शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सरपंच, उपसरपंचाविना ग्रामपंचायत पोरकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:17 IST

नऊ सदस्य असलेल्या चिरोली ग्रामपंचायतीमध्ये ना सरपंच आहे ना उपसरपंच. या दोन्ही महत्त्वाच्या पदाविना ही ग्रामपंचायत पोरकी झाली असून त्याचा गावविकासावर विपरित परिणाम होत आहे.

ठळक मुद्देप्रशासकीय कारभार : चिरोलीचे सरपंच पायउतार, उपसरपंचपदही रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : नऊ सदस्य असलेल्या चिरोली ग्रामपंचायतीमध्ये ना सरपंच आहे ना उपसरपंच. या दोन्ही महत्त्वाच्या पदाविना ही ग्रामपंचायत पोरकी झाली असून त्याचा गावविकासावर विपरित परिणाम होत आहे.नळ जोडणी प्रकरणी राज्य शासनाने सरपंच शालिक दहीवले यांना जुलै २०१७ रोजी सरपंच पदावरून पायउतार करण्यात आले. पंचायत समितीने ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक केली आहे. त्यामुळे सरपंचपद सहा महिन्यांपासून तर उपसरपंच पद मागील दीड वर्षांपासून रिक्त आहे. यामुळे सरपंच, उपसरपंचाविना ग्रामपंचायतीचा कारभार सुरू आहे.चिरोली ग्रामपंचायतची निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. नऊ सदस्य संख्या असलेल्या चिरोली येथील वार्ड क्र. १ मधून शालिक बोळना दहीवले निवडून आले होते. सरपंच पद हे अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने शालिक दहीवले यांची सरपंचपदी निवड झाली तर अनिल शेंडे यांची उपसरपंचपदी निवड झाली होती.दरम्यान, अनिल माधव शेंडे यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याने गावातील नागरिकांनी त्यांची आयुक्तांकडे तक्रार केली होती. तक्रारीची शहानिशा करून अनिल शेंडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप खरे निघाल्याने आयुक्तांनी दीड वर्षापुर्वी अनिल शेंडे यांना ग्राम पंचायत सदस्य आणि उपसरपंच पदावरून खाली केले. दरम्यान, नळ जोडणीचे पैसे ग्रामपंचायतीमध्ये भरणा न केल्याच्या कारणावरून शालिक दहीवले यांना सरपंच पदावरून ग्राम विकास मंत्रालयाने जुलै २०१७ रोजी पायउतार केले. तेव्हापासून ही ग्रामपंचायत पोरकी झाली आहे. त्यामुळे विकास खुंटला आहे.अधिसुचनेनुसार उपसरपंचाची निवडणूक लावू - तहसीलदारयेत्या २५ फेब्रुवारी रोजी चिरोली ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्र. २ ची सदस्य पदाची पोटनिवडणूक होत आहे. निवडणूक झाल्यानंतर शासनाच्या अधिसूचनेनुसार चिरोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक लावू, अशी प्रतिक्रिया मूलचे तहसीलदार राजेश सरवदे यांनी दिली.