शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

'सेवा केंद्र' गरजूंना आधार देण्याचे काम करेल; सुधीर मुनगंटीवार यांनी केले उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2023 21:17 IST

राजुरा येथे स्थापन करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयातून सर्वसामान्य व गोरगरिबांना योग्य तो न्याय मिळेल, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. 

चंद्रपूर: सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. पण या योजनांची माहिती त्यांना नसते. बरेचदा माहिती असूनही त्याचा लाभ कसा घ्यावा, हे कळत नाही. अशावेळी गरजूंच्या पाठिशी उभे राहण्याचे काम सेवा केंद्र करणार आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. या निमित्‍ताने देवराव भोंगळे यांच्‍या नेतृत्‍वात भाजपाच्‍या कामाचा झंझावात सुरू झाला आहे, असे प्रतिपादनही मुनगंटीवार यांनी यावेळी केले.

भाजपाने माणूसकीच्या धर्माचे पालन केले आहे आणि याच भावनेतून जनतेची सेवा केली आहे. त्यामुळे जात, पात, धर्माचे बंधन न ठेवता हे सेवा केंद्र जनतेची सेवा करेल, असेही मुनगंटीवार म्हणाले. राजुरा येथील मुनगंटीवार सेवा केंद्र व जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना मुनगंटीवार यांनी देवराव भोंगळे यांच्या कार्याचा गौरव केला. "जो करता है सेवाभाव उसका नाम है देवराव" अशा शब्दात मुनगंटीवार यांनी देवराव भोंगळे यांच्या कार्याची स्तुती केली. राजुरा येथे स्थापन करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयातून सर्वसामान्य व गोरगरिबांना योग्य तो न्याय मिळेल, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. 

भाजपा राजुरा विधानसभा प्रभारी देवराव भोंगळे यांनी याआधीही घुग्‍गुसला असे सेवा केंद्र सुरू करून तेथील जनतेच्‍या समस्‍या सोडविण्‍याचे काम केले आहे. त्‍याच धर्तीवर राजुरा विधानसभेच्‍या जनतेच्‍या समस्‍या सोडविण्‍याचे काम या सेवा केंद्रातुन होईल असा विश्‍वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला. मुनगंटीवार यांनी सेवा केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना केले. गोरगरिबांची सेवा करण्याचा संकल्प करत सेवाभावी वृत्तीने या सेवा केंद्राचा शुभारंभ होत आहे, याचा आनंद आहे. या जिल्ह्यातील जनतेने भाजपावर मनापासून प्रेम केले. जनतेने जे काही दिले ते नम्रपणे स्वीकारायचे असते. आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू सेवा असायला हवा, खुर्ची नव्हे. पद गेले तरीही आपल्या कामांची आठवण जनतेला राहील, या उद्देशाने कार्यकर्ता काम करीत आहे. आणि आता हे सेवा केंद्रही त्याच उद्देश्यांनी काम करणार आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

एखादी व्यक्ती आजारी असते. कुटुंब उपचारासाठी खर्च करताना मानसिक तणावात असते. उपचारानंतरही अनेक वर्षे त्या खर्चाचा ताण जात नाही. मात्र सरकारने आरोग्य योजनांच्या माध्यमातून जनतेची सोय केली आहे. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेत तर ५ लाखांपर्यंतचा खर्च उपचारासाठी दिला जातो आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारची उत्पन्नाची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. मात्र या योजनेची माहिती नसेल तर सेवा केंद्र ती उपलब्ध करून देईल. सेवा केंद्र आपल्या पाठिशी उभे राहील, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी दिला. दीड कोटी शेतकऱ्यांनी डिजीटल सुविधेद्वारे एक रुपयांत पिक विमा काढला. मात्र अनेक शेतकरी ऑनलाईन सुविधा वापरू शकत नाहीत. अशांच्या पाठिशी सेवा केंद्र उभे राहिले पाहिजे. माहिती नसल्यामुळे कुणी सुटता कामा नये. सेवाकेंद्राला भेट देणाऱ्या सर्वांचे कामं व्यवस्थित झाले पाहिजे याची पूर्ण काळजी सेवा केंद्राला घ्यायची आहे, अशी सूचना मुनगंटीवार यांनी केली. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपा