शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

खरिपावर बियाण्यांचा आघात

By admin | Updated: May 12, 2014 23:26 IST

मागील दोन वर्षामधील रोगराई, अतवृष्टी, महापूर यांचा आघात सहन करून बळीराजा आता पुन्हा उसणे बळ एकवटत मातीत रमायला लागला आहे.

रवी जवळे - चंद्रपूर

मागील दोन वर्षामधील रोगराई, अतवृष्टी, महापूर यांचा आघात सहन करून बळीराजा आता पुन्हा उसणे बळ एकवटत मातीत रमायला लागला आहे. मात्र या बळीदादांच्या खरीपांवर आता बियाण्यांचे संकट घोंगावत आहे. हा नवा आघात त्यांना प्रारंभीच सहन करावा लागणार आहे. मागील वर्षीच्या अतवृष्टीत महाबीजचे सोयाबीन प्लांट उद्ध्वस्त झाल्याने सोयाबीन बियाण्यांची प्रचंड टंचाई जाणवणार आहे. शेतकर्‍यांच्या सोयाबीनला चक्क अंकुर फुटल्यामुळे त्यांच्याही हाती बियाणे नाही. त्यामुळे बियाणे आणायचे कुठून, या जटील प्रश्नाची उकल कृषी विभागासोबत शेतकर्‍यांनाही करावी लागणार आहे.

मागील वर्षी जुलै, ऑगस्टमध्ये अतवृष्टी झाली. यात शेतकर्‍यांच्या अनेकदा पेरण्या वाहून गेल्या. काही शेतकर्‍यांना वेळ निघून गेल्यामुळे सोयाबीनच्या पेरण्या करताच आल्या नाही. काही शेतकर्‍यांच्या पेरण्या तग धरून राहिल्या. मात्र सोयाबीन हाती येत असताना पुन्हा पाऊस आला. त्यानंतर कापणी सुरू असताना पुन्हा एक महिना संततधार पाऊस बरसल्याने सोयाबीनचा दाणा सुकू शकला नाही. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांच्या सोयाबीनला अंकूर फुटले. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील जवळजवळ ९0 टक्के शेतकर्‍यांजवळ सोयाबीनचे बियाणे शिल्लक नाही. ज्या शेतकर्‍यांनी विलंबाने पेरणी केली किंवा ज्यांनी रबी हंगामात सोयाबीन पेरला, त्यांच्याजवळ बियाणे म्हणून वापरायला सोयाबीन शिल्लक असेलही; मात्र असे शेतकरी १0 टक्केच आहेत.

खास सोयाबीनच्या बियाणांसाठी शासनाच्या वतीने तयार करण्यात येत असलेले महाबीजचे प्लांटही अतवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाले. त्यामुळे या ठिकाणीही सोयाबीन बियाणांची प्रचंड टंचाई आहे. महाबीजचेच प्लांट उद्ध्वस्त झाल्याने ही टंचाई राज्यभरच जाणवणार आहे. त्यामुळे सध्या सोयाबीनबाबत खुद्द राज्याचा कृषी विभागाच चिंतेत आहे.

सध्या खरिपाची तयारी सुरू आहे. लग्नसराईला बगल देत शेतकर्‍यांचीही शेतात लगबग सुरू झाली आहे. मात्र बियाण्यांबाबत कृषी विभागाच्याच हालचाली अद्याप सुरू झालेल्या नाहीत. दुसरीकडे व्यापार्‍यांनी मार्केटमध्ये सोयाबीनचे बियाणे उपलब्ध केले आहे. मात्र बियाणांच्या किमती शेतकर्‍यांच्या फाटक्या झोळीला पुन्हा फाडणार्‍या आहेत. मागील वर्षी एक एकरला पुरेशी असलेली ३0 किलोची बॅग १५00 ते १८00 रुपयापर्यंत विकण्यात आली होती. तीच बॅग यावर्षी प्रारंभीच २२00 ते २८00 रुपयापर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहे. प्रत्यक्षात पेरण्या होईपर्यंत सोयाबीन बियाणे प्रति बॅग तब्बल साडेतीन हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने सोयाबीन बियाणांच्या किमती निर्धारित केल्या नसल्यामुळे यंदा शेतकर्‍यांची लूट निश्‍चित आहे.एवढे महाग बियाणे असले तरी त्यात उगवण क्षमता असेलच याची गॅरंटीही नाही. विशेष म्हणजे, राज्यातच अतवृष्टी झाल्यामुळे हे बियाणे आंध्र प्रदेशातून आणले जात असल्याची माहिती आहे.