शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

पाणपोईत मडक्यांऐवजी झारांनी घेतली जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 22:56 IST

काळानुरुप विवधि क्षेत्रामध्ये बदल होत आहेत. या बदलाचा परिणाम पारंपरिक पाणपोईवर झाला आहे. मडक्यांची जागा आता झारांनी घेतल्याचे बल्लारपुरात दिसून येत आहे.

ठळक मुद्देपाणपोईचे स्वरूप बदलले : सेवाभावी संस्थांनीही स्वीकारला बदल

वसंत खेडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर: काळानुरुप विवधि क्षेत्रामध्ये बदल होत आहेत. या बदलाचा परिणाम पारंपरिक पाणपोईवर झाला आहे. मडक्यांची जागा आता झारांनी घेतल्याचे बल्लारपुरात दिसून येत आहे.पाणपोई म्हटले की पूर्वी रस्त्याच्या कडेला बांबूच्या तट्याचे चौकोनी छोटे मंडप! त्यात माती खोदून ठेवलेले लाल रंगाचे तीन-चार मोठे मडके नजरेला दिसायचे. त्याभोवती लाल रंगाचे पातळ फडके. मडक्यातील पाणी थंडगार राहावे, याकरिता लाल फडक्यावर सतत पाणी शिंपडत जाणे. मंडपाच्या दर्शनी भागात लांब लाकडी पाटी, त्यावर एक दोन ग्लास आणि एक मग्गा... ही व्यवस्था म्हणजे मडक्यात पाणी भरणे ते पाणी तहानलेल्यांना देणे. याकरिता पाणपोईत एखादी महिला वा पुरुषाचे त्या मंडपात असणे! शहर, गावात अशा पाणपोई उन्हाळ्यात उभ्या असायच्या. या पाणपोई गावातील दानशूर व्यक्ती स्वखर्चाने लावत होते. लोकांची तृष्णा भागविण्यासारखे मोठे पुण्य नाही ही त्यामागची भावना! पुढे या पुण्यकार्यात सेवाभावी संस्था, सामाजिक व राजकीय पक्षांनीही लक्ष घातले. हे काम प्रसिद्धीने व्हावे, याकरिता पाणपोईवर आपल्या संस्थेचे बॅनर लावले जाते. मोठ्या व्यक्तींच्या हस्ते उद्घाटन करून माध्यमांत फोटो छापून आणण्याची परंपरा सुरू झाली. पाणपोई वाढल्याने सर्वत्र पेयजल मिळण्याची सोय झाली. बाहेर पडणाऱ्या वाटेने जाणाºया लोकांची तृष्णा भागू लागली. या निमित्ताने दोन-तीन महिन्यांकरिताच का होईना. पण गरजवंताना पाणपोईतील काम मिळू लागले. पाणी फिल्टर करण्याचे तंत्र आले. काही वर्षांनंतर पाणी थंडगार ठेवण्याचे झार निघाले. त्या झारांना तोट्या लावल्या आणि सेल्फ सर्व्हीसने त्यातून पाणी मिळण्याची सोय झाली. त्यामुळे पूर्वीच्या पाणपोईचे स्वरुपच बदलले. आता पाणपोईत मडके ठेवणे पाणी वाढण्याकरिता रोजीचा माणूस ठेवणे बऱ्याच ठिकाणी बंद झाले आहे.सावलीकरिता मंडप टाका किंवा एखाद्या इमारतीच्या आडोशाखाली टेबल ठेवा, त्यावर पाण्याचे झार ठेवा, ग्लास ठेवा. पाणपोईचे बॅनर लावा. लोकांचे सहजपणे लक्ष जाते. तहानलेला माणूस येतो. ग्लासने झारमधील पाणी घेऊन पितो आणि पाणपोई लावणाºयाला मनोमनी धन्यवाद देऊन पुढे जातो. पाणपोई लावण्याचा हाच मुख्य उद्देश ! फिल्टर पद्धतीनेमुळे आणि तोटी लावलेले थंड पाण्याचे झार बाजारात आल्याने ही जुनी पद्धत बदलली एवढेच! बाकी, प्रसिद्धीतंत्र तेच. संस्थेचे बॅनर लावा, मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून माध्यमांमध्ये फोटो छापा. काही संस्था प्रसिद्धीच्या दूर राहून पुण्याच काम करीत असतात. हल्ली बाटली बंद पाणी विकत मिळत असले तरी पाणपोईचे महत्व कमी झाले नाही. पाणपोई नित्य कितीतरी लोकांची तृष्णा भागवत आहे. त्यानिमित्ताने लोकांच्या हातून सेवा कार्य होत आहे. पाणपोईचे रूप बदले, सेवा मात्र तिच. तहानलेल्यांची तृष्णा भागविण्याची!मुक्या जनावरांची सुविधाभागविण्याकरिता शहर व गावात पाणपोई लागतात. मुक्या प्राण्यांची तृष्णा कशी भागणार? त्यावर उपाय म्हणून विसापूर येथील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र इटनकर यांनी विसापुरात रस्त्याला लागून असलेल्या शेतात, रस्त्याच्या कडेला टाके बांधून त्यात पाणी साठविणे सुरु केले आहे. या पाणपोईत मुकी जनावरे तृष्णा भागवित आहेत.