शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

इरईच्या पात्रात बैठा सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:45 IST

इरई नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतरही मागील दीड वर्षांपासून केवळ निधीअभावी इरई खोलीकरणाचे काम बंद ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देखोलीकरणाचे काम रखडले : इरई मातेसाठी निधी द्या हो !

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : इरई नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतरही मागील दीड वर्षांपासून केवळ निधीअभावी इरई खोलीकरणाचे काम बंद ठेवण्यात आले आहे. अर्धवट काम झाल्यामुळे पुन्हा इरई नदीची दुरवस्था होण्याची चिन्हे आहेत. इरईच्या खोलीकरणाचे काम पुन्हा सुरू करावे व नदीला वाचवावे, या मागणीसाठी इरई बचाव जनआंदोलन व वृक्षाईतर्फे गुरुवारी इरई नदी पदयात्रा व नदीपात्रातच बैठा सत्याग्रह करण्यात आला.वेकोलिचे महाकाय ढिगारे, विविध उद्योगांचे रसायनमिश्रित पाणी यामुळे इरई नदी प्रदूषित झाली. तिचे नैसर्गिक पात्रच बदलले. इरई नदी चंद्रपूरकरांसोबतच अनेक गावांची तहान भागविणारी नदी आहे. चंद्रपूर शहराला ही नदी लागून असतानाही या नदीचे जिल्हा प्रशासन जतन करू शकले नाही. वेकोलिच्या ढिगाऱ्यामुळे पावसाळ्यात इरई नदीतील पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला. यामुळे अनेकदा चंद्रपूरकरांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागला. याशिवाय गाळ कधीच उपसण्यात न आल्याने या नदीत प्रचंड गाळ साचला. कुशाब कायरकर यांची ‘वृक्षाई’, इरई नदी बचाव संघर्ष समिती, इको प्रो, ग्रिन प्लॅनेट या संघटनेनेही आपापल्या परीने इरई वाचविण्यासाठी लढा उभारला. प्रसंगी आंदोलने केली. ‘लोकमत’ने इरईची होत असलेली वाताहात वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली. त्यामुळे प्रशासनाला याची दखल घ्यावीच लागली. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैेसेकर यांनी यासाठी पुढाकार घेत वेकोलि व वीज केंद्राला सहकार्य करण्यास भाग पाडले. त्यातून सिंचन विभागाद्वारे इरई नदीच्या खोलीकरणाला २० मे २०१५ रोजी प्रारंभ झाला. आतापर्यंत पडोली ते चवराळापर्यंतचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले.मागील वर्षीच्या पावसाळ्यात खोलीकरणाचे काम थांबविण्यात आले. मात्र पावसाळा संपल्यानंतर हे काम सुरूच करण्यात आले नाही. आता उन्हाळा सुरू झाला आहे. तरीही निधीअभावी हे काम बंदच ठेवण्यात आले आहे. पावसाळ्यात पुन्हा हे काम बंदच ठेवावे लागणार आहे. एकीकडे जिल्ह्यात विकासकामांचा सपाटा सुरू असताना चंद्रपूरच्या जीवदायिनीसाठी निधी मिळू नये, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, इरई नदीच्या खोलीकरणासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा व रखडलेले काम पुन्हा सुरू करावे, या मागणीसाठी वृक्षाई व इरई बचाव जनआंदोलन यांच्या वतीने गुरुवारी सकाळी इरई नदी पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर दाताळा मार्गावरील इरई नदीच्या पात्रात बैठा सत्याग्रह करण्यात आला. या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी विविध भजने गाऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. आंदोलनात कुशाब कायरकर, अनिता कथडे, रेखा चांभारे, गिता अत्रे, दीपलता कालीवाले, अर्चना बट्टे, संगिता देवतळे, रुपाली टोंगे, प्रिती लांडे, संगिता विधाते, कमल गोहणे, कुसूम झाडे, जोत्स्ना शेंडे, कविता टेकाम, सरिता वारदरकर, सुनिता कडूकर, शैलजा तिवारी, कविता चवरे, छाया ठोंबरे, शशिकला औऊतकर, आशा कायरकर, वंदना गोहणे, भूमी व प्रतिभा कायरकर, अनिल राईकवार, मयूर राईकवार, खुशाल लोंढे, तुकाराम झाडे, घनश्याम येरगुडे, सतीश खोब्रागडे सहभागी झाले होते.आंदोलनाला पाठिंबाइरई नदीच्या खोलीकरणासाठी निधी मिळावा, या मागणीसाठी गुरुवारी झालेल्या आंदोलनाला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार, संदीप कष्टी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, मनपाचे माजी सभापती संतोष लहामगे, सुनिता अग्रवाल, जलबिरादरीचे जिल्हा संयोजक संजय वैद्य, प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी बैठा सत्याग्रहाला भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.