शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सावली शहर खादी चळवळीची माऊली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 23:17 IST

सावली हे गाव स्वातंत्र्यपूर्व काळातील ग्रामोद्योग चळवळीचे केंद्र होते. येथे १९३६ ला अखिल भारतीय गांधी सेवा संघाचे अधिवेशन घेण्यात आले होते. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात दोनदा या शहराला भेट दिली. सात दिवस मुक्काम केला. सावली हे शहर खादी चळवळीची माऊली म्हणून सर्वोदयी चळवळीत ओळखली जाते. बदलत्या काळातही ग्रामोद्योगाचे महत्त्व वाढत आहे. परंतु, नवीन पिढीवर या चळवळीच्या संस्काराची गरज आहे.

ठळक मुद्देऐतिहासिक आठवणींचे स्मरण : नवीन पिढीवर ग्रामोद्योग संस्काराची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सावली हे गाव स्वातंत्र्यपूर्व काळातील ग्रामोद्योग चळवळीचे केंद्र होते. येथे १९३६ ला अखिल भारतीय गांधी सेवा संघाचे अधिवेशन घेण्यात आले होते. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात दोनदा या शहराला भेट दिली. सात दिवस मुक्काम केला. सावली हे शहर खादी चळवळीची माऊली म्हणून सर्वोदयी चळवळीत ओळखली जाते. बदलत्या काळातही ग्रामोद्योगाचे महत्त्व वाढत आहे. परंतु, नवीन पिढीवर या चळवळीच्या संस्काराची गरज आहे.सावली येथील नाग विदर्भ चरखा संघाच्या आवारात या भारावलेल्या वातावरणाची अनुभूती येईल. येथील ८२ वर्षांच्या राजाबाळ संगीडवार यांनी येथील तेजस्वी इतिहासाच्या आठवणींना उजाळा दिला. इतिहासाची माहिती देताना संगीडवार म्हणाले, कार्यालयाच्या समोर तेव्हा उभ्या असलेल्या आम्रवृक्षाखाली महात्माजींचे नातू कृष्णदास गांधी व मनोज्ञा यांचा विवाह झाला. गांधीजींसोबत सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, आचार्य विनोबा भावे, डॉ. करिअप्पा, जमनालाल बजाज, सरोजिनी नायडू, सुशीला नायर आदी नेते या काळात सावली येथे मुक्कामी होते. चरखा संघाच्या प्राचीन वास्तूमध्ये गांधीजी आणि त्यांच्या कार्याचा शोध घेताना या महात्म्याने आयुष्यभर ‘खेड्याकडे चला’ हा नारा का दिला हे लक्षात आले. दोनशे चरख्यांवर काम करणारे शेकडो हात आजही सावली येथे सूत कताई करतात. चरखा संघात महिला- पुरूष सूत काततात. सुतापासून उत्तम प्रतीची खादी तयार होते. अखिल भारतीय खादी ग्रामोद्योग कमिशनचा हा चरखा संघ ऐतिहासिक वास्तू आहे. १०० वर्षांपासून सूतकताई व खादी तयार करण्याचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.ऊर्जा देणारी चळवळखादी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी सावलीला भेट दिली. मात्र हे गाव इतिहासात अजरामर झाले ते महात्मा गांधींंच्या दोन भेटीमुळे. गांधीजी १४ नोव्हेंबर १९३३ आणि २७ फेब्रुवारी १९३६ या दिवशी सावली येथे आले होते. २७ फेब्रुवारी ते ५ मार्चपर्यंत महात्मा गांधी याठिकाणी मुक्कामी होते. सात दिवसांत सावली ही देशाची राजकीय राजधानी झाली. चरखा संघातील इमारतीमध्ये या महामानवाचे वास्तव्य होते. आजही या इमारतीत महात्माजींच्या वास्तव्याच्या आठवणी अनेक वस्तू करून देतात. चरखा संघ उत्तम रितीने आजही कार्यरत आहे. अनेक इमारती वैभवशाली इतिहास मूकपणे सांगतात. जुन्या चरख्यांकडे बघितल्यानंतर शेकडो परिवाराला रोजगार देण्याची ऊर्मी, एकतेची कळकळ, अस्पृश्यता निवारणाची चळवळ व स्वावलंबत्वाची मशाल या चरख्यामध्ये पेटत होती, हेही लक्षात येते.