शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
18
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
19
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
20
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!

काँग्रेसच्या धानोरकरांपुढे आव्हानांची श्रृंखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 22:31 IST

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चिन्ह वाटपानंतर लोकसभा उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता दिसून येते. काँग्रेसचे आयात केलेले उमेदवार बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर हे जातीय समीकरणावर डोळा ठेवून रिंगणात उतरले, अशी चर्चा सुरू असली तरी हे समीकरण विजयासाठी पुरेशे नाही, असाच आजवरचा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास सांगतो.

ठळक मुद्देचंद्रपूर लोकसभा मतदारसंघ : वणी, आर्णीत कसोटी, काँग्रेसविरोधी वक्तव्येच अडचणी वाढविणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चिन्ह वाटपानंतर लोकसभा उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता दिसून येते. काँग्रेसचे आयात केलेले उमेदवार बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर हे जातीय समीकरणावर डोळा ठेवून रिंगणात उतरले, अशी चर्चा सुरू असली तरी हे समीकरण विजयासाठी पुरेशे नाही, असाच आजवरचा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास सांगतो. एकेकाळी गड असलेल्या काँग्रेसला या मतदारसंघात पराभवाचे तोंड पहावे लागत आहे. अशातच आता आजपर्यंत कॉग्रेसवरच टिकेची झोड उठविणाऱ्या धानोरकर यांना काँग्रेसने ऐनवेळेवर उमेदवारी देऊन मागील पराभवापासून काहीही धडा घेतला नसल्याचेच दिसते. काँग्रेमधील गटबाजी, अपेक्षित, मात्र न चालणारे कास्ट फॅक्टर, दुखावलेला तेली समाज आणि आजवर केलेले काँग्रेसविरोधी वक्तव्य हे धानोकरांचे पाय ओढण्यास कारणीभूत ठरणार, असे दिसून येते.शिवसेनेपासून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या धानोरकरांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. मात्र कास्ट फॅक्टर या एकाच निकषावर उमेदवारी मिळविलेल्या धानोरकरांसमोर विजयासाठी मोठी आव्हाने आहेत. तर दुसरीकडे उमेदवारी देतानाच पक्ष पातळीवर मोठा कलगीतुरा रंगला. दिल्ली, मुंबईत चंद्रपूरच्या उमेदवारीवरून खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनीच उद्वेग व्यक्त केला. जिल्ह्यातील काँग्रेसचा दुसरा मोठा गट नाराज असून आपण आयतेच भाजपा उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ तर टाकत नाही ना, अशी भीती काँग्रेसच्या गोटात होत आहे.चंद्रपूर लोकसभा मतदार संघात १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून जातीय समिकरणे जय-पराजयासाठी कधीच प्रबळ ठरली नाहीत. विविध जाती समुहातील समाजघटकांनी आपापल्या न्याय मागण्यांसाठी राजकीय पक्ष व नेत्यांना काही निर्णय घेण्यास बाध्य केले, एवढे मात्र खरे. उलट अल्पसंख्याक समाजासोबतच बहुजन समाजातील सक्षम व विकासाभिमुख नेतृत्वाला दिल्लीत पाठविण्यासाठी मतदारांनी पाठिंबा दर्शविला. आदिवासी, ब्राह्मण, व मुस्लिम समाजातील नेत्यांनाही चंद्रपूर मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. तत्कालिन राजकीय परिस्थितीत जातीय आणि धार्मिक घडामोडींनी नवनव्या चर्चांना व वादांना तोंड फोडले होते. परंतु जात अथवा धर्म या एकाच निकषाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, तत्कालीन जनसंघ म्हणजे आजचा भाजप आणि अपक्षामधून उमेदवार निवडणुकीत विजयी झाल्याची उदाहरणे नाहीत.