शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी सेवादासनगरवासीयांची ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 01:03 IST

वर्षानुवर्ष पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहे. मात्र आजपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने घोटभर पाण्यासाठी पहाडावरील सेवादासनगर वासीयांची ससेहोलपट सुरू आहे. पाणी टंचाईचा लग्न समारंभानाही फटका बसत असून अनेकजण दुसऱ्या गावी कार्यक्रमाच्या आयोजनाला पसंती देत आहेत.

ठळक मुद्देलग्न समारंभानाही फटका : घोटभर पाण्यासाठी नागरिकांचा संघर्ष

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : वर्षानुवर्ष पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहे. मात्र आजपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने घोटभर पाण्यासाठी पहाडावरील सेवादासनगर वासीयांची ससेहोलपट सुरू आहे. पाणी टंचाईचा लग्न समारंभानाही फटका बसत असून अनेकजण दुसऱ्या गावी कार्यक्रमाच्या आयोजनाला पसंती देत आहेत.दिवसेंदिवस पहाडावर पावसाचे प्रमाण कमी होत आहे. यावर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासूनच सेवादासनगरसह तालुक्यातील विविध गावात पाणी टंचाईने उग्ररुप धारण केले. पंचायत समिती सभापती, जि. प. सदस्य येथे असतानाही हे आमचे काम नाही. ग्रामपंचायतीने पाणी समस्या सोडवावी म्हणून जबाबदारी झटकत आहे. नोकेवाडा ग्रामपंचायतमधील सेवादासनगर येथे भेट दिली असता, पाण्यासाठी नागरिकांचा संघर्ष सुरू असल्याचे दिसून आले.तेलंगणा राज्यालगत असलेली नोकेवाडा ग्रामपंचायत मोठी असून नियोजनाअभावी दरवर्षीच ग्रामस्थांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. निवडणुकीत ग्रामस्थांना पाणी समस्येबाबत आश्वासने दिली जातात. मात्र, आजपर्यंत कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झालेली नाही. पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांच्या पाचविलाच पुजलेला असून जानेवारी महिन्यापासूनच सेवादासनगर येथे पाणी टंचाईची झळ सुरू आहे.७०० ते ८०० लोकसंख्या असलेल्या सेवादासनगर येथे तात्पुरती उपाययोजना म्हणून गावातील लक्ष्मण बाबू पवार यांची विहीर अधिग्रहण करून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. मात्र त्या विहिरीनेही तळ गाठल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. गावातील महिला व नागरिक रात्री जागरण करुन मिळेल तेथून पाणी आणतात व आपली तहाण भागवतात. गावातील सार्वजनिक विहीरही पुर्णत: कोरडी पडली असून हातपंही नादुरुस्त व बंद स्थितीत आहे. हातपंप दुरुस्त करण्याकरिता ग्रामसेवकास वेळोवेळी नागरिक सांगूनही ग्रामसेवक चालढकल करीत आहेत. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असून जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली आहे.तेलंगणाच्या पाण्यावर भागते तहाणसेवादासनगर येथील ग्रामस्थ सध्या तेलंगणातून पाणी आणून आपली तहाण भागवित आहेत. चार ते पाच किमी अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्यातील कोलामा येथून पाणी आणण्यासाठी सेवादासनगरच्या नागरिकांची पायपीट सुरू आहे. पाणी आणण्यासाठी महिला चक्क बैलबंडी हाकलताना दिसून येतात.गरिबांच्या कार्यक्रमांना पाणी टंचाईचे ग्रहणयावर्षी मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ पार पडत आहेत. सेवादासनगर येथील अनेकांचे लग्न जुळले. मात्र गावातील पाण्याच्या स्त्रोतांची पातळी पूर्णत: कोरडी पडल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. गावातील काही सदन नागरिक आपल्या लग्न समारंभात येणाºया पाहुण्यांची व नातेवाईकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पाण्याचे कॅन विकत घेत आहेत. मात्र गरिबांचे हाल होत आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई