शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

दर शनिवारी शिष्यवृत्तीची तासिका होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:40 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या पाचवी ते आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा निकाल दरवर्षी घटत आहे. शिवाय नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परिक्षेत नापास होणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे यावर पर्याय म्हणून सर्व जि.प. प्राथमिक शाळेमध्ये दर शनिवारी शिष्यवृत्ती व नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेसाठी एक तासिका राखून ठेवावे, असा निर्णय जि.प. शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देजि. प. शिक्षण समितीचा ठराव पारित

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या पाचवी ते आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा निकाल दरवर्षी घटत आहे. शिवाय नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परिक्षेत नापास होणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे यावर पर्याय म्हणून सर्व जि.प. प्राथमिक शाळेमध्ये दर शनिवारी शिष्यवृत्ती व नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेसाठी एक तासिका राखून ठेवावे, असा निर्णय जि.प. शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.जि. प. उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती कृष्णा सहारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी तज्ज्ञ शिक्षक जे. टी. पोटे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे व शिक्षण समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. सभापती सहारे यांनी नवीन शैक्षणिक सत्राबाबत जि.प. शाळांमध्ये नवीन कोणते उपक्रम राबवावे, यासंदर्भात सदस्यांशी चर्चा केली. मागील दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती परिक्षेचा टक्का घटला. त्यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे. अभ्यासक्रमाचे नियोजन करताना दर शनिवारी शिष्यवृत्तीसाठी एक तासिका राखून ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मुख्याध्यापिकांनी याबाबत तातडीने नियोजन करावे, असेही सूचविले. उपस्थित सदस्यांनी या मुद्याला सहमती दिली. त्यामुळे ठराव पारीत करण्यात आला. एका वर्गातून शिष्यवृत्ती परीक्षेत पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. प्रत्येक पंचायत समितीमध्ये कार्यालयीन कामालाा आल्यास शिक्षकांनी रजिस्टरमध्ये नोंदणी करावी, ई-लर्निग संच बंद असल्यास तातडीने सुरू करावे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जि.प. शाळांचे कामकाज पाहण्याच्या दृष्टीने भरारी पथक नियुक्त करण्यात येणार आहे. हे पथक महिन्यातून काही विशिष्ट दिवसांमध्ये शाळांची भेट घेवून समस्या जाणून घेणार आहेत.ग्रामीण आणि आदिवासी भागातील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात कोणत्याही अडचणी येवू नये, यासाठी गटशिक्षणाधिकारी, केंद प्रमुख व मुख्याध्यापकान्ांी दक्षता घ्यावे, अशा सूचना देण्यात येणार आहेत. यावेळी शालेय गणवेश वितरण व पाठ्यपुस्तकांबाबतही चर्चा झाली.विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून विशेष तासिका घेण्याचा ठराव पारित केला. प्रत्येक शाळेने याची अंमलबजावणी करावी.- कृष्णा सहारे, उपाध्यक्ष, जि.प.