शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

शाळा व्यवस्थापन समित्यांना लागले राजकारणाचे ग्रहण

By admin | Updated: February 7, 2015 00:36 IST

गाव तिथे प्राथमिक शाळा आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचे केल्याने ते राबविण्यासाठी ग्रामशिक्षक समितीची निर्मिती करण्यात आली.

कोरपना: गाव तिथे प्राथमिक शाळा आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचे केल्याने ते राबविण्यासाठी ग्रामशिक्षक समितीची निर्मिती करण्यात आली. कोरपना तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये या व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या. मात्र स्थापनेच्यावेळी गाव पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपात समितीची स्थापना करण्यात आली. त्यामुळे या समितीमध्ये काम कमी आणि राजकारण जास्त केले जात असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ठासळत चालली आहे.शाळेचा परिसर राजकारण विरहित असावा, शिक्षणाच्या विकासात लोकसहभाग असावा, या हेतुने ग्रामशिक्षण समितीचे रुपांतर शाळा व्यवस्थापन समितीत करण्यात आले. मात्र तरीही गावपुढाऱ्यांचा हस्तक्षेप आणि मत्केदारी संपुष्टात आली नसल्याने चित्र संपूर्ण कोरपना तालुक्यात दिसत आहे. प्रत्येक गावातील पुढाऱ्याला शाळा व्यवस्थापन समितीत आपल्या गटाचे किंवा राजकीय पक्षाचे लोक कसे निवडले जातील, या दृष्टीने प्रयत्न झाल्याचे पहावयास मिळते. प्रत्येक गावातील एकही बालक शाळाबाह्य राहू नये, अपंग मुलांची १०० टक्के पटनोंदणी करणे, मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे, शिक्षकांची अनियमितता आणि गैरवर्तनावर अंकुश निर्माण व्हावा म्हणून सूचना देणे, शालेय विकासासाठी आराखडा तयार करणे तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यावर भर, शिक्षकांची हजेरी अशा विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या शाळा व्यवस्थापन समित्यावर असणाऱ्या अध्यक्ष व सदस्यांची आहे. या महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष न देता प्रत्येक गावातील पुढाऱ्यांचा या समित्यांमध्ये अवाजवी हस्तक्षेप वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीच्या मूळ उद्देशालाच बगल दिला जात आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे कुणाचेही लक्ष नाही. याउलट शाळेच्या विकासामध्ये हस्तक्षेप करुन मलिदा कसा लाटता येईल, याची जणू तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांत स्पर्धा लागली की काय, अशी स्थिती आहे. प्रत्येक प्राथमिक हायस्कूल शाळेला येणाऱ्या वेगवेगळ्या फंडातून शाळांमध्ये अधिक वर्ग खोल्यांचे बांधकाम वार्षिक डागडुजी सर्व शिक्षा अभियानातून रुपये किंमतीचे स्वच्छतागृह बांधण्यात येते. या कामात शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य किंवा अध्यक्ष हेच या सर्व कामावर नियंत्रण ठेवतात, अशाअडचणी प्रत्येक शाळांमध्ये आहे. या अडचणी सोडवून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्याचे सोडून पुढारी राजकारणात देशाचे भविष्य ठरविणाऱ्या पिढीचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचे पाप करीत आहे. (शहर प्रतिनिधी)