शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

तळोधीत भरणार सारस्वतांचा मेळा

By admin | Updated: December 11, 2014 23:03 IST

चंद्रपूर जिल्ह्याच्या जडणघडणीत नागभीड तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे. या जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्राच्या प्रगतीत या तालुक्याने

साहित्यात तालुक्याचे मोठे योगदान: ६४ वे विदर्भ साहित्य संमेलननागभीड : चंद्रपूर जिल्ह्याच्या जडणघडणीत नागभीड तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे. या जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्राच्या प्रगतीत या तालुक्याने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. असे भाग्य लाभलेल्या या तालुक्यातील तळोधी (बा.) नगरीत ६४ वे विदर्भ साहित्य संमेलन होऊ घातले आहे. या संमेलनानिमित्त सारस्वतांचा जणू येथे मेळाच भरणार आहे. या सारस्वतांना ऐकण्यासाठी परिसरातील रसिक आतूर आहेत.आधुनिक चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास राजगोंड वंशापासून आरंभलेला असला तरी त्याचा उगम प्राचीन काळात सापडतो. या ऐतिहासिक जिल्ह्याने कृत-त्रेत, द्वापर आणि कलीयुग अशी चारही युगे पाहिली आहेत, अशी इतिहासाची साक्ष आहे. ही साक्ष इतिहासकार रामायण व महाभारत या महाकाव्यातून पुरावे म्हणून देतात. वैनगंगेच्या आणि वर्धा नदीच्या खोऱ्यातील भूमीच नाही तर दख्खनचा पठार हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा निर्वाळा भूसंशोधकांनी व इतिहास संशोधकांनी दिला आहे. असे ऐतिहासिक महत्व असलेल्या या तालुक्याची साहित्यसेवाही त्याच तोलामोलाची आहे.या तालुक्यात साहित्यसेवेचे व्रत घेणाऱ्यात जेष्ठ रंगकर्मी यशवंत भूते यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. शिक्षकी पेशाला तिलांजली देऊन या माणसाने संगीत नाटकांची सेवाच नाही तर नाटके, दंडारी लिहून साहित्याची सेवा केली. फुलामुलांचे कवी म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात ख्यातकीर्त झालेले वा.ना. विगम हेसुध्दा नागभीडचेच. अनेक बालकवितांचे संग्रह विगम यांच्या नावे आहेत.विगम यांनी मराठी काव्य क्षेत्रात जी उंची १९५० च्या दशकात प्राप्त केली, तीच उंची आज नागभीड येथील प्रा. राजन जयस्वाल यांनी केली आहे. स्वत: अमराही असलेल्या या माणसाने अनेक काव्यसंग्रह, समिक्षा ग्रंथ लिहून मराठीची जी सेवा केली, ती खरोखरच प्रशंसनीय आहे. चौसर, चौफेर, चौकार ही काव्यसंग्रह आणि कानेटकरांची नाट्यसृष्टी हा समिक्षाग्रंथ नागभीड तालुक्यातील साहित्यरसिकांसाठी मैलाचा दगड ठरावा असाच आहे.(तालुका प्रतिनिधी)