शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

सरकारच्या धोरणांविरोधात शेतकऱ्यांचा लढा तीव्र करणार

By admin | Updated: March 11, 2016 01:42 IST

आलटून पालटून सत्ता उपभोगलेल्या आतापर्यंतच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण न आखल्याने शेतकरी वर्ग खितपत पडला आहे.

वामनराव चटप : चौगान येथे कार्यक्रमचौगान : आलटून पालटून सत्ता उपभोगलेल्या आतापर्यंतच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण न आखल्याने शेतकरी वर्ग खितपत पडला आहे. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या न्याय व हक्काकरिता सरकारच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांचा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा माजी आ. वामनराव चटप यांनी दिला.चौगान येथे मंगळवारी आयोजित स्व. शरद जोशी अभिवादन व छायाचित्र अनावरणाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. स्व. शरद जोशी यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या अस्मितेची लढाई लढली. या देशातील शेतकरी वर्ग आपल्या पायावर भक्कमपणे उभा राहण्यासाठी शेवटपर्यंत झटले. शेती या धंद्याकडे सरकारने जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला रास्त भाव मिळावा, यासाठी देशात आंदोलने केली. आता शेतकऱ्यांकडे सरकारने दुर्लक्ष करता कामा नये. अन्यथा स्व. शरद जोशी यांच्या विचाराने प्रेरीत झालेला शेतकरी वर्ग खपवून घेणार नाही, असा इशारा माजी आ. वामनराव चटप यांनी दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कृष्णा राऊत होते. यावेळी अ‍ॅड. मोरांडे, अ‍ॅड. गोविंदराव भेंडारकर, विष्णू पाटील खुणे, प्रा. जेंगठे, डॉ. कृष्णा राऊत आदी उपस्थित होते. त्यांनीही स्व. शरद जोशी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व शेतकरी वर्गाला संघटीत होऊन त्यांच्या विचारावर मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले. यावेळी गजानन मातेरे, दादाभाऊ नवलाखे, दिनकर हजारे, मुरलीधर मोरांडे, केवळराम धोटे, अ‍ॅड. नरहरी धोटे, सरिता नन्नावरे, मनोरथा मैन्द, बाळू चहांदे, श्रीराम मातेरे, श्रावण चावरे, कृष्णा बुराडे, दयाराम तलमले, अनिल पिलारे, बकाराम भुते यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थित होती.स्व. शरद जोशी अमर रहे, भिक नको, हवे घामाचे दाम, शेतकरी संघटना जिंदाबाद अशा घोषणा देत गावातून रॅली काढण्यात आली.प्रास्ताविक शालीक नाकाडे यांनी केले. संचालन रूपेश बांगरे तर आभार दादा नवलाखे यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थित होती. (वार्ताहर)