शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी सेवादासनगरवासीयांची ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 01:03 IST

वर्षानुवर्ष पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहे. मात्र आजपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने घोटभर पाण्यासाठी पहाडावरील सेवादासनगर वासीयांची ससेहोलपट सुरू आहे. पाणी टंचाईचा लग्न समारंभानाही फटका बसत असून अनेकजण दुसऱ्या गावी कार्यक्रमाच्या आयोजनाला पसंती देत आहेत.

ठळक मुद्देलग्न समारंभानाही फटका : घोटभर पाण्यासाठी नागरिकांचा संघर्ष

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : वर्षानुवर्ष पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहे. मात्र आजपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने घोटभर पाण्यासाठी पहाडावरील सेवादासनगर वासीयांची ससेहोलपट सुरू आहे. पाणी टंचाईचा लग्न समारंभानाही फटका बसत असून अनेकजण दुसऱ्या गावी कार्यक्रमाच्या आयोजनाला पसंती देत आहेत.दिवसेंदिवस पहाडावर पावसाचे प्रमाण कमी होत आहे. यावर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासूनच सेवादासनगरसह तालुक्यातील विविध गावात पाणी टंचाईने उग्ररुप धारण केले. पंचायत समिती सभापती, जि. प. सदस्य येथे असतानाही हे आमचे काम नाही. ग्रामपंचायतीने पाणी समस्या सोडवावी म्हणून जबाबदारी झटकत आहे. नोकेवाडा ग्रामपंचायतमधील सेवादासनगर येथे भेट दिली असता, पाण्यासाठी नागरिकांचा संघर्ष सुरू असल्याचे दिसून आले.तेलंगणा राज्यालगत असलेली नोकेवाडा ग्रामपंचायत मोठी असून नियोजनाअभावी दरवर्षीच ग्रामस्थांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. निवडणुकीत ग्रामस्थांना पाणी समस्येबाबत आश्वासने दिली जातात. मात्र, आजपर्यंत कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झालेली नाही. पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांच्या पाचविलाच पुजलेला असून जानेवारी महिन्यापासूनच सेवादासनगर येथे पाणी टंचाईची झळ सुरू आहे.७०० ते ८०० लोकसंख्या असलेल्या सेवादासनगर येथे तात्पुरती उपाययोजना म्हणून गावातील लक्ष्मण बाबू पवार यांची विहीर अधिग्रहण करून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. मात्र त्या विहिरीनेही तळ गाठल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. गावातील महिला व नागरिक रात्री जागरण करुन मिळेल तेथून पाणी आणतात व आपली तहाण भागवतात. गावातील सार्वजनिक विहीरही पुर्णत: कोरडी पडली असून हातपंही नादुरुस्त व बंद स्थितीत आहे. हातपंप दुरुस्त करण्याकरिता ग्रामसेवकास वेळोवेळी नागरिक सांगूनही ग्रामसेवक चालढकल करीत आहेत. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असून जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली आहे.तेलंगणाच्या पाण्यावर भागते तहाणसेवादासनगर येथील ग्रामस्थ सध्या तेलंगणातून पाणी आणून आपली तहाण भागवित आहेत. चार ते पाच किमी अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्यातील कोलामा येथून पाणी आणण्यासाठी सेवादासनगरच्या नागरिकांची पायपीट सुरू आहे. पाणी आणण्यासाठी महिला चक्क बैलबंडी हाकलताना दिसून येतात.गरिबांच्या कार्यक्रमांना पाणी टंचाईचे ग्रहणयावर्षी मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ पार पडत आहेत. सेवादासनगर येथील अनेकांचे लग्न जुळले. मात्र गावातील पाण्याच्या स्त्रोतांची पातळी पूर्णत: कोरडी पडल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. गावातील काही सदन नागरिक आपल्या लग्न समारंभात येणाºया पाहुण्यांची व नातेवाईकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पाण्याचे कॅन विकत घेत आहेत. मात्र गरिबांचे हाल होत आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई