शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

शेतातील कापूस बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा संपायला तयार नाही. कधी निसर्गाची उदासीनता तर कधी शासनाचे शेतकरी विरोधी धोरण कास्तकारांना मारक ठरले आहे. उत्पादन खर्च जास्त व उत्पादन कमी अशी शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. शेतकरी दिवसेंदिवस महागाईच्या तडाख्यात भरडला जात आहे. नापिकिने शेतकºयांवर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे.

ठळक मुद्देकापूस वेचणीला मजूर मिळेना : वातावरणातील बदलाने शेतकरी चिंतातूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कापूस अंतिम टप्प्यात आला आहे. मार्च महिन्याचा पंधरवडा उलटून गेला आहे. मात्र कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने कापूस शेतातच आहे. दररोज वातावरणात बदल होत असून वेळी-अवेळी पाणी येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून शेतातील कापसू बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे.कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा संपायला तयार नाही. कधी निसर्गाची उदासीनता तर कधी शासनाचे शेतकरी विरोधी धोरण कास्तकारांना मारक ठरले आहे. उत्पादन खर्च जास्त व उत्पादन कमी अशी शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. शेतकरी दिवसेंदिवस महागाईच्या तडाख्यात भरडला जात आहे. नापिकिने शेतकºयांवर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. मार्च महिन्याचा पंधरवडा संपायला आला आहे. कापूस वेचणी अंतिम टप्प्यात आली आहे. गहू, चना, ज्वारी ही रब्बी हंगामातील पिके काढणीला आल्याने शेतकऱ्यांना कापूस वेचणी करायला मजूर मिळणे कठीण झाले आहे.वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने अवकाळी पाऊस होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. अवकाळी पावसासह गारपीठ झाली तर शेतकऱ्यांचा हाताशी आलेला कापूस मातीमोल होण्याचा धोका निर्माण झाला आहे. राजुरा तालुक्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.या स्थितीत शेतकरी आर्थिक नुकसानीचा धोका पत्करत कापूस वेचणीचे दर वाढवून १५ रुपये प्रति किलो दर द्यायला तयार आहेत. मात्र मजूर मिळत नसल्याचे पीक शेतातच आहे. परिणामी शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे.कापसाची शेती संकटातकापूस पिकावर होणारा खर्च मोठा आहे. सुरवातीपासून शेतकऱ्यांना कापूस पिकांवर जास्त खर्च करावा लागतो.त्या तुलनेत कापूस शेतकऱ्यांना परवडत नाही. मजुरांची मजुरी वाढल्याने कपसाचीं शेती संकटात आली आहे.कापूस वेचणी शेवटच्या टप्प्यात आली असून कापूस वेचणी करायला मजूर मिळत नसल्याने नाईलाजाने जास्त पैसे मजुरी देऊन कापूस वेचणी करावी लागत आहे.- श्रीधर जुनघरी, शेतकरी, गोवरी

टॅग्स :agricultureशेती