शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

शेगावच्या शेतकऱ्यांनी उभारला डाळ मिल उद्योग

By admin | Updated: September 28, 2016 00:52 IST

शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर पिकणाऱ्या मालावर घरीच प्रक्रिया करणे काळाजी गरज आहे.

संताजी शेतकरी गटाचा उपक्रम : पहिल्याच वर्षी भरघोस नफाचंद्रपूर : शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर पिकणाऱ्या मालावर घरीच प्रक्रिया करणे काळाजी गरज आहे. ही गरज लक्षात घेता वरोरा तालुक्यातील शेगाव (बु.) येथील शेतकऱ्यांनी डाळ मिलचा अनोखा उपक्रम सुरू करून इतर शेतकऱ्यांना कृषी आधारीत उद्योगांकडे वळण्याचा संदेश दिला आहे. पंधरा शेतकऱ्यांनी एकत्र येत केलेली ही सुरूवात पहिल्याच वर्षी भरघोस नफा देणारी ठरली आहे.शेगाव (बु.) हे साधारणपणे ५ हजार ८०० लोकसंख्येचे गाव. गावातील शेतकरी परंपरेने कापूस, सोयाबिन, धान, तूर ही पारंपारिक पिके घेतात. हल्ली या पिकांना खर्च अधिक आणि त्या तुलनेने उत्पन्न कमी असल्याने यातून शेतकऱ्यांना फार नफा मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषि आधारित प्रक्रीया उद्योगांकडे वळणे फार आवश्यक आहे. त्यासाठीच कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)च्यावतीने शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोगासाठी प्रवृत्त केले जात आहे.शेगाव येथील शेतकऱ्यांना आत्माच्या योजनांची माहिती झाल्यानंतर विनोद राऊत या गावातील होतकरू शेतकऱ्यांने आत्माच्या सहकार्याने सन २०१२ मध्ये संताजी शेतकरी समुह गट स्थापन केला होता. गटाच्यावतीने शेतमालावर प्रक्रीया करून मुल्यवर्धन केल्यास त्यास चांगला भाव मिळू शकतो, ही भूमिका समोर ठेवत दालमिल सुरू करण्याचा निर्णय गटाने घेतला होता. आत्माच्यावतीने गटास या उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच साठी काढणी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थानांतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदान योजनेची माहिती दिली. आत्मा प्रकल्पाने गटास प्रकल्प खर्चाच्या ६० टक्के रक्कम अनुदान म्हणून उपलब्ध करून दिले.गटास स्वहिस्सा ४० टक्के भरावयाचा होता. गटातील सदस्यांनी मासिक बचतीतून ही रक्कम जमा केली. गटातील सदस्य विलास निखाते यांनी दालमिलसाठी जागा उपलब्ध करून दिल्याने प्रत्यक्षात मिलला सुरूवात झाली. गटातील प्रत्येक सदस्यास डाळ काढण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सदस्यांनी आपल्या गावासह आजूबाजूच्या गावांमध्ये डाळ प्रक्रीयेबाबत जनजागृती केली. त्यामुळे इतर ठिकाणाहूनही येणाऱ्या अन्य शेतकऱ्यांच्या तुरीवर डाळ प्रक्रीयेची कामे करून दिली जात आहे. यातून मोठा नफा गटास मिळतो. (स्थानिक प्रतिनिधी)भरघोस नफासर्व खर्च वजा जाता गटास दररोज सरासरी एक हजार रुपये नफा प्रथम वर्षी मिळत होता. त्यानंतर तो नफा सारखा वाढत गेला. गटाने आता शेतमालावर मोठ्या प्रमाणावर प्रक्रीया करून त्याचे पॅकेज, बँडीग व मार्केटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर शेतकऱ्यांनीही या गटासारखा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी आत्मा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.