापूस, सोयाबिन, धान, तूर ही पारंपारिक पिके घेतात. हल्ली या पिकांना खर्च अधिक आणि त्या तुलनेने उत्पन्न कमी असल्याने यातून शेतकऱ्यांना फार नफा मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषि आधारित प्रक्रीया उद्योगांकडे वळणे फार आवश्यक आहे. त्यासाठीच कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)च्यावतीने शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोगासाठी प्रवृत्त केले जात आहे.शेगाव येथील शेतकऱ्यांना आत्माच्या योजनांची माहिती झाल्यानंतर विनोद राऊत या गावातील होतकरू शेतकऱ्यांने आत्माच्या सहकार्याने सन २०१२ मध्ये संताजी शेतकरी समुह गट स्थापन केला होता. गटाच्यावतीने शेतमालावर प्रक्रीया करून मुल्यवर्धन केल्यास त्यास चांगला भाव मिळू शकतो, ही भूमिका समोर ठेवत दालमिल सुरू करण्याचा निर्णय गटाने घेतला होता. आत्माच्यावतीने गटास या उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच साठी काढणी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थानांतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदान योजनेची माहिती दिली. आत्मा प्रकल्पाने गटास प्रकल्प खर्चाच्या ६० टक्के रक्कम अनुदान म्हणून उपलब्ध करून दिले.गटास स्वहिस्सा ४० टक्के भरावयाचा होता. गटातील सदस्यांनी मासिक बचतीतून ही रक्कम जमा केली. गटातील सदस्य विलास निखाते यांनी दालमिलसाठी जागा उपलब्ध करून दिल्याने प्रत्यक्षात मिलला सुरूवात झाली. गटातील प्रत्येक सदस्यास डाळ काढण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सदस्यांनी आपल्या गावासह आजूबाजूच्या गावांमध्ये डाळ प्रक्रीयेबाबत जनजागृती केली. त्यामुळे इतर ठिकाणाहूनही येणाऱ्या अन्य शेतकऱ्यांच्या तुरीवर डाळ प्रक्रीयेची कामे करून दिली जात आहे. यातून मोठा नफा गटास मिळतो. (स्थानिक प्रतिनिधी)भरघोस नफासर्व खर्च वजा जाता गटास दररोज सरासरी एक हजार रुपये नफा प्रथम वर्षी मिळत होता. त्यानंतर तो नफा सारखा वाढत गेला. गटाने आता शेतमालावर मोठ्या प्रमाणावर प्रक्रीया करून त्याचे पॅकेज, बँडीग व मार्केटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर शेतकऱ्यांनीही या गटासारखा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी आत्मा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.