शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेतून सात तालुके वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:29 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीरीजा हवालदिल असून नापिकीने त्रस्त आहे. बळीराजाला सावरण्यासाठी व दिलासा देण्यासाठी ...

कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी बल्लारपूर तालुक्यात मोठा फटका योजनेत समावेश कराअनेकश्वर मेश्राम । लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीरीजा हवालदिल असून नापिकीने त्रस्त आहे. बळीराजाला सावरण्यासाठी व दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेत सात तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात एकूण १५ तालुके आहेत. जिल्ह्यात सर्वच भागात खरिपाच्या हंगामात कापसाची लागवड केली जाते. काही तालुक्यात कापूस उत्पादक शेतकरी कमी आहेत. अशा भागातील शेतकऱ्यांचे पीक विमा संरक्षण काढून घेणे, अन्यायकारक ठरले आहे. या योजनेतून कापूस पिकासाठी बल्लारपूर, मूल, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही व सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना वगळण्यात आल्याचे कारस्थान कृषी विभागाने केले आहे. यामुळे या तालुक्यातील कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यात संताप व्यक्त होत आहे.या पीक विमा योजनेत भात, ज्वारी, सोयाबीन, तूर, कापूस, मूंग व उडीद पिकाचा समावेश आहे. या पिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतातील उत्पादक पिकाचे विम्याचे संरक्षण देण्याचा पवित्रा घेतला आहे. कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असूनही सात तालुके कोणत्या कारणावरुन विमा योजनेपासून वंचित करण्यात आले, हे कोडेच आहे. अधिसूचित पिकाच्या यादीतून कापसाला कपात केल्यामुळे शेतकऱ्यांवर आघात झाला आहे. या संदर्भात बल्लारपूर तालुक्यातील कापूस उत्पादकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून योजनेत समावेश करण्याची मागणी केली होती.आठ तालुक्यातील २७ मंडळात कापसाचे संरक्षणपीक विमा योजनेत आठ तालुक्यातील २७ महसूल मंडळात कापूस पिकासाठी विमा संरक्षण देण्यात आले आहे. चंद्रपूर तालुक्यातील पडोली व घुग्घुस, गोंडपिपरी तालुक्यातील धाबा व गोंडपिपरी, वरोरा तालुक्यातील माढेळी, चिखली, टेमुर्डा, खांबाडा व शेगाव, भद्रावती तालुक्यातील घोडपेठ, चंदनखेडा, मुधोली व नंदोरी. चिमूर तालुक्यातील मासळ (बुज), खडसंगी, नेरी, भिसी, जांभूळघाट व शंकरपूर. राजुरा तालुक्यातील विरूर (स्टेशन) व राजुरा. कोरपना तालुक्यातील गडचांदूर व कोरपना तर जिवती तालुक्यात पाटण व जिवती या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना कापसाचा विमा काढण्याची मुभा देण्यात आली आहे.तालुक्यात तीन हजार हेक्टर क्षेत्राला विमा नाहीबल्लारपूर तालुक्यात एकूण खरीप पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र नऊ हजार ३७९ हेक्टरचे असून सहा हजार ७६५ हेक्टर क्षेत्रात पेरणी केली जाते. यातील तीन हजार ११५.८० हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड केली जाते. अर्धे अधिक पेरणीचे क्षेत्र कापसाचे असताना पीक विमा योजनेचे संरक्षण जाणीवपूर्वक वगळण्यात आले. परिणामी तालुक्यातील शेतकरी घायाळ झाला आहे. कापसाला विमा योजनेतून वगळून भात, ज्वारी, सोयाबीन व तूर पिकाला विम्याचे संरक्षण देण्यात आले. भात वगळता अन्य पिकाचे क्षेत्र कमी असून विम्यात स्थान देण्यात आल्याने शेतकऱ्यात नाराजी आहे.