शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

आठ दिवसांनी उलगडणार चंद्रपूर जिल्ह्यातील हिरव्या पाण्याचे रहस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 12:39 IST

कोरपना तालुक्यातील अमलनाला धरणातील पाण्याने धारण केलेला हिरवा रंग सर्वत्र औस्युक्याचा विषय ठरला आहे. पाणी एकाएकी हिरवे होण्यामागील कारणांचा अद्यापही उगडला झाला नाही.

ठळक मुद्देरहस्य कायम नीरीनेही घेतले पाच ठिकाणावरील पाण्याचे नमुने

आशिष देरकर।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरपना तालुक्यातील अमलनाला धरणातील पाण्याने धारण केलेला हिरवा रंग सर्वत्र औस्युक्याचा विषय ठरला आहे. पाणी एकाएकी हिरवे होण्यामागील कारणांचा अद्यापही उगडला झाला नाही. अशातच मंगळवारी नागपूर येथील नीरीच्या चमूने पाहणी केली. धरणातील ठिकठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहे. मात्र या चमूनेही खरे कारण अद्याप स्वष्ट केले नसल्यामुळे हिरव्या पाण्याचे रहस्य कायमच आहे.अंमलनाला धरणाचे पाणी पूर्णत: हिरवे झाल्यामुळे शासनाने दखल घेत वेगवेगळ्या विभागाकडून पाण्याच्या तपासणीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहे. मंगळवारी नीरीच्या चमूने अंमलनाला धरणाचे निरीक्षण करून नमुने तपासणीसाठी घेतले आहे. पाणी तपासून निष्कर्ष मिळेपर्यंत आठ दिवस लागणार आहे.नागपूरवरून आलेल्या या चमूत डॉ. जी. के. खडसे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजू वसावे, बहादुले, सिंचन विभागाचे उपअभियंता ओचावार, कोरपनाचे तहसीलदार हरीश गाडे, राजूराचे तहसीलदार रवींद्र होळी, सिंचाई विभागाचे शाखा अभियंता सय्यद अमीर अली याचां समावेश आहे. सदर चमूने जवळपास चार तास अंमलनाला धरणाची पाहणी केली. पाच ठिकाणचे वेगवेगळे नमुने तपासणीसाठी घेतले. अंमलनाला धरणाच्या आजूबाजूच्या पाण्याचे स्त्रोत बघून त्याठिकाणी काही आक्षेपार्ह आढळते काय,याची सुद्धा पाहणी केली. मात्र असे काहीही आढळले नाही.सर्वप्रथम ‘लोकमत’ने ‘अंमलनाला धरणातील पाणी झाले हिरवे’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर याकडे जिल्हा प्रशासनासह सर्वत्र खळबळ उडाली. जिल्ह्याचे पालकमंत्र सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत चौकशीचे आदेश देऊन पाणी हिरवे होण्याच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.यानंतर शासनाच्या विविधपातळीवर चमू या धरणाला भेट देऊन पाहणी करीत आहे. मात्र रहस्य कायमच आहे.नीरीचे डॉ. खडसे यांच्या मतेघाबरण्याचे काहीही कारण नसून शेवाळामुळेच हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. तपासणीसाठी आतील पाणी सुद्धा घेण्यात आलेले आहे. चमूच्या माहितीनुसार आतील पाणी स्वच्छ असून शेवाळ वरती तरंगत असल्याचे दिसते. तसेच किनाऱ्यावर त्याचे जास्त प्रमाण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या शेवाळाचे अनेक प्रकार असून काही शेवाळ नुकसानकारक पण असतात. मात्र यामुळे माशांना कसल्याही प्रकारचा धोका नसल्याचे नीरीच्या चमूने स्पष्ट केले.पाणी हिरवे होण्यामागे शेवाळ ही सूक्ष्म वनस्पती कारणीभूत आहे. परिसरातील शेतात टाकलेल्या रासायनिक खतांमधील सल्फेट व फॉस्फेट धरणाच्या पाण्यात मिसळल्याने या वनस्पतींना खाद्य मिळाले. अशातच सूर्यप्रकाशही मिळाला. यामुळे या वनस्पतीची गतीने वाढ झाली. ढगाळ वातावरणात असे झाले नसते. यामागे दुसरे कोणतेही कारण दिसत नाही. या वनस्पतीचे पाण्यात अधिक प्रमाण असेल तर पाण्यातील आॅक्सिजन कमी होतो.- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोयायटी, चंद्रपूर.

टॅग्स :pollutionप्रदूषण