वामनराव चटप : चौगान येथे कार्यक्रमचौगान : आलटून पालटून सत्ता उपभोगलेल्या आतापर्यंतच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण न आखल्याने शेतकरी वर्ग खितपत पडला आहे. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या न्याय व हक्काकरिता सरकारच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांचा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा माजी आ. वामनराव चटप यांनी दिला.चौगान येथे मंगळवारी आयोजित स्व. शरद जोशी अभिवादन व छायाचित्र अनावरणाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. स्व. शरद जोशी यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या अस्मितेची लढाई लढली. या देशातील शेतकरी वर्ग आपल्या पायावर भक्कमपणे उभा राहण्यासाठी शेवटपर्यंत झटले. शेती या धंद्याकडे सरकारने जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला रास्त भाव मिळावा, यासाठी देशात आंदोलने केली. आता शेतकऱ्यांकडे सरकारने दुर्लक्ष करता कामा नये. अन्यथा स्व. शरद जोशी यांच्या विचाराने प्रेरीत झालेला शेतकरी वर्ग खपवून घेणार नाही, असा इशारा माजी आ. वामनराव चटप यांनी दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कृष्णा राऊत होते. यावेळी अॅड. मोरांडे, अॅड. गोविंदराव भेंडारकर, विष्णू पाटील खुणे, प्रा. जेंगठे, डॉ. कृष्णा राऊत आदी उपस्थित होते. त्यांनीही स्व. शरद जोशी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व शेतकरी वर्गाला संघटीत होऊन त्यांच्या विचारावर मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले. यावेळी गजानन मातेरे, दादाभाऊ नवलाखे, दिनकर हजारे, मुरलीधर मोरांडे, केवळराम धोटे, अॅड. नरहरी धोटे, सरिता नन्नावरे, मनोरथा मैन्द, बाळू चहांदे, श्रीराम मातेरे, श्रावण चावरे, कृष्णा बुराडे, दयाराम तलमले, अनिल पिलारे, बकाराम भुते यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थित होती.स्व. शरद जोशी अमर रहे, भिक नको, हवे घामाचे दाम, शेतकरी संघटना जिंदाबाद अशा घोषणा देत गावातून रॅली काढण्यात आली.प्रास्ताविक शालीक नाकाडे यांनी केले. संचालन रूपेश बांगरे तर आभार दादा नवलाखे यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थित होती. (वार्ताहर)
सरकारच्या धोरणांविरोधात शेतकऱ्यांचा लढा तीव्र करणार
By admin | Updated: March 11, 2016 01:42 IST