शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

नदी, नाले पार करून २५० किलोमीटरवर पोहचवली शालेय पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 9:47 PM

जिल्हाबंदी हटताच प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी संस्थाध्यक्ष गजानन पाथोडे व संस्थासचिव जान्हवी पाथोडे यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्ह्यातील चारही तालुक्यातील ८५ गावामधील २०० विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके पोहचविण्याचा धाडसी उपक्रम हाती घेण्यात आला व यशस्वी करण्यात आला.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे नुकसान टाळलेशिक्षकांची सामाजिक बांधिलकी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कानपा येथील आश्रमशाळेच्या शिक्षकांनी २०० ते २५० किमी अंतरावर असलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके पोहचवून दिली. त्यांचा हा उपक्रम कोरोना काळात प्रशंसनीय ठरला आहे.तालुक्यातील कानपा येथे मातोश्री लक्ष्मीबाई आदिवासी प्राथ व माध्य.आश्रम शाळा तसेच स्व.वासुदेवराव पाथोडे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आहे. यात एकूण ४०० च्या जवळपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यसरकारने १५ मार्चपासून शाळा बंद केल्या तर केंद्र सरकारने २३ मार्चपासून देशात टाळेबंदी केली असल्याने शाळा बंद आहेत.

या शाळेत गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी, सिरोंचा, आरमोरी, वडसा, एटापल्ली तालुक्यातील ८५ गावातील २०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अतिशय सुसज्ज इमारत, राहण्याची व शिक्षणाची उत्तम व्यवस्था, यामुळे या आश्रमशाळेत दुरुदुरुन विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. मात्र कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत असल्याने सरकारने वेळोवेळी टाळेबंदी वाढवली. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी संस्थेचे अध्यक्ष गजानन पाथोडे यांच्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी विद्यार्थी आहेत, त्या ठिकाणी समुपदेशकांची नियुक्ती करून सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवून शैक्षणिक मार्गदर्शन सुरू आहे. सोशल मीडियाचा वापर करून ज्या भागात नेटवर्कची सेवा उपलब्ध आहे, अशा भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचेही काम सुरू आहे.

जिल्हाबंदी हटताच प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी संस्थाध्यक्ष गजानन पाथोडे व संस्थासचिव जान्हवी पाथोडे यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्ह्यातील चारही तालुक्यातील ८५ गावामधील २०० विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके पोहचविण्याचा धाडसी उपक्रम हाती घेण्यात आला व यशस्वी करण्यात आला. ही पुस्तके विद्यार्थ्यांच्या घरी पोहचवत असताना अनेक अडचणी आल्या. अनेक ठिकाणी शिक्षकांना स्थानिक लोकांची मदत घेत नदी, नाले डोक्यावर पुस्तकांचा गठ्ठा घेऊन पार करावे लागले. तर काही दुर्गम व डोंगराळ भागात ४ ते ५ किलोमीटर डोक्यावर पुस्तके घेऊन पायपीट करत विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत पोहचावे लागले. यात पालक व विद्यार्थी यांनी सर्व शिक्षकांना सहकार्य केले. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र