शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी विद्यार्थ्यांना एसटीतून उतरविले

By admin | Updated: August 3, 2016 01:51 IST

शाळकरी पासधारक विद्यार्थी बसमध्ये बसण्यासाठी गेले असता त्यांना बसमध्ये बसण्यासाठी मज्जाव करुन

चालकांची मनमानी : गावकरी संतप्त कान्हाळगाव: शाळकरी पासधारक विद्यार्थी बसमध्ये बसण्यासाठी गेले असता त्यांना बसमध्ये बसण्यासाठी मज्जाव करुन चालकाने खाली उतरविले. हा संतापजनक प्रकार सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गडचांदूर बसस्थानकांवर घडला. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी रोष व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, गडचांदूर येथील बसस्थानकावर दुपारी १२ वाजता चंद्रपूर- आदिलाबाद बसचे आगमण झाले. बस आल्याबरोबर पासधारक विद्यार्थी बसमध्ये चढायला लागले. तेव्हा चालकांनी विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्यास मज्जाव केला. आधी प्रवाशांना बसू द्या. नंतर तुम्ही बसा, असे चालक म्हणाला. त्यातच इतर प्रवाशांमुळे बस खचाखच भरली. परिणामी विद्यार्थ्यांना बसस्थानकावर ताटकळत उभे राहावे लागले. त्यानंतर लगेचच राजुरा- कोरपना मिनी बस आली. तेथील चालक व वाहकांनी मिनी बसमध्ये पास चालत नाही, असे सांगून विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा बसण्यापासून रोखले. शाळकरी मुले बसमध्ये दोन-तीन वेळा चढले आणि उतरले. शेवटी इतर प्रवासी आल्यास विद्यार्थ्यांना उभे राहून प्रवास करावा लगेल, या अटीवर बसमध्ये बसविण्याची परवानगी देण्यात आली. असाच प्रकार विद्यार्थ्यासोबतच अनेकदा घडतो आहे. या अनुषंगाने राज्य परिवहन विभागाने चालक- वाहकांना विद्यार्थ्यांप्रती माणूसकीची वागणूक देण्याची समज द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. गडचांदूर ते कोरपनादरम्यान ५० ते ६० पेक्षा अधिक विद्यार्थी दररोज प्रवास करतात. इंजापूर, धामणगाव, वडगाव, आसन, खिर्डी, कढोली, रामपूर, वनसडी, सोनुर्ली, चिंचोली, लोणी, कोरपना, माथा, पारडी, परमोडा, कन्हाळगाव, अकोला, जेवर, पिपरी गावातील विद्यार्थी नियमित शाळेत जातात. परंतु पास असूनही विद्यार्थ्यांना बसमध्ये बसण्यापासून रोखले जाते. तेव्हा या पासचा उपयोग काय? असा सवाल संतप्त विद्यार्थ्यांनी केला. (वार्ताहर) घडलेल्या प्रकाराबाबत राजुरा आगर व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता, त्यांनी राजुरा बसस्थानकांवर संपर्क करण्यास सांगितले. त्यानंतर राजुरा बसस्थानक नियंत्रकांनी चंद्रपूर बसस्थानकावर संपर्क करण्यास सांगितले. त्यांनी थेट तक्रार करण्याचाही सल्ला दिला. मात्र याबाबत कुणीही गंभीर दखल घेतली नाही. अतिरिक्त बसफेरी सोडा दुपारी १२ वाजताची वेळ शाळा सुटण्याची असते. त्यामुळे विद्यार्थी व इतर प्रवाशांची एकच गर्दी होते. पासधारक विद्यार्थ्यांसाठी गडचांदूर ते कोरपना अतिरिक्त बसफेरी सुरु करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.आम्ही दररोज ५० ते ६० पासधारक विद्यार्थी गडचांदूर ते कोरपनादरम्यान शाळेत जाण्या-येण्यासाठी एसटी बसने प्रवास करतो. त्यामध्ये बहुसंख्य मुली आहेत. परंतु अनेकदा आम्हाला बसमध्ये बसूच दिले जात नाही.त्यामुळे पास असुनसूद्धा फूकट जात असल्यासारखी वागणूक चालक वाहकांकडून दिली जाते. आमच्यातील काही विद्यार्थी वयाने लहान आहेत. त्यामुळे ते घाबरलेले असतात. याबाबत वाहतूक नियंत्रकाकडे तक्रार केली, तरी त्याकडे ते नेहमीच दुर्लक्ष करतात. - विवेक पारखी, विद्यार्थी