शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

सांडपाण्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:23 IST

विहिरींचे अनुदान देण्याची मागणी ब्रह्मपुरी : धडक सिंचन विहिर योजनेतून खोदकाम झाले. परंतु, निधी न मिळाल्याने कामे थंडाबस्त्यात आहेत. ...

विहिरींचे अनुदान देण्याची मागणी

ब्रह्मपुरी : धडक सिंचन विहिर योजनेतून खोदकाम झाले. परंतु, निधी न मिळाल्याने कामे थंडाबस्त्यात आहेत. मंजूर झालेल्या विहिरींचे खोदकाम करूनही अनुदान मिळाले नाही. अनेकांच्या विहिरींचे बांधकाम रखडले आहे. निधी मिळाली असती तर रब्बी हंगामापूर्वीच कामे पूर्ण झाली असती.

कोरपनातील बसफेऱ्या वाढवाव्यात

कोरपना : कोरपना व वणी येथून सायंकाळी ६ वाजतानंतर बसफेरी नाही. आता कोरोनाचे रूग्ण कमी झाली आहेत. वणी या परिसरातील मोठी बाजारपेठ असल्याने दररोज शेकडो नागरिक ये-जा करतात. गावातील नागरिकांना हीच शेवटची बस आहे. बस नसल्यामुळे अनेकवेळा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्याची मागणी

घुग्घुस : परिसरातील अनेक गावांमधील काही वार्डांमध्ये विद्युत पुरवठा झाला नाही. या वार्डांमध्ये प्रामुख्याने वंचित घटकांतील नागरिक राहतात. त्यामुळे वीज जोडणीपासून वंचित असलेल्या अनुसूचित जातीमधील कुटुंबीयांनी विशेष घटक योजनेत्ांर्गत वीज पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अल्ट्राटेक चौकात गतिरोधक उभारा

गडचांदूर : गडचांदूर शहरातून गेलेल्या राजुरा-गोविंदपूर-आदिलाबाद राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. गडचांदूर रेल्वे क्रासिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण झाले. या मार्गावरुन दिवसरात्र वाहतूक सुरू असते. गतिरोधक नसल्याने येथे अपघात घडत आहेत. या महामार्गावरील राजीव गांधी चौक, संविधान चौक व बाबुराव शेडमाके चौक गतिरोधक नाही.

स्वच्छतागृहांचा लक्ष्यांक वाढवावा

पोंभुर्णा : गाव, शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. मात्र अजुनही यश आले नाही. तालुक्यातील ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाणारे अनेकजण आढळतात. त्यामुळे स्वच्छतागृहांचा लक्ष्यांक वाढविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

बसस्थानकाची स्वच्छता करण्याची मागणी

गोंडपिपरी : येथील बसस्थानक समोरील परिसरात कचरापेटी नसल्यामुळे उघड्यावरच कचरा टाकला जात आहे. या मार्गावर नागरिकांची वर्दळ असते, त्यामुळे याठिकाणी कचराकुंडी ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा

वरोरा : येथील चौपदरी महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रहदारीची समस्या निर्माण होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेत एका गाईचा मृत्यू झाला होता. तसेच जनावरांमुळे अनेक दुचाकी वाहनांचे अपघात झाले आहे. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

अवैध वाहतुकीला आळा घाला

भद्रावती : तालुक्यातील ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत आला. मात्र, पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडत असून काहींना जीव गमवावा लागला. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

वर्दळीच्या मार्गावर वाहनांचे पार्किंग

ब्रह्मपुरी : शहरातील अंतर्गत रस्त्यावर वाहने पार्किंगसाठी ठेवली जात आहे. काही दिवसांपूर्वी नगर परिषदेने दंडात्मक कारवाई केली होती़ पण, ही कारवाई लगेच थंडावली़ या मार्गावर रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांना मार्गक्रमण करताना त्रास होत आहे.