शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच बनताच झाली अटक

By admin | Updated: September 10, 2015 00:47 IST

एखाद्या नशिबात एका क्षणी भाग्य उजळणे आणि दुसऱ्याच क्षणी दुर्भाग्य येणे क्वचित पाहायला मिळत असते.

मनरेगाव घोटाळा प्रकरण : नवनिर्वाचित सरपंचाला एकाच दिवशी पद व अटकब्रह्मपुरी : एखाद्या नशिबात एका क्षणी भाग्य उजळणे आणि दुसऱ्याच क्षणी दुर्भाग्य येणे क्वचित पाहायला मिळत असते. त्याचा प्रत्यय मालडोंगरी येथील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीनंतर आला. राजेश दामोधर पारधी यांना सरपंच होताच मनरेगा घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली.मालडोंगरी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेमध्ये ग्रामरोजगार म्हणून राजेश दामोधर पारधी कार्यरत होते. या योजनेमध्ये १ लाख ४ हजार ६३९ रुपयांची अफरातफर झाली असल्याचे चौकशी अंती उघडकीस आल्याने संवर्ग विकास अधिकारी प्रकाश तोडेवार यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार राजेश दामोधर पारधी यांना अटक करण्यात आली. अटकेचा दिवस व सरपंच पदाची निवड बुधवारीच झाली, हे विशेष. यापूर्वी पिंपळगाव (भो.) येथे ग्रामरोजगाराला अटक झाली होती. त्यानंतर मालडोंगरी येथे तसाच मनरेगा घोटाळा उघडकीस आला. मनरेगा योजनेला भ्रष्टाचाराचे ग्रहण संपूर्ण तालुक्यातच लागल्याचे हळूहळू उघडकीस येऊ लागले आहे. असेच या प्रकरणावरुन दिसून येत आहे. राजेश दामोधर पारधी यांनी प्रत्यक्ष कामावर असलेल्या मजुरांचे नाव नसणे, मस्टर अदलाबदल करणे, कामावर आपल्या हितसंबंधी लोकांना घेणे आदी व इतर कारणांची तक्रार पंचायत समितीमध्ये करण्यात आली. त्यानुसार संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्या चौकशीत सत्यता आढळून आल्याने फिर्यादी प्रकाश तोडेवार यांनी ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये एक लाख चार हजार ६३९ रुपयांची अफरातफर केल्याची तक्रार केली. त्यानुसार ब्रह्मपुरी पोलिसांनी राजेश दामोधर पारधी रा. मालडोंगरी याला अटक करुन भादंवि कलम ४२०, ४०८, ४६५, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला. परंतु आज मालडोंगरी येथील सरपंच पदाची निवडणूक होती. मागील महिन्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजेश पारधी यांची पार्टी बहुमताने निवडून आली होती. त्यानुसार राजेश पारखीला सरपंचपदासाठी उभे करण्यात आले. एकीकडे गुन्ह्यात अटक तर दुसरीकडे सरपंचपदासाठी प्रक्रिया पूर्ण करणे असे दोन्ही प्रकार यावेळी गावकऱ्यांनी अनुभवले. प्रारंभी अटक करुन पुन्हा सरपंचपदाची उमेदवारी भरण्यासाठी नेणे, पुन्हा पोलीस ठाण्यात आणून पुन्हा मत टाकायला नेणे व सरपंच म्हणून निवड येणे असा प्रकार आज घडला. एकूणच हा प्रकार राजकारणाचा भाग असल्याचेही बोलले जात आहे. राजेश पारधी हा काँग्रेस पार्टीकडून निवडून आला आहे. तर मनरेगामध्ये केलेला घोटाळा भाजपाने उघडकीस आणून दिलेला असल्याने या प्रकरणाला राजकीय रंग प्राप्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुढे हे प्रकरण कोणते वळण घेणार, याकडे सर्व तालुकावासियांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)