शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

पाण्यासाठी सेवादासनगरवासीयांची ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 01:03 IST

वर्षानुवर्ष पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहे. मात्र आजपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने घोटभर पाण्यासाठी पहाडावरील सेवादासनगर वासीयांची ससेहोलपट सुरू आहे. पाणी टंचाईचा लग्न समारंभानाही फटका बसत असून अनेकजण दुसऱ्या गावी कार्यक्रमाच्या आयोजनाला पसंती देत आहेत.

ठळक मुद्देलग्न समारंभानाही फटका : घोटभर पाण्यासाठी नागरिकांचा संघर्ष

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : वर्षानुवर्ष पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहे. मात्र आजपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने घोटभर पाण्यासाठी पहाडावरील सेवादासनगर वासीयांची ससेहोलपट सुरू आहे. पाणी टंचाईचा लग्न समारंभानाही फटका बसत असून अनेकजण दुसऱ्या गावी कार्यक्रमाच्या आयोजनाला पसंती देत आहेत.दिवसेंदिवस पहाडावर पावसाचे प्रमाण कमी होत आहे. यावर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासूनच सेवादासनगरसह तालुक्यातील विविध गावात पाणी टंचाईने उग्ररुप धारण केले. पंचायत समिती सभापती, जि. प. सदस्य येथे असतानाही हे आमचे काम नाही. ग्रामपंचायतीने पाणी समस्या सोडवावी म्हणून जबाबदारी झटकत आहे. नोकेवाडा ग्रामपंचायतमधील सेवादासनगर येथे भेट दिली असता, पाण्यासाठी नागरिकांचा संघर्ष सुरू असल्याचे दिसून आले.तेलंगणा राज्यालगत असलेली नोकेवाडा ग्रामपंचायत मोठी असून नियोजनाअभावी दरवर्षीच ग्रामस्थांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. निवडणुकीत ग्रामस्थांना पाणी समस्येबाबत आश्वासने दिली जातात. मात्र, आजपर्यंत कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झालेली नाही. पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांच्या पाचविलाच पुजलेला असून जानेवारी महिन्यापासूनच सेवादासनगर येथे पाणी टंचाईची झळ सुरू आहे.७०० ते ८०० लोकसंख्या असलेल्या सेवादासनगर येथे तात्पुरती उपाययोजना म्हणून गावातील लक्ष्मण बाबू पवार यांची विहीर अधिग्रहण करून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. मात्र त्या विहिरीनेही तळ गाठल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. गावातील महिला व नागरिक रात्री जागरण करुन मिळेल तेथून पाणी आणतात व आपली तहाण भागवतात. गावातील सार्वजनिक विहीरही पुर्णत: कोरडी पडली असून हातपंही नादुरुस्त व बंद स्थितीत आहे. हातपंप दुरुस्त करण्याकरिता ग्रामसेवकास वेळोवेळी नागरिक सांगूनही ग्रामसेवक चालढकल करीत आहेत. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असून जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली आहे.तेलंगणाच्या पाण्यावर भागते तहाणसेवादासनगर येथील ग्रामस्थ सध्या तेलंगणातून पाणी आणून आपली तहाण भागवित आहेत. चार ते पाच किमी अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्यातील कोलामा येथून पाणी आणण्यासाठी सेवादासनगरच्या नागरिकांची पायपीट सुरू आहे. पाणी आणण्यासाठी महिला चक्क बैलबंडी हाकलताना दिसून येतात.गरिबांच्या कार्यक्रमांना पाणी टंचाईचे ग्रहणयावर्षी मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ पार पडत आहेत. सेवादासनगर येथील अनेकांचे लग्न जुळले. मात्र गावातील पाण्याच्या स्त्रोतांची पातळी पूर्णत: कोरडी पडल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. गावातील काही सदन नागरिक आपल्या लग्न समारंभात येणाºया पाहुण्यांची व नातेवाईकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पाण्याचे कॅन विकत घेत आहेत. मात्र गरिबांचे हाल होत आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई