शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

तीन कोटींची जमीन एका लाखात विक्री

By admin | Updated: July 6, 2014 23:49 IST

राजुरा शहरात आदिवासीच्या जमिनी हडपण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सर्वे क्रमांक १४९/२१ मध्ये ६६ आर जमीन आई आणि मुलाच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून जमीन हडपल्याची तक्रार राजुरा

पोलिसात तक्रार : आई व मुलाची बनावट स्वाक्षरीराजुरा : राजुरा शहरात आदिवासीच्या जमिनी हडपण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सर्वे क्रमांक १४९/२१ मध्ये ६६ आर जमीन आई आणि मुलाच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून जमीन हडपल्याची तक्रार राजुरा येथील चंद्रप्रकाश गंगाराम मेश्राम यांनी राजुरा पोलीस ठाण्यात केल्याने हा धक्कादायक व गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. १५ दिवस लोटूनही राजुराचे ठाणेदार यांनी कोणतीच कारवाई केली नाही, याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राजुरा येथील रजिस्ट्रर आॅफीसमध्ये सदर जमिनीचे विक्रीपत्र झाले असून खरेदी करणाऱ्याचे नाव संभा कोवे आहे. तर माधव मेश्राम चंद्रप्रकाश मेश्राम, पंचफुला मेश्राम, शंकुतला मेश्राम असे चार व्यक्तीनी जमीन विक्री केल्याचे रजिस्ट्रीमध्ये नमूद आहे. परंतु शंकुतलाबाई मेश्राम आणि चंद्रप्रकाश मेश्राम यांनी स्वाक्षरीच केली नसल्याचे म्हटले आहे. चंद्रप्रकाश मेश्राम हा इंग्रजीमध्ये स्वाक्षरी करतो. मात्र त्याची स्वाक्षरी या विक्रीपत्रात मराठीत केली आहे. शकुंतलाबाई मेश्राम यांच्या अंगठ्याच्या ठसामध्येही तफावत आढळून येत आहे. त्यामुळे स्वाक्षरी व अंगठ्याचा ठसा बनावट असून दस्तावेजच खोटे तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, विक्री करणाऱ्या व्यक्तींना ओळखतो म्हणून राजुराच्या एका माजी नगरसेवकाने विक्रीपत्रात स्वाक्षरी केली आहे. हा नगरसेवक जमिनीची विक्री करताना रजिस्ट्रीच्या वेळी उपस्थित नसतानासुद्धा उपस्थितांना ओळखतो म्हणून रजिस्ट्रारची दिशाभूल केली आहे. वरील जमीन भोगवटदार दोन असताना एकमध्ये रुपांतरित करुन विक्रीकरिता तत्कालीन उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या १४ मार्च २००१ ची परवानगी मागितली असता हा आदेश कार्यालयातून गहाळ झाल्याचे म्हटले जात आहे. जो आदिवासी खरेदीदार आह,े त्या संभा कोवे यांना त्याच्या नावाने जमीन खरेदी केल्याचे माहित नसल्याचा आरोप चंद्रप्रकाश मेश्राम यांनी तक्रारी द्वारे केला आहे. स्वाक्षऱ्या व अंगठे खोटे असल्याचेसुद्धा म्हटले आहे. राजुरा तालुक्यात आदिवासी जमिनीचा मोठा घोटाळा झाला असून अनेक आदिवासी भूमिहीन झाले आहे. राजुरा येथील चंद्रप्रकाश गंगाराम मेश्राम यांनी सदर व्यवहारात माझी फसवणूक झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. उल्लेखनीय असे की सध्या या जमिनीची किमत तीन कोटी रुपये आहे. मात्र अवघ्या एका लाखात खोटी रजिस्ट्री करुन या जमिनीचे विक्रीपत्र तयार करण्यात आले आहे. त्यामुळे एका आदिवासीला भूमिहीन तर केलेच आदिवासींची फसवणूक केली आहे. या सर्व प्रकरणाची सविस्तर चौकशी करुन दोषी व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी आदिवासी शेतकरी चंद्रप्रकाश मेश्राम यांनी पोलीस तक्रारीतून केली आहे. (शहर प्रतिनिधी)