शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

सरपंच बनताच झाली अटक

By admin | Updated: September 10, 2015 00:47 IST

एखाद्या नशिबात एका क्षणी भाग्य उजळणे आणि दुसऱ्याच क्षणी दुर्भाग्य येणे क्वचित पाहायला मिळत असते.

मनरेगाव घोटाळा प्रकरण : नवनिर्वाचित सरपंचाला एकाच दिवशी पद व अटकब्रह्मपुरी : एखाद्या नशिबात एका क्षणी भाग्य उजळणे आणि दुसऱ्याच क्षणी दुर्भाग्य येणे क्वचित पाहायला मिळत असते. त्याचा प्रत्यय मालडोंगरी येथील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीनंतर आला. राजेश दामोधर पारधी यांना सरपंच होताच मनरेगा घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली.मालडोंगरी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेमध्ये ग्रामरोजगार म्हणून राजेश दामोधर पारधी कार्यरत होते. या योजनेमध्ये १ लाख ४ हजार ६३९ रुपयांची अफरातफर झाली असल्याचे चौकशी अंती उघडकीस आल्याने संवर्ग विकास अधिकारी प्रकाश तोडेवार यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार राजेश दामोधर पारधी यांना अटक करण्यात आली. अटकेचा दिवस व सरपंच पदाची निवड बुधवारीच झाली, हे विशेष. यापूर्वी पिंपळगाव (भो.) येथे ग्रामरोजगाराला अटक झाली होती. त्यानंतर मालडोंगरी येथे तसाच मनरेगा घोटाळा उघडकीस आला. मनरेगा योजनेला भ्रष्टाचाराचे ग्रहण संपूर्ण तालुक्यातच लागल्याचे हळूहळू उघडकीस येऊ लागले आहे. असेच या प्रकरणावरुन दिसून येत आहे. राजेश दामोधर पारधी यांनी प्रत्यक्ष कामावर असलेल्या मजुरांचे नाव नसणे, मस्टर अदलाबदल करणे, कामावर आपल्या हितसंबंधी लोकांना घेणे आदी व इतर कारणांची तक्रार पंचायत समितीमध्ये करण्यात आली. त्यानुसार संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्या चौकशीत सत्यता आढळून आल्याने फिर्यादी प्रकाश तोडेवार यांनी ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये एक लाख चार हजार ६३९ रुपयांची अफरातफर केल्याची तक्रार केली. त्यानुसार ब्रह्मपुरी पोलिसांनी राजेश दामोधर पारधी रा. मालडोंगरी याला अटक करुन भादंवि कलम ४२०, ४०८, ४६५, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला. परंतु आज मालडोंगरी येथील सरपंच पदाची निवडणूक होती. मागील महिन्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजेश पारधी यांची पार्टी बहुमताने निवडून आली होती. त्यानुसार राजेश पारखीला सरपंचपदासाठी उभे करण्यात आले. एकीकडे गुन्ह्यात अटक तर दुसरीकडे सरपंचपदासाठी प्रक्रिया पूर्ण करणे असे दोन्ही प्रकार यावेळी गावकऱ्यांनी अनुभवले. प्रारंभी अटक करुन पुन्हा सरपंचपदाची उमेदवारी भरण्यासाठी नेणे, पुन्हा पोलीस ठाण्यात आणून पुन्हा मत टाकायला नेणे व सरपंच म्हणून निवड येणे असा प्रकार आज घडला. एकूणच हा प्रकार राजकारणाचा भाग असल्याचेही बोलले जात आहे. राजेश पारधी हा काँग्रेस पार्टीकडून निवडून आला आहे. तर मनरेगामध्ये केलेला घोटाळा भाजपाने उघडकीस आणून दिलेला असल्याने या प्रकरणाला राजकीय रंग प्राप्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुढे हे प्रकरण कोणते वळण घेणार, याकडे सर्व तालुकावासियांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)