शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

सावली व कावळगोंदी येथे आगीत तीन घरे जळाली

By admin | Updated: May 24, 2017 02:11 IST

आग लागल्याने मंगळवारी सावली येथे दोन घरे आणि राजुरा तालुक्यातील कावळगोंदी येथे एक घर जळून भस्मसात झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क सावली/राजुरा : आग लागल्याने मंगळवारी सावली येथे दोन घरे आणि राजुरा तालुक्यातील कावळगोंदी येथे एक घर जळून भस्मसात झाले. त्यामध्ये घरमालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कावळगोंदीत आगामुळे जनावरांचे दोन गोठेही जळाले. सावली येथील वार्ड क्र. १३ च्या सावित्रीबाई फुले चौकात मंगळवारी सकाळी ११ वाजता शॉर्ट सर्कीट होऊन अचानक आग लागली. त्यामध्ये आबाजी कावळे यांचे घर, गोठ्यातील साहित्य व एक वासरू भाजले. ही आग पसरल्याने पत्रू रघुनाथ लेनगुरे यांचे घर, अंगणातील धानाचे १७ पोते जळाले. गुलाबशाह बाबा कॉन्व्हेंटच्या बाजूला असलेल्या तणासाच्या ढिगाऱ्याजवळ विद्युत तारा एकमेकांना घासल्या जाऊन ठिणगी निघाली. जवळच असलेल्या तणसाच्या ढिगाऱ्याला आग लागली. आबाजी वारलू कावळे यांच्या जनावरांच्या गोठ्याला आग लागली. आग विझविण्यासाठी पाण्याच्या बादल्या घेऊन बालके व वयोवृद्ध नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न केले. त्यानंतर आग पसरत पत्रू रघुनाथ लेनगुरे यांच्या घराला लागली. त्यात त्यांची धानाची २५ पोती जळाली. तसेच त्यांच्या घराची पूर्णत: नुकसान झाले. त्यांच्या घरामागे असलेला गोठाही जळून खाक झाला. त्या आगीचा भडका अतुल लेनगुरे, विवेक लेनगुरे यांचा घरापर्यंत पोहोचला. मूल येथून अग्निशमन दलाचे वाहन बोलविण्यात आले. राजुरा तालुक्यातील कावळगोंदी येथील रवींद्र राठोड यांच्या घराला मंगळवारी पहाटे अचानक आग लागली. यावेळी त्यांच्या घरातील फ्रीज, टी. व्ही., कुलर, कपडे, धान्य आदी सर्व साहित्य जळाले. आगीमुळे राठोड यांना दुसऱ्याकडे आश्रय घ्यावा लागला. गुरांचा चारादेखील जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच कावळगोंदीचे उपसरपंच बाबाराव जाधव, राजुरा येथील कैलास कार्लेकर यांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती दिली. परंतु तोपर्यंत घर पूर्णपणे जळाले. या आगीत गरीब शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. तलाठ्याने गावात येऊन घटनेचा पंचनामा केला.