शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

सात जणी लढल्या, एकच जिंकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:47 IST

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात १९५१ ते २०१४ पर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ सात महिल्या लढल्या असल्या तरी यामध्ये एका महिलेने ही निवडणूक जिंकून या मतदार संघाच्या पहिल्या खासदार होण्याचा मान मिळविला. गोपिकाताई कन्नमवार असे या पहिल्या महिला खासदाराचे नाव आहेत. गोपिकाताई या महाराष्ट्राचे दुसरे आणि चंद्रपूर जिल्ह्यातून झालेले पहिले मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांच्या सहचारिणी होत.

ठळक मुद्देचंद्रपूर लोकसभा मतदार संघ : महिला नेतृत्त्वाकडे कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघात १९५१ ते २०१४ पर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ सात महिल्या लढल्या असल्या तरी यामध्ये एका महिलेने ही निवडणूक जिंकून या मतदार संघाच्या पहिल्या खासदार होण्याचा मान मिळविला. गोपिकाताई कन्नमवार असे या पहिल्या महिला खासदाराचे नाव आहेत. गोपिकाताई या महाराष्ट्राचे दुसरे आणि चंद्रपूर जिल्ह्यातून झालेले पहिले मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांच्या सहचारिणी होत.चंद्रपूर लोकसभा मतदार संघात १९६४ आणि १९६७ या निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्यांदा गोपिकाताई कन्नमवार यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. १९६४ मध्ये झालेली पोटनिवडणूक त्या जिंकल्या आणि या मतदार संघाच्या पहिल्या महिला उमेदवार होण्याचा मान त्यांना मिळाला. यानंतर १९६७ मध्ये काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली मात्र यात त्यांचा पराभव झाला. यानंतर २०१४ च्या निवडणुकीपर्यंत एकाही प्रमुख राजकीय पक्षाने महिलांना लोकसभेची उमेदवारी दिली नाही. हे विशेष.१९६२ च्या लोकसभा निवडणुकीत लाल श्यामशाहा लाल भगवानशाहा हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यावेळी निर्वासितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न व आदिवासींचे मूळ प्रश्न डावलून बांग्लादेशाच्या निर्वासितांना आश्रय देण्याला प्राधान्य दिले जात होते. ही बाब त्यांनी खटकली. त्यांनी याकडे तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे लक्ष वेधले. यानंतर त्यांनी ५ सप्टेंबर १९६२ रोजी खासदारकीची शपथ घेतली. मात्र त्यांना सरकारच्या धोरणाविरुद्ध दुसऱ्यादिवशी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. तो २४ एप्रिल १९६४ ला राजीनामा मंजूर झाला. यानंतर १९६४ मध्ये पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत गोपिकाताई कन्नमवार या विजयी झाल्या. त्या या मतदारसंघाच्या पहिल्या महिला खासदार ठरल्या. यानंतर १९६७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला.यानंतर आजवरी अन्य सहा महिलांनी लोकसभा निवडणूक लढली. यामध्ये १९८० मध्ये जेएनपी(एस) कडून प्रतिमा नुरुद्दीन, १९८४ मध्ये जयश्री इंगळे (अपक्ष), १९८९ मध्ये उर्मिला बलवंत पाठक (डीडीपी), १९९१ मध्ये ज्येष्ठगौरी भावसार (अपक्ष), १९९६ मध्ये सत्यशिला रायपुरे (अपक्ष) व २००४ मध्ये तायरा छोटु शेख (अपक्ष) या महिला निवडणूक लढल्या मात्र यात त्यांना यश आले नाही.महिला उमेदवार१९६४ - गोपिकाताई कन्नमवार (भाराकाँ) - विजयी१९८० - प्रतिमा नुरुद्दीन (जेएनपी(एस) - पराभूत१९८४ - जयश्री इंगळे (अपक्ष) - पराभूत१९८९ - उर्मिला बलवंत पाठक(डीडीपी) - पराभूत१९९१ - ज्येष्ठगौरी भावसार (अपक्ष) - पराभूत१९९६ - सत्यशिला रायपुरे (अपक्ष) - पराभूत२००४ - तायरा छोटु शेख (अपक्ष) - पराभूत