शहरं
Join us  
Trending Stories
1
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
2
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
3
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
4
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
5
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
6
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
7
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
8
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
9
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
10
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
11
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
12
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
13
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
14
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
15
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
16
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
17
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
18
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
19
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
20
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!

सरपंच आरक्षणाने अनेक जण सत्तेच्या बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:33 IST

घनश्याम नवघडे नागभीड : नागभीड तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण शुक्रवारी जाहीर करण्यात आले. या आरक्षणाने अनेक प्रस्थापित ...

घनश्याम नवघडे

नागभीड : नागभीड तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण शुक्रवारी जाहीर करण्यात आले. या आरक्षणाने अनेक प्रस्थापित व इच्छुकांचे सरपंच होण्याचे स्वप्न भंगले आहे.

नागभीड तालुक्यात ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या; मात्र आरक्षण सोडत ही ५६ या संपूर्ण ग्रामपंचायतींची काढण्यात आली. नागभीड पंचायत समितीच्या माजी सभापती पुनम बगमारे यांचे पती पुरुषोत्तम बगमारे यांनी याअगोदर ग्रामपंचायतीचे १० वर्ष सरपंचपद भुषवले. याही वेळेस याच इराद्याने ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले व पँनलसह निवडून आले; मात्र तेथील सरपंचपद महिला आरक्षणात गेल्याने त्यांच्या इच्छेवर पाणी फेरल्या गेले आहे. नागभीड पंचायत समितीचे माजी उपसभापती कृष्णाजी उरकुडे यांचे चिरंजीव व पांजरेपारचे माजी उपसरपंच संजय उरकुडे यांनी यापूर्वी तीनदा पांजरेपारचे उपसरपंचपद भुषवले आहे. एकदा तरी सरपंच व्हावे, ही त्यांची इच्छा होती, पण दर वेळेस पांजरेपार येथे महिला किंवा अन्य आरक्षण येत गेल्याने त्यांना उपसरपंचपदावर समाधान मानावे लागले. याहीवेळेस महिला आरक्षण आले असल्याने त्यांना उपसरपंचपदावरच समाधान मानावे लागेल, असे चित्र आहे.

नागभीड तालुक्यातील सर्वात मोठ्या तळोधी ग्रामपंचायतीचे सरपंचपद मागील वेळेस अनु. जातीकरिता आरक्षित होते. यावेळी ते सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आरक्षित होईल, असे अनेकांनी अपेक्षित धरून निवडणूक लढविली होती. आरक्षणाच्या सोडतीत तळोधीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेकरिता आरक्षित झाल्याने येथेही अनेकांच्या इच्छेवर पाणी फेरल्या गेले आहे. नागभीड पंचायत समितीच्या माजी उपसभापती पेंदाम यांचे पती व पारडीचे माजी उपसरपंच सुधाकर पेंदाम यांनीही सरपंच होण्याच्या उद्देशाने पारडी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली; मात्र ते सदस्यपदाच्या निवडणुकीतच पराभूत झाले.

मोहाळीचीही अशीच गोष्ट आहे. तालुक्यात राजकीयदृष्ट्या जी काही संवेदनशील गावे आहेत, त्यात मोहाळीचे नाव अग्रक्रमावर आहे. या गावच्या सरपंचपदावर अनेकांचा डोळा होता; मात्र येथील सरपंचपद अनु.जमातीसाठी आरक्षित झाले आहे. असेच संवेदनशील असलेल्या कानपा येथील सरपंचपद हे अनु.जमातीच्या महिलेकरिता आरक्षित झाले आहे. ही केवळ वाणगीदाखल उदाहरणे झाली. बहुतेक गावात अशीच परिस्थिती आहे.