शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सात जणी लढल्या, एकच जिंकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:47 IST

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात १९५१ ते २०१४ पर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ सात महिल्या लढल्या असल्या तरी यामध्ये एका महिलेने ही निवडणूक जिंकून या मतदार संघाच्या पहिल्या खासदार होण्याचा मान मिळविला. गोपिकाताई कन्नमवार असे या पहिल्या महिला खासदाराचे नाव आहेत. गोपिकाताई या महाराष्ट्राचे दुसरे आणि चंद्रपूर जिल्ह्यातून झालेले पहिले मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांच्या सहचारिणी होत.

ठळक मुद्देचंद्रपूर लोकसभा मतदार संघ : महिला नेतृत्त्वाकडे कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघात १९५१ ते २०१४ पर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ सात महिल्या लढल्या असल्या तरी यामध्ये एका महिलेने ही निवडणूक जिंकून या मतदार संघाच्या पहिल्या खासदार होण्याचा मान मिळविला. गोपिकाताई कन्नमवार असे या पहिल्या महिला खासदाराचे नाव आहेत. गोपिकाताई या महाराष्ट्राचे दुसरे आणि चंद्रपूर जिल्ह्यातून झालेले पहिले मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांच्या सहचारिणी होत.चंद्रपूर लोकसभा मतदार संघात १९६४ आणि १९६७ या निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्यांदा गोपिकाताई कन्नमवार यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. १९६४ मध्ये झालेली पोटनिवडणूक त्या जिंकल्या आणि या मतदार संघाच्या पहिल्या महिला उमेदवार होण्याचा मान त्यांना मिळाला. यानंतर १९६७ मध्ये काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली मात्र यात त्यांचा पराभव झाला. यानंतर २०१४ च्या निवडणुकीपर्यंत एकाही प्रमुख राजकीय पक्षाने महिलांना लोकसभेची उमेदवारी दिली नाही. हे विशेष.१९६२ च्या लोकसभा निवडणुकीत लाल श्यामशाहा लाल भगवानशाहा हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यावेळी निर्वासितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न व आदिवासींचे मूळ प्रश्न डावलून बांग्लादेशाच्या निर्वासितांना आश्रय देण्याला प्राधान्य दिले जात होते. ही बाब त्यांनी खटकली. त्यांनी याकडे तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे लक्ष वेधले. यानंतर त्यांनी ५ सप्टेंबर १९६२ रोजी खासदारकीची शपथ घेतली. मात्र त्यांना सरकारच्या धोरणाविरुद्ध दुसऱ्यादिवशी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. तो २४ एप्रिल १९६४ ला राजीनामा मंजूर झाला. यानंतर १९६४ मध्ये पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत गोपिकाताई कन्नमवार या विजयी झाल्या. त्या या मतदारसंघाच्या पहिल्या महिला खासदार ठरल्या. यानंतर १९६७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला.यानंतर आजवरी अन्य सहा महिलांनी लोकसभा निवडणूक लढली. यामध्ये १९८० मध्ये जेएनपी(एस) कडून प्रतिमा नुरुद्दीन, १९८४ मध्ये जयश्री इंगळे (अपक्ष), १९८९ मध्ये उर्मिला बलवंत पाठक (डीडीपी), १९९१ मध्ये ज्येष्ठगौरी भावसार (अपक्ष), १९९६ मध्ये सत्यशिला रायपुरे (अपक्ष) व २००४ मध्ये तायरा छोटु शेख (अपक्ष) या महिला निवडणूक लढल्या मात्र यात त्यांना यश आले नाही.महिला उमेदवार१९६४ - गोपिकाताई कन्नमवार (भाराकाँ) - विजयी१९८० - प्रतिमा नुरुद्दीन (जेएनपी(एस) - पराभूत१९८४ - जयश्री इंगळे (अपक्ष) - पराभूत१९८९ - उर्मिला बलवंत पाठक(डीडीपी) - पराभूत१९९१ - ज्येष्ठगौरी भावसार (अपक्ष) - पराभूत१९९६ - सत्यशिला रायपुरे (अपक्ष) - पराभूत२००४ - तायरा छोटु शेख (अपक्ष) - पराभूत