शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

तळोधीत भरणार सारस्वतांचा मेळा

By admin | Updated: December 11, 2014 23:03 IST

चंद्रपूर जिल्ह्याच्या जडणघडणीत नागभीड तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे. या जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्राच्या प्रगतीत या तालुक्याने

साहित्यात तालुक्याचे मोठे योगदान: ६४ वे विदर्भ साहित्य संमेलननागभीड : चंद्रपूर जिल्ह्याच्या जडणघडणीत नागभीड तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे. या जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्राच्या प्रगतीत या तालुक्याने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. असे भाग्य लाभलेल्या या तालुक्यातील तळोधी (बा.) नगरीत ६४ वे विदर्भ साहित्य संमेलन होऊ घातले आहे. या संमेलनानिमित्त सारस्वतांचा जणू येथे मेळाच भरणार आहे. या सारस्वतांना ऐकण्यासाठी परिसरातील रसिक आतूर आहेत.आधुनिक चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास राजगोंड वंशापासून आरंभलेला असला तरी त्याचा उगम प्राचीन काळात सापडतो. या ऐतिहासिक जिल्ह्याने कृत-त्रेत, द्वापर आणि कलीयुग अशी चारही युगे पाहिली आहेत, अशी इतिहासाची साक्ष आहे. ही साक्ष इतिहासकार रामायण व महाभारत या महाकाव्यातून पुरावे म्हणून देतात. वैनगंगेच्या आणि वर्धा नदीच्या खोऱ्यातील भूमीच नाही तर दख्खनचा पठार हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा निर्वाळा भूसंशोधकांनी व इतिहास संशोधकांनी दिला आहे. असे ऐतिहासिक महत्व असलेल्या या तालुक्याची साहित्यसेवाही त्याच तोलामोलाची आहे.या तालुक्यात साहित्यसेवेचे व्रत घेणाऱ्यात जेष्ठ रंगकर्मी यशवंत भूते यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. शिक्षकी पेशाला तिलांजली देऊन या माणसाने संगीत नाटकांची सेवाच नाही तर नाटके, दंडारी लिहून साहित्याची सेवा केली. फुलामुलांचे कवी म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात ख्यातकीर्त झालेले वा.ना. विगम हेसुध्दा नागभीडचेच. अनेक बालकवितांचे संग्रह विगम यांच्या नावे आहेत.विगम यांनी मराठी काव्य क्षेत्रात जी उंची १९५० च्या दशकात प्राप्त केली, तीच उंची आज नागभीड येथील प्रा. राजन जयस्वाल यांनी केली आहे. स्वत: अमराही असलेल्या या माणसाने अनेक काव्यसंग्रह, समिक्षा ग्रंथ लिहून मराठीची जी सेवा केली, ती खरोखरच प्रशंसनीय आहे. चौसर, चौफेर, चौकार ही काव्यसंग्रह आणि कानेटकरांची नाट्यसृष्टी हा समिक्षाग्रंथ नागभीड तालुक्यातील साहित्यरसिकांसाठी मैलाचा दगड ठरावा असाच आहे.(तालुका प्रतिनिधी)