११ एप्रिलला होऊ घातलेल्या १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. चंद्रपूर मतदार संघात काँग्रेस सातत्याने पराभुत होत असल्याने यावेळी उमेदवारी कुणाला मिळणार, यावरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. दिवसागणिक वेगवेगळ्या व्यक्तींची नावे उमेदवार म्हणून पुढे येऊ लागल्याने मोठी उत्कंठा वाढली. दरम्यान, जातीय समीकरणांनाच आधार मानून काँग्रेसने माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केली. बांगडे यांचे नाव जाहीर होताच आपल्या समाजाला प्रतिनिधीत्व मिळाले म्हणून तेली समाज आनंदी झाला होता. दुसरीकडे या नावामुळे पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. काँग्रेसच्या दुसºया गटाने बांगडे यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध दर्शवित दिल्ली दरबारी जोरदार फिल्डींग लावली. यामुळे काँग्रेस हायकमांडही दबावात आल्याचे दिसून आले. कारण दोन दिवसातच काँग्रेसने उमेदवारीत अचानक बदल करून शिवसेनेचे माजी आमदार बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसमधील निष्ठावानांमध्ये दुफळी निर्माण झाली. शिवाय बांगडे यांना उमेदवारी बहाल करून ती ऐनवेळी रद्द केल्याने तेली समाज दुखावला. या समाजाने जाहीररित्या काँग्रेसविरुध्द निर्दशने करीत आपला पाठिंबा काढून घेतला.धानोरकर हे स्वत:ला शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते मानत राजकारणात सक्रिय होते. मात्र प्रबळ राजकीय महत्त्वाकांक्षा जागृत झाल्याने व सत्तेचा मोह आवरता न आल्याने त्यांनी शिवसेनेलाही दूर केले. आमदारकीचा राजीनामा देऊन आठवड्याभरातच काँग्रेसशी घरोबा केला. शिवसेनेतून बाहेर पडताना आपल्या मागे कार्यकर्त्यांचा फौजफाटा येईल, असे धानोरकरांना वाटत होते.मात्र शिवसेनेचे पदाधिकारी व धानोरकरांच्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण शिवसेनेत कायम असल्याचे स्पष्ट करून टाकले. या राजकीय घडामोडीने ऐन निवडणुकीच्या हंगामात काँग्रेसमध्ये आलेल्या धानोरकरांना कास्ट फॅक्टर, काँग्रेसची गटबाजी, दुखावलेला तेली समाज आणि काँग्रेसच्याच वरिष्ठ नेत्यांच्या छुप्या विरोधाचा मोठा सामना करावा लागणार आहे.शिवसेनेचे विचार स्वार्थासाठी भात्यातयवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी विधानसभा मतदार संघात धानोरकरांना चांगलीच ताकद लावावी लागणार आहे. शिवसेनेत असताना कॉंग्रेसच्या धोरणावर घणाघाती टीका करत विधानसभेची निवडणूक लढविणाºया बाळू धानोरकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला खरा, पण शिवसेनेच्या विचारांचा बाण भात्यात ठेवून कॉंग्रेसचे विचार आणि ध्येयधोरणे त्याच त्वेषाने लोकांपर्यंत ते पोहचविण्यात किती यशस्वी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेत असताना त्यांनी कायम कॉंग्रेसवर टीका केली. आता त्यांच्यावर कॉंग्रेसचे गुणगाण गाण्याची वेळ आली आहे. त्यांची ही बदललेली भूमिका मतदार स्वीकारतील का, असाही प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.काँग्रेसचे निष्ठावंत ‘आयात’ उमेदवाराचे काम करतील कसे?मागील लोकसभा निवडणुकीत वणी व आर्णी लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे हंसराज अहीर यांना विक्रमी मते मिळाली होती. याला मोदी लाटदेखील कारणीभूत होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी तुल्यबळ उमेदवारच नसल्याने कॉंग्रेसला बाळू धानोरकर यांच्या रुपाने ईतर पक्षातून उमेदवार आयात करावा लागला. विधानसभा निवडणुकीत ज्या धानोरकरांनी कॉंग्रेसच्या ध्येयधोरणावर कडाडून टीका केली, त्याच कॉंग्रेससाठी त्यांना आता मते मागावी लागत आहे. एकूणच या निवडणुकीत पक्षांतराचा फटका त्यांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.