शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

सावली शहर खादी चळवळीची माऊली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 23:17 IST

सावली हे गाव स्वातंत्र्यपूर्व काळातील ग्रामोद्योग चळवळीचे केंद्र होते. येथे १९३६ ला अखिल भारतीय गांधी सेवा संघाचे अधिवेशन घेण्यात आले होते. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात दोनदा या शहराला भेट दिली. सात दिवस मुक्काम केला. सावली हे शहर खादी चळवळीची माऊली म्हणून सर्वोदयी चळवळीत ओळखली जाते. बदलत्या काळातही ग्रामोद्योगाचे महत्त्व वाढत आहे. परंतु, नवीन पिढीवर या चळवळीच्या संस्काराची गरज आहे.

ठळक मुद्देऐतिहासिक आठवणींचे स्मरण : नवीन पिढीवर ग्रामोद्योग संस्काराची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सावली हे गाव स्वातंत्र्यपूर्व काळातील ग्रामोद्योग चळवळीचे केंद्र होते. येथे १९३६ ला अखिल भारतीय गांधी सेवा संघाचे अधिवेशन घेण्यात आले होते. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात दोनदा या शहराला भेट दिली. सात दिवस मुक्काम केला. सावली हे शहर खादी चळवळीची माऊली म्हणून सर्वोदयी चळवळीत ओळखली जाते. बदलत्या काळातही ग्रामोद्योगाचे महत्त्व वाढत आहे. परंतु, नवीन पिढीवर या चळवळीच्या संस्काराची गरज आहे.सावली येथील नाग विदर्भ चरखा संघाच्या आवारात या भारावलेल्या वातावरणाची अनुभूती येईल. येथील ८२ वर्षांच्या राजाबाळ संगीडवार यांनी येथील तेजस्वी इतिहासाच्या आठवणींना उजाळा दिला. इतिहासाची माहिती देताना संगीडवार म्हणाले, कार्यालयाच्या समोर तेव्हा उभ्या असलेल्या आम्रवृक्षाखाली महात्माजींचे नातू कृष्णदास गांधी व मनोज्ञा यांचा विवाह झाला. गांधीजींसोबत सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, आचार्य विनोबा भावे, डॉ. करिअप्पा, जमनालाल बजाज, सरोजिनी नायडू, सुशीला नायर आदी नेते या काळात सावली येथे मुक्कामी होते. चरखा संघाच्या प्राचीन वास्तूमध्ये गांधीजी आणि त्यांच्या कार्याचा शोध घेताना या महात्म्याने आयुष्यभर ‘खेड्याकडे चला’ हा नारा का दिला हे लक्षात आले. दोनशे चरख्यांवर काम करणारे शेकडो हात आजही सावली येथे सूत कताई करतात. चरखा संघात महिला- पुरूष सूत काततात. सुतापासून उत्तम प्रतीची खादी तयार होते. अखिल भारतीय खादी ग्रामोद्योग कमिशनचा हा चरखा संघ ऐतिहासिक वास्तू आहे. १०० वर्षांपासून सूतकताई व खादी तयार करण्याचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.ऊर्जा देणारी चळवळखादी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी सावलीला भेट दिली. मात्र हे गाव इतिहासात अजरामर झाले ते महात्मा गांधींंच्या दोन भेटीमुळे. गांधीजी १४ नोव्हेंबर १९३३ आणि २७ फेब्रुवारी १९३६ या दिवशी सावली येथे आले होते. २७ फेब्रुवारी ते ५ मार्चपर्यंत महात्मा गांधी याठिकाणी मुक्कामी होते. सात दिवसांत सावली ही देशाची राजकीय राजधानी झाली. चरखा संघातील इमारतीमध्ये या महामानवाचे वास्तव्य होते. आजही या इमारतीत महात्माजींच्या वास्तव्याच्या आठवणी अनेक वस्तू करून देतात. चरखा संघ उत्तम रितीने आजही कार्यरत आहे. अनेक इमारती वैभवशाली इतिहास मूकपणे सांगतात. जुन्या चरख्यांकडे बघितल्यानंतर शेकडो परिवाराला रोजगार देण्याची ऊर्मी, एकतेची कळकळ, अस्पृश्यता निवारणाची चळवळ व स्वावलंबत्वाची मशाल या चरख्यामध्ये पेटत होती, हेही लक्षात येते.