शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

शाळा व्यवस्थापन समित्यांना लागले राजकारणाचे ग्रहण

By admin | Updated: February 7, 2015 00:36 IST

गाव तिथे प्राथमिक शाळा आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचे केल्याने ते राबविण्यासाठी ग्रामशिक्षक समितीची निर्मिती करण्यात आली.

कोरपना: गाव तिथे प्राथमिक शाळा आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचे केल्याने ते राबविण्यासाठी ग्रामशिक्षक समितीची निर्मिती करण्यात आली. कोरपना तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये या व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या. मात्र स्थापनेच्यावेळी गाव पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपात समितीची स्थापना करण्यात आली. त्यामुळे या समितीमध्ये काम कमी आणि राजकारण जास्त केले जात असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ठासळत चालली आहे.शाळेचा परिसर राजकारण विरहित असावा, शिक्षणाच्या विकासात लोकसहभाग असावा, या हेतुने ग्रामशिक्षण समितीचे रुपांतर शाळा व्यवस्थापन समितीत करण्यात आले. मात्र तरीही गावपुढाऱ्यांचा हस्तक्षेप आणि मत्केदारी संपुष्टात आली नसल्याने चित्र संपूर्ण कोरपना तालुक्यात दिसत आहे. प्रत्येक गावातील पुढाऱ्याला शाळा व्यवस्थापन समितीत आपल्या गटाचे किंवा राजकीय पक्षाचे लोक कसे निवडले जातील, या दृष्टीने प्रयत्न झाल्याचे पहावयास मिळते. प्रत्येक गावातील एकही बालक शाळाबाह्य राहू नये, अपंग मुलांची १०० टक्के पटनोंदणी करणे, मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे, शिक्षकांची अनियमितता आणि गैरवर्तनावर अंकुश निर्माण व्हावा म्हणून सूचना देणे, शालेय विकासासाठी आराखडा तयार करणे तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यावर भर, शिक्षकांची हजेरी अशा विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या शाळा व्यवस्थापन समित्यावर असणाऱ्या अध्यक्ष व सदस्यांची आहे. या महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष न देता प्रत्येक गावातील पुढाऱ्यांचा या समित्यांमध्ये अवाजवी हस्तक्षेप वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीच्या मूळ उद्देशालाच बगल दिला जात आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे कुणाचेही लक्ष नाही. याउलट शाळेच्या विकासामध्ये हस्तक्षेप करुन मलिदा कसा लाटता येईल, याची जणू तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांत स्पर्धा लागली की काय, अशी स्थिती आहे. प्रत्येक प्राथमिक हायस्कूल शाळेला येणाऱ्या वेगवेगळ्या फंडातून शाळांमध्ये अधिक वर्ग खोल्यांचे बांधकाम वार्षिक डागडुजी सर्व शिक्षा अभियानातून रुपये किंमतीचे स्वच्छतागृह बांधण्यात येते. या कामात शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य किंवा अध्यक्ष हेच या सर्व कामावर नियंत्रण ठेवतात, अशाअडचणी प्रत्येक शाळांमध्ये आहे. या अडचणी सोडवून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्याचे सोडून पुढारी राजकारणात देशाचे भविष्य ठरविणाऱ्या पिढीचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचे पाप करीत आहे. (शहर प्रतिनिधी)