शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

वांगी समजून खाल्ली धोतऱ्याच्या फळांची भाजी; कुटुंबातील सात जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2022 10:34 IST

चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार : सर्वांची प्रकृती स्थिर

आक्सापूर (चंद्रपूर) : वांगी समजून विषारी धोतऱ्याच्या फळांची भाजी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा झाली. ही घटना गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी येथे घडली. भोजनानंतर अचानक प्रकृती बिघडल्याने सर्वांना प्रारंभी गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर चंद्रपूरला हलविले आहे.

कुटुंबप्रमुख किसन सोमा खंडारे (६०), त्यांची पत्नी सीताबाई किसन खंडारे (६०), मुलगा तुळशीदास किसन खंडारे (४०), सून रेखा तुळशीराम खंडारे (४०), कमला गणेश नेवारे (४०), अर्चना श्रीकृष्ण नेवारे (४०) व विभा विलास सरवर (१६), शैलेश कोडापे या सात जणांना विषबाधा झाली.

गणेशपिपरी ग्रामपंचायत कार्यालयालगतच्या परिसरात धोतऱ्याचे झाड आहे. त्याला आलेले फळ वांग्यासारखे दिसत असल्याने ते वांगी समजून खंडारे कुटुंबातील महिलांनी ते तोडून आणले व त्याची भाजी शिजवली. रात्रीच्या जेवणानंतर काही वेळातच सर्वांना पोटात मळमळ आणि उलटी सुरू झाली. वांग्यासारखी दिसणारी धोतऱ्याची फळे असल्याची बाब चर्चेतून पुढे आली.

शरीरात अधिक प्रमाणात विष गेल्याने प्रकृती चिंताजनक दिसत असल्याचे पाहून गोंडपिपरीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्याचा सल्ला दिला. सातही जणांवर येथील चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय अधिकारी लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाchandrapur-acचंद्रपूर