शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या धोरणांविरोधात शेतकऱ्यांचा लढा तीव्र करणार

By admin | Updated: March 11, 2016 01:42 IST

आलटून पालटून सत्ता उपभोगलेल्या आतापर्यंतच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण न आखल्याने शेतकरी वर्ग खितपत पडला आहे.

वामनराव चटप : चौगान येथे कार्यक्रमचौगान : आलटून पालटून सत्ता उपभोगलेल्या आतापर्यंतच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण न आखल्याने शेतकरी वर्ग खितपत पडला आहे. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या न्याय व हक्काकरिता सरकारच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांचा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा माजी आ. वामनराव चटप यांनी दिला.चौगान येथे मंगळवारी आयोजित स्व. शरद जोशी अभिवादन व छायाचित्र अनावरणाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. स्व. शरद जोशी यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या अस्मितेची लढाई लढली. या देशातील शेतकरी वर्ग आपल्या पायावर भक्कमपणे उभा राहण्यासाठी शेवटपर्यंत झटले. शेती या धंद्याकडे सरकारने जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला रास्त भाव मिळावा, यासाठी देशात आंदोलने केली. आता शेतकऱ्यांकडे सरकारने दुर्लक्ष करता कामा नये. अन्यथा स्व. शरद जोशी यांच्या विचाराने प्रेरीत झालेला शेतकरी वर्ग खपवून घेणार नाही, असा इशारा माजी आ. वामनराव चटप यांनी दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कृष्णा राऊत होते. यावेळी अ‍ॅड. मोरांडे, अ‍ॅड. गोविंदराव भेंडारकर, विष्णू पाटील खुणे, प्रा. जेंगठे, डॉ. कृष्णा राऊत आदी उपस्थित होते. त्यांनीही स्व. शरद जोशी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व शेतकरी वर्गाला संघटीत होऊन त्यांच्या विचारावर मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले. यावेळी गजानन मातेरे, दादाभाऊ नवलाखे, दिनकर हजारे, मुरलीधर मोरांडे, केवळराम धोटे, अ‍ॅड. नरहरी धोटे, सरिता नन्नावरे, मनोरथा मैन्द, बाळू चहांदे, श्रीराम मातेरे, श्रावण चावरे, कृष्णा बुराडे, दयाराम तलमले, अनिल पिलारे, बकाराम भुते यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थित होती.स्व. शरद जोशी अमर रहे, भिक नको, हवे घामाचे दाम, शेतकरी संघटना जिंदाबाद अशा घोषणा देत गावातून रॅली काढण्यात आली.प्रास्ताविक शालीक नाकाडे यांनी केले. संचालन रूपेश बांगरे तर आभार दादा नवलाखे यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थित होती. (वार्ताहर)