शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
4
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
5
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
6
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
7
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
8
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
9
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
10
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
11
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
12
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
13
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
14
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
15
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
16
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
18
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
19
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
20
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले

पीक विमा योजनेतून सात तालुके वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:29 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीरीजा हवालदिल असून नापिकीने त्रस्त आहे. बळीराजाला सावरण्यासाठी व दिलासा देण्यासाठी ...

कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी बल्लारपूर तालुक्यात मोठा फटका योजनेत समावेश कराअनेकश्वर मेश्राम । लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीरीजा हवालदिल असून नापिकीने त्रस्त आहे. बळीराजाला सावरण्यासाठी व दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेत सात तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात एकूण १५ तालुके आहेत. जिल्ह्यात सर्वच भागात खरिपाच्या हंगामात कापसाची लागवड केली जाते. काही तालुक्यात कापूस उत्पादक शेतकरी कमी आहेत. अशा भागातील शेतकऱ्यांचे पीक विमा संरक्षण काढून घेणे, अन्यायकारक ठरले आहे. या योजनेतून कापूस पिकासाठी बल्लारपूर, मूल, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही व सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना वगळण्यात आल्याचे कारस्थान कृषी विभागाने केले आहे. यामुळे या तालुक्यातील कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यात संताप व्यक्त होत आहे.या पीक विमा योजनेत भात, ज्वारी, सोयाबीन, तूर, कापूस, मूंग व उडीद पिकाचा समावेश आहे. या पिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतातील उत्पादक पिकाचे विम्याचे संरक्षण देण्याचा पवित्रा घेतला आहे. कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असूनही सात तालुके कोणत्या कारणावरुन विमा योजनेपासून वंचित करण्यात आले, हे कोडेच आहे. अधिसूचित पिकाच्या यादीतून कापसाला कपात केल्यामुळे शेतकऱ्यांवर आघात झाला आहे. या संदर्भात बल्लारपूर तालुक्यातील कापूस उत्पादकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून योजनेत समावेश करण्याची मागणी केली होती.आठ तालुक्यातील २७ मंडळात कापसाचे संरक्षणपीक विमा योजनेत आठ तालुक्यातील २७ महसूल मंडळात कापूस पिकासाठी विमा संरक्षण देण्यात आले आहे. चंद्रपूर तालुक्यातील पडोली व घुग्घुस, गोंडपिपरी तालुक्यातील धाबा व गोंडपिपरी, वरोरा तालुक्यातील माढेळी, चिखली, टेमुर्डा, खांबाडा व शेगाव, भद्रावती तालुक्यातील घोडपेठ, चंदनखेडा, मुधोली व नंदोरी. चिमूर तालुक्यातील मासळ (बुज), खडसंगी, नेरी, भिसी, जांभूळघाट व शंकरपूर. राजुरा तालुक्यातील विरूर (स्टेशन) व राजुरा. कोरपना तालुक्यातील गडचांदूर व कोरपना तर जिवती तालुक्यात पाटण व जिवती या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना कापसाचा विमा काढण्याची मुभा देण्यात आली आहे.तालुक्यात तीन हजार हेक्टर क्षेत्राला विमा नाहीबल्लारपूर तालुक्यात एकूण खरीप पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र नऊ हजार ३७९ हेक्टरचे असून सहा हजार ७६५ हेक्टर क्षेत्रात पेरणी केली जाते. यातील तीन हजार ११५.८० हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड केली जाते. अर्धे अधिक पेरणीचे क्षेत्र कापसाचे असताना पीक विमा योजनेचे संरक्षण जाणीवपूर्वक वगळण्यात आले. परिणामी तालुक्यातील शेतकरी घायाळ झाला आहे. कापसाला विमा योजनेतून वगळून भात, ज्वारी, सोयाबीन व तूर पिकाला विम्याचे संरक्षण देण्यात आले. भात वगळता अन्य पिकाचे क्षेत्र कमी असून विम्यात स्थान देण्यात आल्याने शेतकऱ्यात नाराजी आहे.