शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

पीक विमा योजनेतून सात तालुके वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:29 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीरीजा हवालदिल असून नापिकीने त्रस्त आहे. बळीराजाला सावरण्यासाठी व दिलासा देण्यासाठी ...

कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी बल्लारपूर तालुक्यात मोठा फटका योजनेत समावेश कराअनेकश्वर मेश्राम । लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीरीजा हवालदिल असून नापिकीने त्रस्त आहे. बळीराजाला सावरण्यासाठी व दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेत सात तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात एकूण १५ तालुके आहेत. जिल्ह्यात सर्वच भागात खरिपाच्या हंगामात कापसाची लागवड केली जाते. काही तालुक्यात कापूस उत्पादक शेतकरी कमी आहेत. अशा भागातील शेतकऱ्यांचे पीक विमा संरक्षण काढून घेणे, अन्यायकारक ठरले आहे. या योजनेतून कापूस पिकासाठी बल्लारपूर, मूल, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही व सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना वगळण्यात आल्याचे कारस्थान कृषी विभागाने केले आहे. यामुळे या तालुक्यातील कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यात संताप व्यक्त होत आहे.या पीक विमा योजनेत भात, ज्वारी, सोयाबीन, तूर, कापूस, मूंग व उडीद पिकाचा समावेश आहे. या पिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतातील उत्पादक पिकाचे विम्याचे संरक्षण देण्याचा पवित्रा घेतला आहे. कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असूनही सात तालुके कोणत्या कारणावरुन विमा योजनेपासून वंचित करण्यात आले, हे कोडेच आहे. अधिसूचित पिकाच्या यादीतून कापसाला कपात केल्यामुळे शेतकऱ्यांवर आघात झाला आहे. या संदर्भात बल्लारपूर तालुक्यातील कापूस उत्पादकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून योजनेत समावेश करण्याची मागणी केली होती.आठ तालुक्यातील २७ मंडळात कापसाचे संरक्षणपीक विमा योजनेत आठ तालुक्यातील २७ महसूल मंडळात कापूस पिकासाठी विमा संरक्षण देण्यात आले आहे. चंद्रपूर तालुक्यातील पडोली व घुग्घुस, गोंडपिपरी तालुक्यातील धाबा व गोंडपिपरी, वरोरा तालुक्यातील माढेळी, चिखली, टेमुर्डा, खांबाडा व शेगाव, भद्रावती तालुक्यातील घोडपेठ, चंदनखेडा, मुधोली व नंदोरी. चिमूर तालुक्यातील मासळ (बुज), खडसंगी, नेरी, भिसी, जांभूळघाट व शंकरपूर. राजुरा तालुक्यातील विरूर (स्टेशन) व राजुरा. कोरपना तालुक्यातील गडचांदूर व कोरपना तर जिवती तालुक्यात पाटण व जिवती या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना कापसाचा विमा काढण्याची मुभा देण्यात आली आहे.तालुक्यात तीन हजार हेक्टर क्षेत्राला विमा नाहीबल्लारपूर तालुक्यात एकूण खरीप पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र नऊ हजार ३७९ हेक्टरचे असून सहा हजार ७६५ हेक्टर क्षेत्रात पेरणी केली जाते. यातील तीन हजार ११५.८० हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड केली जाते. अर्धे अधिक पेरणीचे क्षेत्र कापसाचे असताना पीक विमा योजनेचे संरक्षण जाणीवपूर्वक वगळण्यात आले. परिणामी तालुक्यातील शेतकरी घायाळ झाला आहे. कापसाला विमा योजनेतून वगळून भात, ज्वारी, सोयाबीन व तूर पिकाला विम्याचे संरक्षण देण्यात आले. भात वगळता अन्य पिकाचे क्षेत्र कमी असून विम्यात स्थान देण्यात आल्याने शेतकऱ्यात नाराजी आहे.