शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

इरईच्या पात्रात बैठा सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:45 IST

इरई नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतरही मागील दीड वर्षांपासून केवळ निधीअभावी इरई खोलीकरणाचे काम बंद ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देखोलीकरणाचे काम रखडले : इरई मातेसाठी निधी द्या हो !

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : इरई नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतरही मागील दीड वर्षांपासून केवळ निधीअभावी इरई खोलीकरणाचे काम बंद ठेवण्यात आले आहे. अर्धवट काम झाल्यामुळे पुन्हा इरई नदीची दुरवस्था होण्याची चिन्हे आहेत. इरईच्या खोलीकरणाचे काम पुन्हा सुरू करावे व नदीला वाचवावे, या मागणीसाठी इरई बचाव जनआंदोलन व वृक्षाईतर्फे गुरुवारी इरई नदी पदयात्रा व नदीपात्रातच बैठा सत्याग्रह करण्यात आला.वेकोलिचे महाकाय ढिगारे, विविध उद्योगांचे रसायनमिश्रित पाणी यामुळे इरई नदी प्रदूषित झाली. तिचे नैसर्गिक पात्रच बदलले. इरई नदी चंद्रपूरकरांसोबतच अनेक गावांची तहान भागविणारी नदी आहे. चंद्रपूर शहराला ही नदी लागून असतानाही या नदीचे जिल्हा प्रशासन जतन करू शकले नाही. वेकोलिच्या ढिगाऱ्यामुळे पावसाळ्यात इरई नदीतील पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला. यामुळे अनेकदा चंद्रपूरकरांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागला. याशिवाय गाळ कधीच उपसण्यात न आल्याने या नदीत प्रचंड गाळ साचला. कुशाब कायरकर यांची ‘वृक्षाई’, इरई नदी बचाव संघर्ष समिती, इको प्रो, ग्रिन प्लॅनेट या संघटनेनेही आपापल्या परीने इरई वाचविण्यासाठी लढा उभारला. प्रसंगी आंदोलने केली. ‘लोकमत’ने इरईची होत असलेली वाताहात वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली. त्यामुळे प्रशासनाला याची दखल घ्यावीच लागली. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैेसेकर यांनी यासाठी पुढाकार घेत वेकोलि व वीज केंद्राला सहकार्य करण्यास भाग पाडले. त्यातून सिंचन विभागाद्वारे इरई नदीच्या खोलीकरणाला २० मे २०१५ रोजी प्रारंभ झाला. आतापर्यंत पडोली ते चवराळापर्यंतचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले.मागील वर्षीच्या पावसाळ्यात खोलीकरणाचे काम थांबविण्यात आले. मात्र पावसाळा संपल्यानंतर हे काम सुरूच करण्यात आले नाही. आता उन्हाळा सुरू झाला आहे. तरीही निधीअभावी हे काम बंदच ठेवण्यात आले आहे. पावसाळ्यात पुन्हा हे काम बंदच ठेवावे लागणार आहे. एकीकडे जिल्ह्यात विकासकामांचा सपाटा सुरू असताना चंद्रपूरच्या जीवदायिनीसाठी निधी मिळू नये, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, इरई नदीच्या खोलीकरणासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा व रखडलेले काम पुन्हा सुरू करावे, या मागणीसाठी वृक्षाई व इरई बचाव जनआंदोलन यांच्या वतीने गुरुवारी सकाळी इरई नदी पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर दाताळा मार्गावरील इरई नदीच्या पात्रात बैठा सत्याग्रह करण्यात आला. या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी विविध भजने गाऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. आंदोलनात कुशाब कायरकर, अनिता कथडे, रेखा चांभारे, गिता अत्रे, दीपलता कालीवाले, अर्चना बट्टे, संगिता देवतळे, रुपाली टोंगे, प्रिती लांडे, संगिता विधाते, कमल गोहणे, कुसूम झाडे, जोत्स्ना शेंडे, कविता टेकाम, सरिता वारदरकर, सुनिता कडूकर, शैलजा तिवारी, कविता चवरे, छाया ठोंबरे, शशिकला औऊतकर, आशा कायरकर, वंदना गोहणे, भूमी व प्रतिभा कायरकर, अनिल राईकवार, मयूर राईकवार, खुशाल लोंढे, तुकाराम झाडे, घनश्याम येरगुडे, सतीश खोब्रागडे सहभागी झाले होते.आंदोलनाला पाठिंबाइरई नदीच्या खोलीकरणासाठी निधी मिळावा, या मागणीसाठी गुरुवारी झालेल्या आंदोलनाला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार, संदीप कष्टी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, मनपाचे माजी सभापती संतोष लहामगे, सुनिता अग्रवाल, जलबिरादरीचे जिल्हा संयोजक संजय वैद्य, प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी बैठा सत्याग्रहाला भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.