शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

आठ दिवसांनी उलगडणार चंद्रपूर जिल्ह्यातील हिरव्या पाण्याचे रहस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 12:39 IST

कोरपना तालुक्यातील अमलनाला धरणातील पाण्याने धारण केलेला हिरवा रंग सर्वत्र औस्युक्याचा विषय ठरला आहे. पाणी एकाएकी हिरवे होण्यामागील कारणांचा अद्यापही उगडला झाला नाही.

ठळक मुद्देरहस्य कायम नीरीनेही घेतले पाच ठिकाणावरील पाण्याचे नमुने

आशिष देरकर।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरपना तालुक्यातील अमलनाला धरणातील पाण्याने धारण केलेला हिरवा रंग सर्वत्र औस्युक्याचा विषय ठरला आहे. पाणी एकाएकी हिरवे होण्यामागील कारणांचा अद्यापही उगडला झाला नाही. अशातच मंगळवारी नागपूर येथील नीरीच्या चमूने पाहणी केली. धरणातील ठिकठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहे. मात्र या चमूनेही खरे कारण अद्याप स्वष्ट केले नसल्यामुळे हिरव्या पाण्याचे रहस्य कायमच आहे.अंमलनाला धरणाचे पाणी पूर्णत: हिरवे झाल्यामुळे शासनाने दखल घेत वेगवेगळ्या विभागाकडून पाण्याच्या तपासणीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहे. मंगळवारी नीरीच्या चमूने अंमलनाला धरणाचे निरीक्षण करून नमुने तपासणीसाठी घेतले आहे. पाणी तपासून निष्कर्ष मिळेपर्यंत आठ दिवस लागणार आहे.नागपूरवरून आलेल्या या चमूत डॉ. जी. के. खडसे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजू वसावे, बहादुले, सिंचन विभागाचे उपअभियंता ओचावार, कोरपनाचे तहसीलदार हरीश गाडे, राजूराचे तहसीलदार रवींद्र होळी, सिंचाई विभागाचे शाखा अभियंता सय्यद अमीर अली याचां समावेश आहे. सदर चमूने जवळपास चार तास अंमलनाला धरणाची पाहणी केली. पाच ठिकाणचे वेगवेगळे नमुने तपासणीसाठी घेतले. अंमलनाला धरणाच्या आजूबाजूच्या पाण्याचे स्त्रोत बघून त्याठिकाणी काही आक्षेपार्ह आढळते काय,याची सुद्धा पाहणी केली. मात्र असे काहीही आढळले नाही.सर्वप्रथम ‘लोकमत’ने ‘अंमलनाला धरणातील पाणी झाले हिरवे’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर याकडे जिल्हा प्रशासनासह सर्वत्र खळबळ उडाली. जिल्ह्याचे पालकमंत्र सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत चौकशीचे आदेश देऊन पाणी हिरवे होण्याच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.यानंतर शासनाच्या विविधपातळीवर चमू या धरणाला भेट देऊन पाहणी करीत आहे. मात्र रहस्य कायमच आहे.नीरीचे डॉ. खडसे यांच्या मतेघाबरण्याचे काहीही कारण नसून शेवाळामुळेच हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. तपासणीसाठी आतील पाणी सुद्धा घेण्यात आलेले आहे. चमूच्या माहितीनुसार आतील पाणी स्वच्छ असून शेवाळ वरती तरंगत असल्याचे दिसते. तसेच किनाऱ्यावर त्याचे जास्त प्रमाण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या शेवाळाचे अनेक प्रकार असून काही शेवाळ नुकसानकारक पण असतात. मात्र यामुळे माशांना कसल्याही प्रकारचा धोका नसल्याचे नीरीच्या चमूने स्पष्ट केले.पाणी हिरवे होण्यामागे शेवाळ ही सूक्ष्म वनस्पती कारणीभूत आहे. परिसरातील शेतात टाकलेल्या रासायनिक खतांमधील सल्फेट व फॉस्फेट धरणाच्या पाण्यात मिसळल्याने या वनस्पतींना खाद्य मिळाले. अशातच सूर्यप्रकाशही मिळाला. यामुळे या वनस्पतीची गतीने वाढ झाली. ढगाळ वातावरणात असे झाले नसते. यामागे दुसरे कोणतेही कारण दिसत नाही. या वनस्पतीचे पाण्यात अधिक प्रमाण असेल तर पाण्यातील आॅक्सिजन कमी होतो.- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोयायटी, चंद्रपूर.

टॅग्स :pollutionप्रदूषण