शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

शेतातील कापूस बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा संपायला तयार नाही. कधी निसर्गाची उदासीनता तर कधी शासनाचे शेतकरी विरोधी धोरण कास्तकारांना मारक ठरले आहे. उत्पादन खर्च जास्त व उत्पादन कमी अशी शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. शेतकरी दिवसेंदिवस महागाईच्या तडाख्यात भरडला जात आहे. नापिकिने शेतकºयांवर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे.

ठळक मुद्देकापूस वेचणीला मजूर मिळेना : वातावरणातील बदलाने शेतकरी चिंतातूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कापूस अंतिम टप्प्यात आला आहे. मार्च महिन्याचा पंधरवडा उलटून गेला आहे. मात्र कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने कापूस शेतातच आहे. दररोज वातावरणात बदल होत असून वेळी-अवेळी पाणी येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून शेतातील कापसू बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे.कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा संपायला तयार नाही. कधी निसर्गाची उदासीनता तर कधी शासनाचे शेतकरी विरोधी धोरण कास्तकारांना मारक ठरले आहे. उत्पादन खर्च जास्त व उत्पादन कमी अशी शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. शेतकरी दिवसेंदिवस महागाईच्या तडाख्यात भरडला जात आहे. नापिकिने शेतकºयांवर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. मार्च महिन्याचा पंधरवडा संपायला आला आहे. कापूस वेचणी अंतिम टप्प्यात आली आहे. गहू, चना, ज्वारी ही रब्बी हंगामातील पिके काढणीला आल्याने शेतकऱ्यांना कापूस वेचणी करायला मजूर मिळणे कठीण झाले आहे.वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने अवकाळी पाऊस होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. अवकाळी पावसासह गारपीठ झाली तर शेतकऱ्यांचा हाताशी आलेला कापूस मातीमोल होण्याचा धोका निर्माण झाला आहे. राजुरा तालुक्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.या स्थितीत शेतकरी आर्थिक नुकसानीचा धोका पत्करत कापूस वेचणीचे दर वाढवून १५ रुपये प्रति किलो दर द्यायला तयार आहेत. मात्र मजूर मिळत नसल्याचे पीक शेतातच आहे. परिणामी शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे.कापसाची शेती संकटातकापूस पिकावर होणारा खर्च मोठा आहे. सुरवातीपासून शेतकऱ्यांना कापूस पिकांवर जास्त खर्च करावा लागतो.त्या तुलनेत कापूस शेतकऱ्यांना परवडत नाही. मजुरांची मजुरी वाढल्याने कपसाचीं शेती संकटात आली आहे.कापूस वेचणी शेवटच्या टप्प्यात आली असून कापूस वेचणी करायला मजूर मिळत नसल्याने नाईलाजाने जास्त पैसे मजुरी देऊन कापूस वेचणी करावी लागत आहे.- श्रीधर जुनघरी, शेतकरी, गोवरी

टॅग्स :agricultureशेती