शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
6
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
7
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
8
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
9
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
10
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
11
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
12
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
13
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
14
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
15
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
16
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
17
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
18
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
19
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
20
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?

आॅनलाईन प्रक्रियेत अडकले शिष्यवृत्ती अर्ज

By admin | Updated: September 11, 2014 23:24 IST

महाविद्यालय व विशेष समाजकल्याण विभागात सुसुत्रता आणण्यासाठी शासनाने आॅनलाईन शिष्यवृत्ती अर्ज प्रणाली कार्यान्वीत केली. मात्र, या आॅनलाईन प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचा मानसिक त्रास वाढला आहे.

चंद्रपूर : महाविद्यालय व विशेष समाजकल्याण विभागात सुसुत्रता आणण्यासाठी शासनाने आॅनलाईन शिष्यवृत्ती अर्ज प्रणाली कार्यान्वीत केली. मात्र, या आॅनलाईन प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचा मानसिक त्रास वाढला आहे. वारंवार लिंक फेल होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. शाळा, महाविद्यालय सुरु होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र, अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज सादर केलेले नाही. समाजकल्याण विभागाने महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सुचना देऊन अर्ज लवकर भरण्याचे सांगितले आहे. मात्र, समाजकल्याण विभागाचे संकेतस्थळ वारंवार फेल ठरत आहे. विद्यार्थ्यांची इंटरनेट कॅफेवर अर्ज भरण्याची गर्दी आहे. मात्र, संकेतस्थळ तासन्तास उघडत नसल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. शासनाच्या समाजकल्याण विभागाने दोन वर्षापासून आॅनलाईन प्रणाली कार्यान्वीत केली आहे. या प्रणालीनुसार विद्यार्थी व महाविद्यालय समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करीत असतात. दहावी व बारावीचे शेकडो विद्यार्थी अद्यापही शिष्यवृत्ती अर्ज भरले नाही. तर वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचेही नुकतेच प्रवेश झाल्याने अर्ज दाखल व्हायचे आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ‘लिंक फेल’ वाढल्याने विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. वरिष्ठांनी याची दखल घेत विद्यार्थ्यांना होणार त्रास दूर करण्याची मागणी होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)